Sunday 22 January 2017

बदललेला ग्राहक... विनीत वर्तक
काळ बदलला तशी माणस पण बदलली, त्यांच्या गरजा पण बदलल्या. चैन वाटणाऱ्या गोष्टी गरज झाल्या. गरजांची चैन झाली. ह्या बदलांचा वेग गेल्या काही काळात प्रचंड वाढला त्यायोगे गरजा पण बदलत गेल्या. एकेकाळी जिकडे नावाला महत्व होत. गुणवत्ता महत्वाची होती. गुणवत्ता आणी नावावर अनेक कंपन्यांनी अनेक वर्ष ग्राहक राजावर राज्य केल. पण जेव्हा सेवा आणी किंमत बाजारात स्पर्धा करू लागल्या तेव्हा गुणवत्ता आणी किंमत ह्याचा मेळ घालण कठीण होत गेल. बदल हाच बाजाराचा पाया झाला. त्याने बाजाराची सगळी गणित बदलवली. गुणवत्ता मागे राहिली. पुढे गेली ती किंमत. भले त्या वस्तूच आयुष्य कमी झाल पण बदलासाठी नेहमीच आग्रही असलेल्या ग्राहक राजाला युज आणी थ्रो ची सवय झाली.
अश्या सगळ्या बदलांना ओळ्खल ते चीनी बाजारपेठेने. स्वस्त आणी मस्त पण त्याच वेळेस गुणवत्तेवर कॉमप्रोमाईज करणाऱ्या चीनी वस्तूंनी जगभर आक्रमण केल. जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेला भारत त्यातून कसा वाचेल? एका पाठोपाठ एक अश्या वस्तूंनी भारतीय बाजारपेठा चीनी वस्तूंनी भरून गेल्या. अगदी दारावर लागणाऱ्या तोरणापासून ते हातात रेंगाळणाऱ्या मोबाईल पर्यंत. चीनी वस्तूंची त्सुनामी बाजारपेठेत वर्चस्व गाजवेपर्यंत कोणाला त्याची चाहूल लागली नाही. मग त्या त्सुनामी मद्धे अनेक कंपन्या, अनेक पारंपारिक गोष्टी, वस्तू, कारागीर आणी गुणवत्ता सगळच नष्ट झाल.
म्हणतात न की आत शिरलेल पाणी जस ओसरू लागते तस त्याने केलेल्या प्रलयाची प्रचीती येते. हळूहळू हेच परिणाम दिसायला सुरवात झाल्यावर चीनी मालाविरुद्ध उठाव सुरु झाले. ह्याला चीन च राजकारण, कुटनीती आणी भारताला रोखण्यासाठी आंतराष्ट्रीय पातळीवर उचललेली पावलं कमी अधिक प्रमाणात कारणीभूत असतील हि. पण प्रमुख कारण आहे की पुन्हा एकदा ग्राहक बदलू पाहतो आहे. हा बदल जर भारतीय लोकांनी, कारागिरांनी आणी भारतीय कंपन्यांनी लक्षात घेतला तर येणाऱ्या काळात ड्रयागन ला तोंडघाशी पडायला वेळ लागणार नाही.
बदलेला ग्राहक आता दोन्ही गोष्टी शिकला आहे. त्याला हव आहे ते मिलाफ काही गोष्टीत गुणवत्तेचा तर काही गोष्टीत बदलांचा. उदाहरण द्यायचं झाल तर रोजच्या आयुष्याचा अंग झालेल्या आणी सतत बदलत राहणाऱ्या मोबाईल मध्ये त्याला हव आहे तो बदल. गुणवत्ते पेक्षा १-२ वर्ष वापरून कमी किमतीत थोड्या काळाने नवीन फोन घेण्यावर त्याचा कल आहे. जिकडे गुणवत्ते पेक्षा फिचर्स, रंगसंगती, नवीन टेक्नोलोजी, स्पेस ह्यावर जास्ती लक्ष असते तर ज्या गोष्टी घरात अनेक वर्ष सेम राहतात त्यात गुणवत्तेवर भर आहे. कार, मोटर सायकल, फ्रीज, टी व्ही किंवा अगदी मिक्सर सुद्धा.
चीनी मालाने आपली छाप कुठे सोडली असेल तर रोजच्या आयुष्यात कमी आयुष्य असणाऱ्या गोष्टीत पण लांब पल्ल्याच्या प्रवासात चीनी गोष्टी तितक्या मुसंडी मारू शकलेल्या नाहीत. एखादी चीनी गाडी घेण्यापेक्षा ग्राहक जापनीज (होंडा) , भारतीय (मारुती), जर्मन (मर्सिडीज) सारख्या कार अगदी जास्तीचे पैसे देऊन विकत घेतील. अगदी चीनी गाडी कितीही आकर्षित असली तरी गुणवत्ता जीवाशी निगडीत आहे. तिकडे ग्राहक पैश्याकडे न बघता गुणवत्ता स्वीकारतो. ह्यात काही अपवाद असतील. बाजारपेठेतील कच्चे आणी पक्के दुवे ओळखणे हे एका चांगल्या कंपनी ची वाटचाल ठरवतो. त्यामुळे चीनी मालावारची ओरड चुकीची आहे अस मला वाटते. आपण व्हात्स अप वर चीनी माल वापरू नका म्हणून मेसेज पाठवताना चीनी कंपन्यांचा मोबाईल वापरत आहोत ह्याची जाण प्रत्येकाने ठेवायला हवी.
पे-टीम मध्ये चायनीज कंपनी अलिबाबा ची मालकी आहे ही ओरड करताना भारतीयांनी २०१० साली त्या कंपनी मध्ये गुंतवणूक केली नाही हे वास्तव आपण का विसरतो. रतन टाटा नी पुढली पावल ओळखून स्वतः काही भांडवल पे-टीम मध्ये घेतले होते. आज २०१६ ला जेव्हा अलिबाबा ला त्यांच्या दूरदृष्टीची फळे मिळत आहेत तेव्हा पे-टीम वापरू नका असे म्हणणे अप्पलपोटी नाही का? मुळात हि कंपनी एका भारतीयाची आहे. त्यात २५% हिस्सा अलिबाबा चा आहे. आज त्याची गुंतवणूक सर्वात जास्त परतावा मिळत असताना आपण कुठेतरी ग्राहक ओळखण्यात कमी पडलो हे झाकण्यासाठी व्हात्स अप चा वापर काही लोक करत आहेत.
ग्राहक हा राजा असतो. जो राजाच्या मनातल ओळखतो तो पुढे राज्य करू शकतो. जो नाही ओळखत त्याच अस्तित्व पुसायला वेळ नाही लागत. नोकिया त्याच ज्वलंत उदाहरण आहे. तुमच प्रोडक्ट जर खरच चांगल आहे तर ग्राहकाला झुकवता येते. आप्पल हे त्याच उदाहरण आहे. गुणवत्ता असेल तर तुम्ही आजही आपला ग्राहकवर्ग निर्माण करू शकता मर्सिडीज त्याच उदाहरण आहे. तुमच्याकडे दूरदृष्टी असेल तर योग्य गुंतवणूक जास्तीत जास्त परतावा देते ह्याच अलिबाबा हे उदाहरण आहे. तर तुमच्या कल्पनांना पंख दिले तर स्काय इज लिमिट पे-टीम ह्याच उदाहरण आहे. शेवटी काय तर बदलेला ग्राहक ओळखण हेच खूप मोठ स्कील आहे.

No comments:

Post a Comment