Wednesday 30 October 2019

अलीबाबा ची गुहा बांधणारा जॅक मा... विनीत वर्तक ©

अलीबाबा ची गुहा बांधणारा जॅक मा... विनीत वर्तक ©

लहानपणी जवळपास आपल्यातील प्रत्येकाने 'तिळा तिळा दार उघड' हे सांगणारी अलीबाबा आणि चाळीस चोरांची गोष्ट ऐकलीच असेल. खुप संपत्ती, दागदागिने, सोने असणारी अशी गुहा खरचं अस्तित्वात असेल का? असेल तर कुठे? ह्या प्रश्नाने अनेक लहान गोपाळांच्या मनात घर केल असेल. पण त्याच उत्तर मात्र कोणाला सापडलेलं नव्हतं. पण चीन च्या एका माणसाने अश्याच एका 'अलीबाबा' च्या गुहेचं स्वप्न पाहिलं आणि प्रत्यक्षात उतरवलं त्याच नाव आहे 'जॅक मा'. जॅक मा ने ४ एप्रिल १९९९ ला 'अलीबाबा' ग्रुप ची स्थापना केली. आज ह्या कंपनीच मार्केट कॅप जवळपास ४६० बिलियन अमेरिकन डॉलर असुन ५६ बिलियन अमेरिकन डॉलर (जवळपास ४०,००० कोटी भारतीय रुपये ) इतकं वार्षिक उत्पन्न आहे. (थोडक्यात सांगायचं झालं तर अलीबाबा ची किंमत फेसबुक पेक्षा जास्त आहे. अलीबाबा इ-बे आणि एमेझॉन हे दोन्ही एकत्र केल्यावर ही त्यांच्यापेक्षा जास्ती वस्तु आज बाजारात विकते.)  एक लाखापेक्षा जास्त लोकं आज अलीबाबा मध्ये काम करतात. आज अलीबाबा वॉलमार्ट नंतर जगातील सगळ्यात मोठी 'इ कॉमर्स' कंपनी आहे. अलीबाबा आशियाच्या शेअर बाजारातील सगळ्यात विश्वासू कंपनी आहे. शुन्यातुन सुरवात करून अलीबाबा ची गुहा बांधणारा जॅक मा (जॅक मा सध्या चीन मधला सगळ्यात श्रीमंत आणि जगातील अति श्रीमंत व्यक्तीन मधील एक आहे. जॅक मा कडे आजच्या घडीला ४० बिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त संपत्ती आहे. ) चा प्रवास सगळ्यांना प्रेरणा आणि खुप काही शिकवून जाणारा आहे. (विनीत वर्तक ©)

जॅक मा चा जन्म हांगझोऊ, कम्युनिस्ट असणाऱ्या चीन इकडे झाला. अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या जॅक मा चे आई वडील तुटपुंजे पैसे कमवत असतं. जॅक मा अभ्यासात ही काही हुशार नव्हता. अपयशाचे काटे जणु काही त्याला लहानपणीच चिकटलेले होते. जॅक मा प्राथमिक शाळेत दोन वेळा नापास झाला. माध्यमिक इयत्तेत तर तीन वेळा नापासाचा शिक्का त्याच्या प्रगती पुस्तकात लागला. नकाराची परंपरा त्याच्या महाविद्यालयीन शिक्षणात सुरु राहिली. तीन वेगवेगळ्या कॉलेज ने त्याला शैक्षणिक प्रवेश नाकारला. शेवटी हांगझोऊ विद्यापीठातुन त्याने 'इंग्रजी' विषयांतून पदवी घेतली. आपलं शिक्षण सुरु असताना त्याने १० वेळा जगातील प्रतिष्ठित अश्या हार्वर्ड विद्यापिठात शिकण्यासाठी अर्ज केला आणि प्रत्येक वेळी त्याला नकाराला सामोरं जावं लागलं. पदवी मिळण्याआधीच त्याने हांगझोऊ विद्यापिठात इंग्रजी शिकवण्याची नोकरी मिळाली ती अवघ्या १२ अमेरिकन डॉलर / प्रति महिना. जॅक मा च्या आयुष्यातील अपयश इकडे संपत नाही तर त्या अपयशाचा प्रवास इकडुन सुरु होतो. पदवी मिळाल्यावर त्याने ३० पेक्षा जास्त ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला पण प्रत्येक वेळी नकार ऐकायला मिळाला. आपल्याला आलेल्या अपयशा बद्दल जॅक मा सांगतो,

"When KFC came to China, 24 people went for the job.  Twenty-three people were accepted.  I was the only guy who wasn’t.” He also one of the 5 applicants to a job in Police force and was the only one getting rejected after being told, “No, you’re no good.”

अपयशाचा डोंगर असा समोर असताना कोणीही हरलं असतं पण जॅक मा च्या मनात वेगळचं होतं. आपल्याला अपयश आलं तरी आपण थांबायचं नाही हे त्याने ठरवलं होतं. त्याच्या शब्दात,

 “Well, I think we have to get used to it.  We’re not that good.”

