Sunday 22 January 2017

शिनम्यावा यु एस-२ ... विनीत वर्तक
गेल्या आठवड्यात जपान आणी भारताने नागरी सहकार्य अणुकरारावर स्वाक्षऱ्या केल्या. साउथ चायना सी मध्ये चीन ची चाललेली अरेरावी थांबवण्यासाठी जपान ला आंतरराष्ट्रीय साथ हवी आहे. त्यासाठी चीन ला अटकाव करण्यासाठी जपान भारताकडे एक सच्चा मित्र म्हणून बघत आहे. त्यासाठी जपान अनेक तऱ्हेने भारताला सहकार्य करत आहे. मग ती मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन असो वा शिनम्यावा यु एस-२.
शिनम्यावा यु. एस.- २ हे एक जगातील अतिशय प्रगत अस विमान आहे. STOL म्हणजेच "शोर्ट टेक ऑफ ल्यांडीग" प्रकारातील ४ टर्बो इंजिन असलेल हे विमान जमीन किंवा पाणी कोणत्याही पृष्ठभागावर अतिशय कमीत कमी धावपट्टीवर उतरू किंवा उड्डाण भरू शकते. टेक ऑफ किंवा उड्डाण भरण्यासाठी जमिनीवर ४९० मीटर तर पाण्यावर फक्त २८० मीटर धावपट्टी ची गरज असते. तर उतरण्यासाठी जमिनीवर फक्त १५०० मीटर आणी पाण्यावर ३३० मीटर धावपट्टी ची गरज लागते. अतिशय खवळलेल्या समुद्रात ३ मीटर उंचीच्या लाटांमद्धे ही उड्डाण भरू किंवा उतरू शकते. तसच हे विमान अतिशय काटक असल्याने लेवल ५ च्या समुद्राच्या स्थितीत म्हणजे वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ३८ किमी असताना सुद्धा कार्यरत राहू शकते. एकदा इंधन भरल्यावर ४५०० किमी चा पल्ला गाठू शकते. ह्यामुळे ह्याची रेंज जगात अतिशय उत्कृष्ठ समजली जाते. ह्याचे पंख हे कार्बन काम्पोझीट मेटल पासून बनवलेले आहेत. त्यामुळे अति उंचीवर पण हे उड्डाण भरू शकते.
अस बहुउपयोगी विमान आपल्या सागरी सीमांच रक्षण करण्यास प्रचंड सक्षम आहे. जपान ने दुसऱ्या महायुद्धा नंतर स्वतावर अनेक निर्बंध घातले होते. त्यातील महत्वाचे म्हणजे कोणत्याही युद्ध सामुग्रीच निर्यात आणी न्युक्लीअर तंत्रज्ञान. २०१३ साली जेव्हा जपान ने स्वताहून स्वतावर घातलेले निर्णय रद्द केले. तेव्हा पहिला कस्टमर म्हणून त्यांनी भारताची निवड केली. न्युक्लीयर टेक्नोलोजी च्या बाबतीत स्वताहून पहिला अण्वस्त्र हल्ला करणार नाही हे भारतच बंधन भारताची जमेची बाजू ठरली. तर साउथ चायना सी मध्ये जर आपल अस्तित्व टिकवायच असेल तर भारता सारख्या मोठ्या देशाची मदत घेतल्याशिवाय ते शक्य नाही. जर भारताची मदत घ्यायची असेल तर तंत्रज्ञान हस्तांतरण करण तितकच गरजेचे आहे. हे जपान ला पक्क माहित आहे. म्हणून पहिली सिविल न्युक्लीयर डील तर पहिला युद्ध सामुग्री विक्रीचा करार त्यांनी भारतासोबत केला आहे.
तब्बल १०,००० कोटी रुपयांची शिनम्यावा यु एस २ ची १२ विमाने भारत खरेदी करणार आहे. अनेक वर्ष निगोशियेशन केल्यावर हा करार मार्गी लागला आहे. आधी ह्यातील प्रत्येक विमानांची किंमत ही १३३ मिलियन अमेरिकन डॉलर इतकी जपान ने ठेवली होती. त्याला भारताचा विरोध होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणी जापनीज पंतप्रधान शिंझो एबे ह्यांच्यात चर्चा होऊन मग हि किंमत ११३ मिलियन अमेरिकन डॉलर इतकी खाली आणली गेली. त्या नंतर भारताने अशी १२ विमान खरेदी करण्याचा करार केला. मेक इन इंडिया ह्या तत्वाला जागून ह्यातील फक्त २ विमान ही फ्लाय अवे म्हणजे रेडीमेड तर उरलेली १० तंत्रज्ञान हस्तांतरण TOT (Technology of Transfer) करून भारतात बनवण्यात येणार आहेत.
भारताची सागरी सीमा तब्बल ७५०० किमी ची आहे. ह्याच्या देखरेखीची जबाबदारी भारतीय नौदलावर आहे. शिनम्यावा यु एस २ च्या येण्याने नौदलाच्या शक्तीत कैक पटीने वाढ होणार आहे. ह्या विमानांचा उपयोग नौदल माणसांची येण- जाण, सप्लाय साठी, स्पेअर पार्टस जे युद्धनौकांना लागतात ते नेण्यासाठी, शोध मोहिमेसाठी तसेच नजर ठेवण्यासाठी करू शकेल. तसेच ह्यांची प्रचंड मोठी अशी रेंज बघता अंदमान- निकोबार बेटांवर ही तैनात करण्यात येतील. ज्यामुळे भारताच्या आख्या पूर्व किनाऱ्यावर नजर ठेवता येणे शक्य होणार आहे. आशियातील नंबर २ आणी नंबर ३ च्या अर्थव्यवस्थानमधील हा करार त्यांच्या एकजूटीमधील महत्व अधोरेखित करतो आहे.

No comments:

Post a Comment