नोकरीत आणि शिक्षणात आलेल्या अपयशानंतर जॅक मा ने उद्योग काढायचं ठरवलं. १९९५ साली अमेरिकेत गेल्यावर 'इ - कॉमर्स' आणि कॉम्प्युटर बदलाचे वारे त्याने ओळखले. ह्या सगळ्यात चीन कुठे नाही हे त्याच्या नजरेतुन सुटलं नाही. १९९९ साली आपल्या १७ मित्रांना एकत्र आणुन त्याने 'अलीबाबा' नावाची कंपनी स्थापन केली. अमेरिकेतील कॉम्प्युटर क्षेत्राच हब असणाऱ्या सिलिकॉन व्हॅली मधील उद्योजगताला त्याने अलीबाबा ला उभारण्यासाठी मदत मागितली पण तिकडेही जॅक मा ला अपयश आलं. अलीबाबा दिवाळखोरीत निघण्याच्या मार्गावर पोहचली होती. उभारणीच्या पहिल्या ३ वर्षात अलीबाबा ने शुन्य रुपयाचा बिझनेस केला. (इकडे एका महिन्यात नफा नाही झाला तर लोकं उद्योग बंद करतात तर तिकडे जॅक मा तब्बल ३ वर्ष एकही रुपयाचा धंदा न करता आपलं अलीबाबा चं दुकान उघडुन बसला होता.) अपयशाची मालिका जॅक मा च्या आयुष्यात संपत नव्हती. पण जॅक मा ने चे शब्द खुप काही सांगुन जातात,

"The very important thing you should have is patience. Never give up. Today is hard, tomorrow will be worse, but the day after tomorrow will be sunshine."

जॅक मा चे शब्द खरे निघाले. जवळपास ३ वर्ष एकही रुपयाचा धंदा न केलेल्या आणि दिवाळखोरीकडे वाटचाल करणाऱ्या 'अलीबाबा' चे दिवस एका रात्रीत पलटले. बघता बघता पुर्ण जगात अलीबाबा हे नाव प्रसिद्ध झालं. ज्या अलीबाबा ला १९९९ साली कोणी एक डॉलर द्यायला तयार नव्हतं त्या अलीबाबा चा सप्टेंबर २०१४ ला एक शेअर अमेरिकन बाजारात ९२.७०$ ला विकत घेतला गेला. अलीबाबा चा शेअर अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या इतिहासातला सगळ्यात मोठा आय.पी.ओ. ठरला. ( Initial Public Offering (IPO). जॅक मा चीन मधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनला. फोर्ब्स च्या जगाच्या पटलावरील पहिल्या १०० प्रभावी व्यक्तींमध्ये सलग ५ वर्ष जॅक मा समाविष्ट होता.  

एकेकाळी सगळीकडून अपयशाचा सामना करणारा जॅक मा आज यशाच्या सिंहासनावर आरूढ झाला होता. पण त्या यशाची हवा मात्र जॅक च्या डोक्यात गेली नाही. ज्या वेळेस त्याची कंपनी आपल्या सर्वोच्च स्थानावर बिझनेस करत होती. तेव्हाच जॅक मा ने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. खरे तर अलीबाबा २००९ साली जेव्हा १० वर्षाची झाली तेव्हापासुन जॅक मा ने २०१९ ला निवृत्त होण्याचं नक्की केलं होतं. त्यासाठी पुढल्या १० वर्षात कंपनी च्या साच्यात बदल करताना आपल्या नंतर ही अलीबाबा च अस्तित्व आपल्यावरती अवलंबुन न राहता तितकचं राहिलं पाहिजे ह्यासाठी जॅक ने मेहनत घेतली. त्याच्या शब्दात,

It’s the culture, it’s the people, it’s the system that keeps a company alive for 102 years. It’s not only one person. You should never have a copy of Jack Ma. One Jack Ma is too much for the company,” So in the past 10 years, we tried to build up a system: A system that has the right leadership ... a system that can create, can make, and can discover, can train a lot of leaders.”

१० सप्टेंबर २०१८ ला जॅक मा ने वयाच्या ५५ व्या वर्षी अलीबाबा मध्ये २० वर्ष नोकरी करून सन्मानाने निवृत्ती घेतली. आता आपलं लक्ष त्याने समाजाच्या कल्याणासाठी दिलं असुन आपल्या संस्थेच्या माध्यमातुन अनेक समाजसेवेची कामं करत आहे. (विनीत वर्तक ©)

जॅक मा चा शुन्यातुन श्रीमंतीकडे झालेला प्रवास जितका प्रेरणादायी आहे तितकाच योग्य वेळी थांबण्याचा निर्णय ही खूप काही शिकवून जाणारा आहे. कुठे थांबायचं माहीत असलं की आपण व्यसनात ओढले जात नाही हे जॅक मा ने दाखवुन दिलं आहे. आपल्या करीअर च्या सर्वोच्च पदावर असताना पैसे, पद,सुख, समृद्धी हे सगळं बाजुला करून आपलं पुढलं आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण करण्याचा निर्णय किती मोठा आहे. अपयशाच्या गर्तेतुन फिनिक्स पक्ष्याप्रमाणे बाहेर निघत समृद्धीच्या एव्हरेस्ट वर निवृत्ती घेऊन अलीबाबा ची गुहा बांधणाऱ्या जॅक मा ला माझा सलाम.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Sunday 27 October 2019

कोटीच्या कोटी उड्डाणे... विनीत वर्तक ©

कोटीच्या कोटी उड्डाणे... विनीत वर्तक ©

एकेकाळी काही देशांची मक्तेदारी असणाऱ्या अवकाश क्षेत्रात काही दशकांपुर्वी भारताने प्रवेश केला. आज त्या क्षेत्रात भारताने स्वतःच असं आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. हे स्थान ज्या कारणांसाठी महत्वाचं आहे ते म्हणजे 'फ्रुगल इंजिनिअरिंग'. जिकडे शक्य होईल तिकडे भारताने ह्याचा वापर करत एकापेक्षा एक अश्या खडतर मोहीम यशस्वी केल्या आहेत. रॉकेट प्रक्षेपणासाठी महत्वाचं असते ते त्याचं इंधन. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला भेदत उड्डाण लागणारं बल  देणार इंधन कोणत्याही उपग्रहाच्या अथवा रॉकेट च्या प्रक्षेपणात महत्वाची भुमिका बजावतं. सध्याच्या क्षणाला पृथ्वीच्या भोवती सुमारे ४००० उपग्रह फिरत असुन येत्या काही काळात त्यांची संख्या काही पटीने वाढणार आहे. अवकाश क्षेत्र हे खुप जोखमीचं आणि खुप खर्चिक असं क्षेत्र मानलं जाते. त्यामुळेच कमी खर्चिक आणि त्याच वेळेस सुरक्षित असणाऱ्या प्रणालींना पुर्ण जगात मागणी असणार आहे. स्वस्त, किफायतशीर आणि निसर्गाला कमीत कमी हानी पोहचवणारं इंधन ही पुढल्या काळाची गरज असणार आहे. त्यामुळेच येत्या काळात पर्यावरणाला पुरक इंधनावर संशोधन करण्यासाठी नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, जॅक्सा  सारख्या संस्था पुढाकार घेतं असुन पुढील काही वर्षात पर्यावरण आणि हाताळण्यासाठी अत्यंत घातक असणारी इंधने बंद करण्याचे प्रयत्न करत आहे. भारत ही ह्या संशोधनात मागे नसुन एका मराठी मुलाने ह्या संशोधनात मराठी माणसाचे झेंडे अटकेपार फडकवले आहेत. तुषार जाधव हे ह्या तरुणाचं नाव असुन त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या 'मनस्तु स्पेस टेक्नॉलॉजी' ह्या कंपनीने 'आय बुस्टर' नावाची एक प्रपोलेशन प्रणाली तयार केली आहे. ही प्रणाली पर्यावरण पुरक असुन रॉकेट प्रक्षेपणासाठी लागणारं बल निर्माण करण्यात ही इतर प्रणाली पेक्षा जास्ती सक्षम आहे.   (विनीत वर्तक ©)

तुषार जाधव हा मुळचा नाशिक इथला असुन मुंबईच्या आय.आय,टी. मधुन त्याने पदवी घेतली आहे. डी.आर.डी.ओ. मध्ये काही काळ काम केल्यावर त्याने आपल्या साथीदारासोबत 'मनस्तु स्पेस टेक्नॉलॉजी' ची स्थापना केली. त्यानंतर उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी लागणाऱ्या प्रणाली, इंधनावर काम करून त्यांनी आय बुस्टर ची निर्मिती केली आहे. ह्या प्रणाली मध्ये हायड्रोजन पेरोऑकसाइड सोबत इतर घटकांचा वापर केला आहे. सध्या उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी ज्या रॉकेट चा वापर केला जातो त्यात 'हायड्राझैन' ह्या इंधनाचा वापर केला जातो. ह्या इंधनाचा स्पेसिफिक इम्पल्स फक्त २२० सेकंदाचा आहे.

(Specific impulse:- it is the total impulse (or change in momentum) delivered per unit of propellant consumed and is dimensional equivalent to the generated thrust divided by the propellant mass flow rate or weight flow rate.)

ज्याचा सोप्या भाषेत अर्थ असा की ते २२० सेकंड प्रज्वलित केलं जाऊ शकते. पण ह्याचवेळी हे इंधन अत्यंत ज्वालाग्राही आणि अत्यंत घातक निसर्ग आणि मनुष्य दोघांसाठी आहे. तुषार आणि त्याच्या कंपनी ने तयार केलेलं 'आय बुस्टर' च्या इंधनाचा स्पेसिफिक इम्पल्स हा २७५ सेकंदाचा आहे. ज्यामुळे हे इंधन २५% बचत इंधनाच्या क्षमतेत करते. त्याच सोबत हे इंधन 'हायड्राझैन' पेक्षा हाताळायला सोप्पे आणि पर्यावरणाला ४०% टक्के कमी हानी पोहचवणारं आहे. (विनीत वर्तक ©)

गणित करायचं झालं तर सध्या वापरात असलेल्या इंधनाने २ टन वजनाचा उपग्रह प्रक्षेपित करायला साधारण ४० मिलियन अमेरिकन डॉलर खर्च येईल तर तुषार ने निर्मण केलेल्या प्रणालीने हाच खर्च २८ मिलियन अमेरिकन डॉलर इतकाच येईल.(१२ मिलियन अमेरिकन डॉलर ची बचत ) ह्या शिवाय त्याच वजन ही १.५ टन इतकचं राहील. ह्यामुळे 'मनस्तु स्पेस टेक्नॉलॉजी' ही अवकाश क्षेत्रात येत्या काळात गेम चेंजर ठरणार आहे. ह्यामुळेच भारताच्या इसरो आणि डी.आर.डी.ओ. सारख्या संस्थांनी तुषार च्या संशोधनाची दखल घेतली आहे. नासा, युरोपियन स्पेस एजन्सी सारख्या संस्थांनी पुढल्या पिढीच्या तयार केलेल्या इंधनापेक्षा 'आय बुस्टर' जवळपास ६०% किफायतशीर आहे. नासा ने इंधन वापरासाठी आखुन दिलेल्या ९ मार्गदर्शक तत्वांपैकी आय बुस्टर ने ६ आधीच पुर्ण केली असुन उरलेली ३ तत्व ही येत्या २ वर्षात पुर्ण केली जातील असं तुषार जाधव अभिमानाने सांगतो.

नुकत्याच झालेल्या ड्रिम इनोव्हेशन स्पर्धेत त्यांच्या इनोव्हेशन ला तृतीय क्रमांकाच बक्षीस मिळालं तर जपान इकडे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांनी निवड झाली आहे. ह्या स्पर्धेत विजेते ठरल्यास जवळपास ६५ लाखाच बक्षीस आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या संशोधनाला सन्मान मिळेल. तुषार जाधव ची ही उडी अनेक उद्योजग बनणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन तर देईलच पण त्या सोबत भारताच्या कोटीच्या कोटी उड्डाणात महत्वाची भुमिका बजावणार आहे.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Friday 18 October 2019

स्वप्नांच्या नजरेतुन बघणारी प्रांजल... विनीत वर्तक ©

स्वप्नांच्या नजरेतुन बघणारी प्रांजल... विनीत वर्तक ©

सप्तरंगाच्या दुनियेत अनेक रंगांच्या छटा बघताना देवाने आपल्याला दिलेल्या अमुल्य देणगीचा विचार आपण कधीच करत नाही. ज्या दोन डोळ्यांमुळे आपण ह्या निसर्गाच्या, माणसाच्या तसेच विश्वाच्या अनेक रंगांना अनुभवु शकतो त्याचा विसर आपल्याला पडतो. समजा ह्या दोन डोळ्यांनी काम करणं बंद केलं तर समोर येणाऱ्या अंधाराचा सामना आपण करू शकतो का? हा विचार आपण दोन क्षण जरी केला तरी त्याच महत्व आपल्याला समजुन येईल. पण यदाकदाचित हे डोळे कायमचे आंधळे झाले तर आपल्या स्वप्नांचं काय? असाच प्रश्न एका मुंबईकर असलेल्या मराठमोळ्या मुलीला पडला. आयुष्यात अंधार समोर दिसत असला तरी त्याने आयुष्य अंधारमय न करून घेता आपल्या स्वप्नांच्या नजरेतुन आयुष्यात आपली स्वप्न साकार करणाऱ्या प्रांजल पाटील हिने सगळ्यांच्या समोर एक आदर्श ठेवला आहे. भारतातील पहिली महिला आय.ए.एस. ऑफिसर होण्याचा मान तिने पटकावला आहे. डोळ्या समोरचा अंधार तिची दृष्टी आंधळी करून गेला पण आपल्या जिद्दीच्या जोरावर तिने एका अविश्वनिय अश्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवलं आहे. (विनीत वर्तक ©)

उल्हासनगर इथल्या प्रांजल पाटील ने २०१६ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पुर्ण देशात ७७२ वा क्रमांक मिळवला. आय.आर.एस. ची संधी असताना सुद्धा पुन्हा एकदा तिने २०१७ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली त्यात पुर्ण देशातुन तिने १२४ वा क्रमांक मिळवला. तिच्या ह्या यशाने तिला आय.ए.एस. बनण्याचे दरवाजे आपोआप उघडले. ( The Indian Administrative Service (IAS) is the top and most prestigious administrative civil service of Government of India.). वयाच्या ६ व्या वर्षी आपली दृष्टी गमावलेल्या मराठमोळ्या प्रांजल पाटील ने नुकताच आपल्या ट्रेनिंग चा भाग म्हणुन सहाय्य जिल्हाधिकारी एर्नाकुलम, केरळ इकडे पदभार स्विकारला. त्या सोबत भारतातील पहिली नेत्रहिन आय.ए.एस. अधिकारी म्हणुन आपलं नाव भारताच्या इतिहासात नोंदवलं आहे.

प्रांजल पाटील ला लहानपणापासुन डोळ्यांनी अंधुक दिसत होतं. वयाच्या ६ व्य वर्षी तिची दृष्टी पूर्णपणे गेल्याच निदान झालं. ह्या नंतर प्रांजल पाटील ने मुंबईतील दादरच्या नेत्रहीन लोकांसाठी असणाऱ्या कमला मेहता शाळेतुन आपलं शिक्षण पुर्ण केलं. त्यानंतर तिने मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेज मधुन पॉलिटिकल सायन्स मधुन बी.ए केलं. ह्या नंतर आपल्या पुढल्या शिक्षणासाठी तिने दिल्ली गाठलं. दिल्ली च्या जे.एन.यु. मधुन तिने एम.फील आणि पुढे डॉक्टरेट साठी च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारी साठी तिने कोणत्याही क्लास ला प्रवेश घेतला नाही. आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर, अभ्यासावर विश्वास ठेवल्यामुळे ती अनावश्यक स्पर्धेपासुन लांब राहिली. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर, (विनीत वर्तक ©)

“Occasionally I would doubt if my level of preparedness was enough, but I let the sincerity of my effort lead me,”

आपली गेलेली दृष्टी परत मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न प्रांजल पाटील ने केले पण त्यात यश आलं नाही उलटं ह्या ऑपरेशन्समुळे अनेक शारीरिक तसेच मानसिक त्रासाला त्यांना सामोरे जावं लागलं.

“When the surgeries were done, I did suffer a lot. The pain did not subside until at least a year after the surgery,”

गेलेली दृष्टी आणि समोर असलेला असंख्य अडचणींचा पाढा अश्या सर्व बिकट परिस्थितीतुन वाट काढत मराठमोळ्या मुंबईकर प्रांजल पाटील ने भारतीय लोकसेवा आयोगाच्या इतिहासात एक नवीन अध्याय आपल्या जिद्दीने लिहिला आहे. दृष्टी गेल्यावर पण ब्रेल लिपी तसेच कॉम्प्युटर वरील जॉब एक्सेस विथ स्पीच सारख्या सॉफ्टवेअर च्या मदतीने तिने एक नवीन उंची गाठली आहे. एर्नाकुलम इकडे आपला पदभार स्विकारताना तिने काढलेले शब्द बरचं काही सांगुन जातात,

"We should never be defeated and we should never give up. With our efforts, all of us will get that one breakthrough which we want. I am feeling extremely glad and proud to take charge. Once I start working, I will have more idea about the sub divisions of the district and can have more plans to what to do for the subdivision,"

डोळ्यांनी अंधारमय केलेल्या आयुष्याला आपल्या स्वप्नांच्या नजरेतुन बघत मराठी माणसाचा अटकेपार झेंडा रोवणाऱ्या मराठमोळ्या प्रांजल पाटील ला माझा सलाम आणि तिच्या पुढल्या प्रवासाला खुप खुप शुभेच्छा.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Tuesday 15 October 2019

एक दुजे के लिये... विनीत वर्तक ©

एक दुजे के लिये... विनीत वर्तक ©

प्रेमाच्या आणाभाका कोणी कितीही घेतल्या तरी त्या सगळयांना निभावणं जमतेच असं नाही. खऱ्या निरपेक्ष प्रेमाला लग्न संस्थेची गरज भासत नाही किंवा जरी ते त्याचा भाग असले तरी त्या पलीकडे ते नातं जोडलेलं असते. लग्नाच्या गाठीने बांधलेल्या त्या दोन व्यक्ती तेव्हाच खऱ्या आयुष्याच्या जोडीदार होतात जेव्हा हे बंध तन, मन, धन ह्या पलीकडे काळाच्या कसोटीवर तसेच एकमेकांना साथ देतं राहतात. असच एक जोडपं ज्याचं प्रेम एक दशक नाही तर तब्बल ७ दशकापेक्षा अधिक काळ एकमेकांना साथ देतं राहिलं इतकच नाही तर आयुष्याचा शेवटचा श्वास सुद्धा दोघांनी एकाच दिवशी सोडला. त्यांच्या एक दुजे के लिये असणाऱ्या प्रेमाची ही गोष्ट आहे.

प्रिब्ले स्टावर आणि इसाबेल व्हाइटने ह्यांची ही प्रेम कहाणी. त्यांची कहाणी सुरु झाली ती १९४० साली. दोघेही पहिल्यांदा एकमेकांना भेटले ते आपलं शिक्षण पुर्ण करत असताना. तेव्हा एकमेकांबद्दल निर्माण झालेल्या प्रेमाच्या अंकुराचा पुढे वटवृक्ष होईल अशी कल्पना त्या दोघांनाही नव्हती. त्याच काळात दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहायला लागले होते. आपल्या ऐन तारुण्यात असणाऱ्या त्या दोघांनीही युद्धात भाग घेतला. इसाबेल नौदलात नर्स म्हणुन जखमींवर उपचार करायला लागली तर प्रिब्ले मरीन कमांडो म्हणुन लष्करात दाखल झाला. आपआपल्या बाजूने युद्धात आपलं योगदान देतानाही त्या कॉलेज जिवनात रुजलेल्या प्रेमाच्या अंकुराने आपलं स्थान दोघांच्याही आयुष्यात पक्क केलं होतं. १९४६ साली दुसऱ्या महायुद्धाची सांगता झाली आणि त्यानंतर अवघ्या ५ महिन्यात प्रिब्ले आणि इसाबेल ह्यांनी एकमेकांना आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणुन निवडलं.

लग्नानंतरच आयुष्य दोघांसाठी बदललं. दोघांना ५ मुलं झाली. इसाबेल एकीकडे त्यांच्या संगोपनात व्यस्त झाली तर प्रिब्ले आपल्या करियर मध्ये व्यस्त झाला. मुलं मोठी झाल्यावर इसाबेल ने पुन्हा आपलं नर्सिंग चं करीअर सुरु केलं. आयुष्याच्या अनेक चढ उतारातुन त्यांना जावं लागलं ज्यात अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेला त्यांचा मुलगा फुटबॉल खेळताना मृत्युमुखी पडला. ह्या कठीण क्षणात पण त्यांनी एकमेकांना साथ दिली. सात दशकाहुन अधिक काळ ह्या दोघांनी सुखाने संसार केला. त्यांच प्रेम, विश्वास काळाच्या कसोटीवर तसाच टिकुन राहिला. (विनीत वर्तक ©)

२०१३ ला इसाबेल ला dementia (मेंदूच्या ऐंद्रिय रोगामुळे उद्भवलेली कायम स्वरूपाची मानिसक र्हासाची अवस्था) झाल्याचं निदान झालं. ह्या रोगामुळे इसाबेल ला अनेक गोष्टींचा विसर पडत चालला होता. दिवसेंदिवस इसाबेल ची कमी होणारी स्मरणशक्ती बघुन प्रिब्ले च्या काळजाचा ठोका चुकत होता. प्रिब्ले हतबलतेने हे सर्व बघत होता. इसाबेल च्या खालावत चाललेल्या तब्येतीने प्रिब्लेची तब्येत खालावत चालली होती. प्रिब्ले ला फक्त एकच दिलासा होता की इसाबेल अजून त्याला विसरली नव्हती. इसाबेल आणि प्रिब्ले ला वेगवेगळ्या ठिकाणी उपचारासाठी ठेवण्यात आलं. इसाबेल पासुन चं दुरावण प्रिब्ले ला सहन होतं नव्हतं. आपल्या ९६ व्या वाढदिवसाला त्याने इसाबेल सोबत एकदा शेवटचं झोपण्याची इच्छा व्यक्त केली. प्रिब्ले च्या इच्छेखातर त्या दोघांना एकमेकांच्या बाजूला झोपण्याची तयारी त्यांच्या ६२ वर्षीय मुलीने केली. प्रिब्ले आणि इसाबेल शेवटचं एकमेकांच्या बाजुला पडून होते पण ते दोघेही काहीच बोलले नाहीत. फक्त एकमेकांचा हात हातात घेऊन झोपी गेले. त्यांच्या मुलीच्या शब्दात,

“There was not a single word spoken between the two of them. They held hands and just fell asleep. I told dad, ‘This is mom’s birthday present for you.’ He was just so happy that he got to take his nap with her.”

ह्या घटनेनंतर अवघ्या आठवड्यात इसाबेल ने ह्या जगाचा निरोप घेतला. तिच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाच्या वेळी प्रिब्ले ने इसाबेल च्या हात हातात घेतला. त्याला कळुन चुकलं की हा शेवटचा क्षण आहे. ज्या इसाबेल वर त्याने आयुष्यभर प्रेम केलं तब्बल ७ दशकाहुन अधिक काळ संसार केला ती इसाबेल आज त्याचा हात सोडुन दुर एका वेगळ्या प्रवासाला निघाली होती. ह्या भावुक क्षणाबद्दल त्यांच्या मुलीने सांगितलं, (विनीत वर्तक ©)

“He held her hand, and it was just so tender. I asked him if he wanted to stay after the prayers, and he shook his head. I said, ‘Okay, but you know that means you’re going to have to let go of her hand?’ I was crying, and he was crying,” .....

त्याच दिवशी संध्याकाळी प्रिब्ले ने पण ह्या जगाचा निरोप घेतला. ह्या आयुष्यात येताना १४ दिवसांच अंतर त्या दोघांमध्ये होतं तर जाताना १४ तासांनी ह्या दोघांनी ह्या जगाचा निरोप घेतला. एक दुजे के लिये असणारी त्यांची प्रेमकहाणी आपल्यामागे एक आदर्श ठेवुन गेली आहे. त्यांच्या मुलीच्या शब्दात,

“Mom and dad really lived out that, if you make a commitment, and even though life gets rough or life gets in the way, you work through life, and you live your life together.”

आज जिकडे निरपेक्ष प्रेम, वचनबद्धता, समजून घेण्याची क्षमता कमी होतं असताना इसाबेल आणि प्रिब्ले ह्यांची प्रेम कहाणी म्हणजे खर प्रेम काय असते हे सांगणारी आहे. आपलं सौंदर्य, आपलं शरीर, आपला पैसा, आपलं स्टेटस, आपला जात, धर्म आणि आपलं नागरिकत्व ह्या पलीकडे जाऊन आपल्या सुंदर भावनांना समजुन घेऊन निभावणं काय असते हे सर्वानीच इसाबेल आणि प्रिब्ले कडुन शिकण्यासारखं आहे. त्या दोघांच्या प्रेमकहाणीस माझा सलाम.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.






Monday 14 October 2019

एका कुलीची गोष्ट... विनीत वर्तक ©

एका कुलीची गोष्ट... विनीत वर्तक ©

सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं..... असं म्हणत अँग्री यंग म्यान अमिताभ बच्चन ने कुली चित्रपटातुन रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे सामान उचलणाऱ्या असंख्य कुलींना रुपेरी पडद्यावर अजरामर केलं. आज त्याला अनेक वर्ष झाली. जग आज खुप पुढे निघुन गेलं तरी त्या कुलींचं आयुष्यात आज तितकासा फरक पडलेला नाही. आजही ट्रेन स्टेशन मध्ये शिरताच ती थांबण्याआधी डब्यात शिरून आपल्या लाल रंगाच्या शर्टाच्या बाह्या मागे करत गिऱ्हाईक शोधणारे कुली आपण अनेकदा प्रत्येक स्टेशन वर बघतोच. अनेकदा हे कुली अशिक्षित किंवा साधारण शालेय शिक्षण पुर्ण केलेले असतील असा एक अंदाज आपला असतो. पण ह्या अंदाजाला पार मोडीत काढण्याचा पराक्रम एका कुलीने केला आहे. ज्या स्पर्धा परीक्षेत पास होणं अनेक लोकांचं स्वप्न असते त्या यु.पी.एस.सी./ एम.पी.एस.सी. सारख्या परीक्षा एका कुलीने पास केली आहे. त्याच नावं आहे श्रीनाथ के. श्रीनाथ हा एर्नाकुलमं स्टेशन वर कुलीच काम करतो. हे काम करत असताना त्याने के.पी.एस.सी.(Kerala Public Service Commission) ची परीक्षा पास केली आहे.

श्रीनाथ हा केरळ मधील निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या मुन्नार मध्ये राहतो. तो उपजीविकेसाठी ५ वर्षांपासून आपल्या घराच्या जवळ असलेल्या एर्नाकुलम स्टेशन वर कुलीच काम करतो. हाय स्कुल पास असलेल्या श्रीनाथसाठी आयुष्यात एक वेगळं वळणं आलं ते 'डिजिटल इंडिया' माध्यमातुन. ह्या योजने अंतर्गत देशातील अनेक रेल्वे स्टेशन वर प्रवाशांच्या सोयीसाठी मोफत 'वाय-फाय' सेवा सुरु करण्यात आली. एर्नाकुलम स्टेशन हे त्यातील एक स्टेशन होतं. ह्या सुविधेमुळे श्रीनाथ च्या हाताशी पुर्ण जग आलं. प्रवाशांचे सामान उचलता उचलता श्रीनाथ ने त्याचवेळी 'वाय-फाय' च्या माध्यमातुन आपला अभ्यास सुरु केला. अभ्यासासाठी त्याला कुलीगिरी सोडता येणार नव्हती. कारण पुर्ण घराच्या उपजिविकेचा स्रोत तोच होता. पण ही प्रतिकुल परिस्थिती त्याला अभ्यास करण्यापासून रोखु शकली नाही. (विनीत वर्तक ©)

एर्नाकुलम स्टेशन वर मिळणाऱ्या २०-४० एम.बी.पी.एस. स्पीड च्या इंटरनेट चा वापर करत त्याने ऑनलाईन कोर्सेस मध्ये अभ्यास करायला सुरवात केली. स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तक पण तो ऑनलाईन वाचत असे. दिवसा आंगाखांद्यावर सामान उचलत असताना कानाला लावलेल्या हेड फोन मध्ये शिक्षकांचा तास ऐकत त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची उजळणी तो रात्री करत असे. एक फोन, एक हेडफोन आणि रेल्वे स्टेशन चं फ्री वाय-फाय ह्या तिन गोष्टींची मदत घेतं श्रीनाथ ने के.पी.एस.सी. ची खडतर असणारी परीक्षा २०१८ साली पास केली आहे. त्याच्या शब्दात सांगायचं झालं तर,

"I will keep studying while I work as a coolie because I have the pressure of running my house... I will keep studying and appearing for exams. If I appear for enough exams, I am bound to get a good job".........

श्रीनाथ के ने 'इच्छा तेथे मार्ग' ह्या म्हणी ला खर करत लोकसेवा आयोगाच्या खडतर परीक्षेत बाजी मारली आहे. त्याच्या यशात सगळ्यात मोलाचा वाटा त्याच्या मेहनती नंतर श्रीनाथ डिजिटल इंडिया च्या फ्री वाय फाय सेवेला देतो आहे. ज्याच्यामुळे आज तो सन्मानाने आपलं आयुष्य जगत आहे. एकीकडे ह्याच फ्री वाय- फाय चा वापर पॉर्न साईट बघण्यासाठी केला जातो अशी ओरड होत असताना दुसरीकडे श्रीनाथ ने एक वेगळं उदाहरण सगळ्यांन पुढे ठेवलं आहे. कोणताही कोचिंग क्लास नाही, कोणताही मार्गदर्शक नाही, कोणीही गॉडफादर नाही अश्या सगळ्या प्रतिकुल परिस्थितीत ह्या एका कुलीची गोष्ट आपल्याला बरच काही सांगुन जाते. श्रीनाथ के.ला माझा कुर्निसात आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Friday 11 October 2019

एक अव्यक्त नातं... विनीत वर्तक ©

एक अव्यक्त नातं... विनीत वर्तक ©

'मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता'...... 'पिटर , तुम लोग मुझे वहा ढूंढ रहे थे और मैं तुम्हारा यहां इंतजार कर रहा था'.......

आजही हे डायलॉग ऐकले की एक वेगळं स्फुरण अंगात चढते. ह्या संवादाची नशा जितकी शब्दात आहे त्याहुन जास्ती त्या शब्दांच्या संवादफेकीत आहे. संवाद फेकीसोबत तो 'अँग्री यंग म्यान' च्या आवाजाचा बाज ह्या संवादांना अजरामर करून गेला. आज वयाची ७७ वर्ष झाली तरी ह्या आवाजाची नशा उतरलेली नाही. आजही तितक्याच जोशात हा आवाज नुसता भारत नव्हे तर पुर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडतो ह्यात सगळं आलं.

१० ऑक्टोबर आणि ११ ऑक्टोबर दोन्ही दिवस दोन्ही व्यक्तींसाठी आणि त्यांच्या सिलसिला साठी प्रत्येक चित्रपट प्रेमींच्या लक्षात आहेत.

मैं और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते हैं
तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती, तुम वो कहती
तुम इस बात पे हैरां होती, तुम उस बात पे कितनी हँसती
तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता
मैं और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते हैं......

तन्हाई तेच एक अदृश्य नातं त्या दोघांनी पडद्यावर साकारलं आहे. लांब राहुन सुद्धा कोणाच्या तितकचं जवळ राहता येतं हे कदाचित आजच्या पिढीला कळणार ही नाही. आज वयाची ६५ वर्ष पुर्ण केलेली असो वा ७७ वर्षाचं आयुष्य जगलेलं असो पण तो ग्रेस, ते अव्यक्त प्रेम, ती नजर आणि त्या वलया भोवती असलेलं पडद्यावरचं रहस्य आजही करोडो लोकांना कळलेलं नाही. रेखा च्या शब्दात सांगायचं झालं तर,

' जो जितना दुर हो उतना ही पास रेहता है'

काळ पुढे गेला, नवीन पिढी आली, जगण्याचे संदर्भ बदलले पण आजही त्या पडद्यावर सादर केलेल्या अव्यक्त प्रेमाची जादु आजही प्रत्येक प्रेयसी आणि प्रेमविराला तितकचं वेड लावते.

कधी कधी काही न सांगता पण बरच काही सांगता येते तर कधी,

'अब आप सामने हैं तो कुछ नहीं है याद, वरना कुछ आपसे हमें कहना जरूर था.....'

'रेखा यही अच्छा है... ये ज़मीन पे तुम भी रहोगी, मैं भी रहूंगा... फर्क सिर्फ इतना हैं की हम दोनों के बिच एक फासला बना रहेगा.. और हैं फासला बहुत ज़रूरी है'......

शब्दातुन बरच काही सांगताना पण काहीच न सांगता प्रेम करता येणं कदाचित त्यांनी पडद्यावर साकारलेल्या एका वेगळ्या नात्याचं यश असेल. अनेक वर्ष गेली पण ते अव्यक्त नातं येणाऱ्या कित्येक पिढयांना हेच सांगत राहील....

'प्यार का मतलब हासिल करना नहीं होता'...

प्रेमाच्या एका अव्यक्त नात्याला इतकं सुंदर रूप देऊन ते पडद्यावर साकारणाऱ्या त्या दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Monday 7 October 2019

ऑर्बिटर च्या नजरेने... विनीत वर्तक ©

ऑर्बिटर च्या नजरेने... विनीत वर्तक ©

चंद्रयान २ च ऑर्बिटर आपल्या कक्षेत परीक्रमा करत असुन विक्रम ल्यांडर च्या सॉफ्ट लॅण्डिंग च्या अपयशानंतर ऑर्बिटर च्या वैज्ञानिक उपकरणांनी आपलं काम करायला सुरवात केली आहे. ऑर्बिटर वरील एक उपकरण क्लास ( Chandrayaan 2 Large Area Soft X-ray Spectrometer ) ने नुकतेच 'चार्ज पार्टीकल' ओळखल्याची घोषणा इसरो ने काही दिवसांपूर्वी केली आहे. नक्की हे 'चार्ज पार्टीकल' म्हणजे काय? चंद्रयान २ च्या क्लास ने नक्की काय वेध घेतला? ह्या सगळ्याचा विज्ञानाशी काय संबंध? असे अनेक प्रश्न सामान्य लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. ह्याच प्रश्नांचा एका नव्या नजरेतुन मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.

आपल्या पृथ्वीवर जिवसृष्टी अस्तित्वात यायला जसं इथलं वातावरण, पाणी, तापमान कारणीभुत आहे तसं ह्या वातावरणाचं रक्षण करणार एक अदृश्य कवच ही तितकच जबाबदार आहे. हे कवच म्हणजेच पृथ्वीचा मॅग्नेटोस्पियर. पृथ्वी ही खुप मोठ्या चुंबका सारखी आहे. पृथ्वीच्या गर्भात होणाऱ्या डायनॅमो च्या उलथापालथीमुळे ह्या चुंबकाच्या चुंबकीय लहरी पृथ्वीच्या ध्रुवावरून निघुन पृथ्वीच्या बाजूने प्रवास करत असतात. आपला सुर्य प्रकाशासोबत अनेक अतिनील किरणे ही सौर मंडलात पाठवत असतो. जवळपास १ मिलियन मैल प्रति तास ह्या वेगाने ही किरणे पृथ्वीवर आदळतात. पण त्यांच्या रस्त्यात आडवी येतात त्या पृथ्वीच्या चुंबकीय लहरी. ह्या लहरी ह्या किरणांना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू देतं नाही. त्यामुळेच पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं रक्षण ह्या अतिनील किरणांपासुन होते. तब्बल ४.२ बिलियन वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर ह्याच चुंबकीय लहरींच अस्त्तिव नष्ट झालं आणि मग मंगळावरील वातावरणाला सुर्याच्या अतिनील किरणांनी नष्ट केलं. त्याचा परीणाम म्हणुन मंगळ ग्रह आज एक दगड धोंड्यांचा ग्रह बनुन राहिला आहे. एखाद्या वेगात जात असलेल्या वाहनावर ज्याप्रमाणे हवेचा प्रतिरोध दिसुन येतो त्याच प्रमाणे ह्या चुंबकीय लहरींचा प्रभाव वेगाने जाणाऱ्या अतिनील किरणांवर पडतो. एक अंडाकृती अदृश्य असं कवच पृथ्वीच्या भोवती तयार होते. ह्या कवचाची उंची पृथ्वीच्या त्रिजेच्या ३-४ पट असुन सूर्याच्या विरुद्ध दिशेला ह्याचा प्रभाव पसरलेला असतो आणि कमी होतं जातो. ह्या प्रभावाची नक्की लांबी माहित नसुन साधारण १००० पट पृथ्वीच्या त्रिजेच्या ह्याची लांबी असावी असा एक अंदाज आहे. हे चुंबकीय क्षेत्र आणि त्याचा प्रभाव सुर्याच्या अतिनील किरणांवर अवलंबुन असतो.

पृथ्वीच्या मागच्या बाजूला म्हणजेच सूर्याच्या विरुद्ध दिशेने असणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाला जिओटेल असं म्हणतात. ह्याचा प्रभाव चंद्राच्या कक्षाच्या पलीकडे पण जाणवतो. चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करत असताना तो साधारण प्रत्येक २९ दिवसांनी ह्या जिओटेल च्या क्षेत्रातुन प्रवास करतो. चंद्र साधारण ६ दिवसात ह्या जिओटेल च्या दोन्ही बाजुंना छेद करून पृथ्वीच्या भोवती परिक्रमा करतो. चंद्रयान २ चं ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत स्थापन झाल्यावर त्याच्या वरच्या क्लास ह्या उपकरणाने चंद्रासोबत ह्या पट्यातून जाताना ह्या अतिनील किरणातील कणांचा अभ्यास केला. क्लास हे उपकरण अनेक मूलद्रव्यांचा शोध घेण्यास सक्षम आहे. ते Na, Ca, Al, Si, Ti, and Fe अश्या मूलद्रव्यांच अस्तित्व शोधु शकते. क्लास ह्या उपकरणाने ह्या क्षेत्रातील चार्ज असणाऱ्या पार्टीकल चा अभ्यास केला. ज्यामुळे नक्की ह्या चुंबकीय क्षेत्रामुळे त्यांच्यावर काय प्रभाव पडतो? ह्या रहस्यावर प्रकाश पडणार आहे. तसेच ह्या बद्दलची महत्वाची माहिती जागतिक संशोधनासाठी उपलब्ध होणार आहे. चंद्र जेव्हा जेव्हा ह्या जिओटेल मधुन जाईल तेव्हा तेव्हा क्लास ह्या क्षेत्राचा अभ्यास करणार आहे. (विनीत वर्तक ©)

क्लास च्या अभ्यासामुळे पृथ्वीच्या सुरक्षाकवचाच्या एकूणच प्रक्रियेचा अभ्यास करता येणार आहे. तसेच सूर्याच्या अतिनील किरणांचा प्रभाव कसा बदलतो ह्या बद्दल ही माहिती मिळणार आहे.

“Dance of electrons to the music of magnetic fields”

ह्या गोष्टीचा अभ्यास येत्या काही काळात क्लास आणि पर्यायाने इसरो करणार आहे. चंद्रयान २ चं ऑर्बिटर येत्या काळात चंद्राच्या तसेच पृथ्वीच्या काही रहस्यांवर प्रकाश टाकेल अशी अपेक्षा आणि विश्वास इसरो ला आहे.

फोटो स्रोत :- गुगल



सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.