Monday 25 July 2016

उंचच उंच... विनीत वर्तक

माणसाला उंचीच कायम आकर्षण राहील आहे. अगदी पाच हजार वर्षापूर्वी पिऱ्यामिड बांधताना ते उंच असतील अस बघितल गेल. जवळपास १५० मीटर इतके उंच ते उभारले गेले. आजही इतक्या शतकानंतर माणसाची उंचच उंच जाण्याची शर्यत सुरु आहे. अश्या काही उंचच उंच वास्तू जवळून बघण्याचा तसेच त्या उंचीवर जाऊन जमिनीकडे बघण्याचा योग कामाच्या निमित्ताने आला. प्रत्येक वास्तू हि मानव निर्मित असली तरी प्रत्येकाच एक वेगळच वैशिष्ठ आहे. त्यातील दोन वास्तू माझ्या खूप जवळच्या आहेत. थ्रिलिंग वाटेल आणि उंचीचा किंवा खोलीचा एक वेगळ्याच अनुभव देणाऱ्या वास्तू आयुष्यात प्रत्येकांनी शक्य असेल तर एकदा तरी नक्कीच अनुभवाव्यात.

जगातील उंच बिल्डींग म्हणजे पेट्रोनास टॉवर (कौलालंपूर- मलेशिया), एम्पायर स्टेट ( न्यू योर्क- अमेरिका ), वर्ल्ड ट्रेड सेंटर किंवा आताचा फ्रीडम टॉवर ( न्यू योर्क- अमेरिका), बाययोके टॉवर – टू (ब्यांग्कोक -  ह्या वास्तू बघतानाचे क्षण नक्कीच अविस्मरणीय असेच होते. पायथ्याशी उभ राहून पूर्ण मान वर करून उंचीचा अंदाज घेताना माणसाच्या कौशल्य किती प्रचंड आहे ह्याची जाणीव होते. पण उंचीची सगळ्यात जास्ती जाणीव किंवा धाकधूक कुठे जाणवली असेल तर ते म्हणजे बुर्ज खलिफा ( दुबई- यु ए ई ).

मला भावलेली आणि आवडलेली जगातील सर्वात उंच मानव निर्मित वास्तू अशी बिरुदावली मिरवणारी हि बिल्डींग खरोखरीच अदभूत अशी आहे. तब्बल ८२९.८ मीटर उंच असणारी हि बिल्डींग तिच्या वेगळ्याच आकारामुळे खूप आवडली. बंडल ट्यूब अशी रचना असणारी हि बिल्डींग दुबईच्या कोणत्याही कोपर्यातून उठून दिसते. १४८ मजल्यावरून म्हणजे तब्बल ५५५ मीटर वरून दुबई बघताना स्तिमित व्हायला होते. चांगल्या वातावरणात आणि ओहोटीच्या वेळी इराण चा समुद्र किनारा हि दिसतो. दुबईतले रस्ते, बिल्डींग्स, कारंजे वरतून बघताना खूपच रोमांचित करणार आहे.

उंचीचा जाणवलेला दुसरा रोमांच मात्र वेगळाच आहे. उंचावर तर जाऊन आलो. पण आपल्या खाली प्रचंड खोल अशी दरी असेल तर. आपण चालताना खाली काहीच नाही असा भास झाला तर. एक क्षण अस वाटेल कि अस कस शक्य आहे. पण अस शक्य आहे ते ग्र्यांड केनियन स्काय वॉक येथे. घोडाच्या नालीच्या आकाराप्रमाणे असणारे हे स्काय वॉक पूर्णतः पारदर्शक आहे. कोलोऱ्याडो नदी पासून ह्याची उंची आहे ३५० मीटर. ह्यावरून चालत जाताना आपण हवेतून चालतो असाच भास होतो. तुटेल ह्या भीतीने लोक रेलिंग चे हात पण धरतात. तब्बल २४० मीटर उंचावरून आपण हवेतून चालत असतो. ग्र्यांड केनियन च्या दरीवरून चालताना चा क्षण हा मला सगळ्यात जास्ती रोमांचित करणारा वाटला. एक अनामिक भीती नक्कीच वाटत होती. क्यामेरा नेण अलाउड नसल्याने काही ते क्षण फोटोत बंदिस्त नाही करता आले पण मनात मात्र ते कायम कोरले गेले.


माणसाच्या अत्युच्य अश्या अभियांत्रिकीचे दाखले देणाऱ्या ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे माणसाच्या उंचच उंच स्वप्नांना दिलेले पंख आहेत. हवेत तरंगण्याचा आणि खूप उंचावरून खाली बघण्याचा आनंद लुटायचा असेल तर ह्या दोन्ही उंचीनां आपण एकदा तरी आयुष्यात भेट द्यायलाच हवी. 
विसात एक .. विनीत वर्तक

कालपासून उत्सुकता ताणली गेली होतीच. तब्बल एक - दोन नाही तर २० उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करण्यासाठी भारतीय अंतराळ संस्था अर्थात इस्रो ने कंबर कसली होती. २००८ ला तब्बल १० उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करून इस्रो ने एक जागतिक विक्रम केला होता. त्या नंतर नासा, रशियन स्पेस एजन्सी नि तो मोडला पण तरीही अश्या प्रकारे एकाच रॉकेट मधून वेगवेगळ्या कक्षेतील उपग्रहाना त्यांच्या योग्य त्या कक्षेत स्थापन करणे खरोखर रॉकेट सायन्स म्हणजेच अतिशय किचकट अशी प्रक्रिया आहे.

एकाच रॉकेट च्या सहायाने वेगवेगळ्या वजनाच्या, आकाराच्या, वेगवेगळ्या उपयोगाच्या भारतीय नव्हे तर तब्बल ४ वेगवेगळ्या राष्ट्रांच्या उपग्रहाना त्यांना हव्या असलेल्या कक्षेत स्थापन करणे हे आपल्या रॉकेट डिझाइन च खूप मोठ यश आहे. आपल्या घरातील वस्तू आपण आपल्याला हव्या तश्या किंवा घराला पूरक होतील अश्या डिजाइन करू शकतो. पण दुसर्यांच्या वस्तू आपल्या घरात सामावून घेऊन त्यांना समोरच्याला हव्या त्या ठिकाणी ठेवण जितक कठीण तितकच जगाच्या दोन टोकांवर निर्माण झालेल्या उपग्रहाना एकाच रॉकेट वरून प्रक्षेपित करण.

२० उपग्रहान पेकी १ भारताचा २ भारतातील युनवरसिटी चे त्यातील एक पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग चा स्वयंम तर सत्याबामा स्याट हा सत्याबामा युनवरसिटी चेन्नई चा होता. तब्बल १७ उपग्रह अमेरिका, क्यानडा, जर्मनी, इंडोनेशिया चे होते. १७ उपग्रह कमर्शियल मार्केट मध्ये इस्रो चा वाढत चाललेला दबदबा दाखवून देतात. आत्तापर्यंत १००% यश मिळवणाऱ्या इस्रो ची किमत जगातील सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे अनेक प्रायवेट उपग्रह पाठवणार्या संस्था जश्या एरियन, स्पेस एक्स वगरे ह्यांना प्रचंड अशी स्पर्धा निर्माण करत आहे. एकाच वेळी अनेक उपग्रह पाठवल्याने त्यामागचा खर्च प्रचंड कमी करण्यात इस्रो ला यश आल आहे.

अनेक उपग्रह पाठवताना अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात. ह्यातील एक म्हणजे एकाच वेळी सगळ्या उपग्रहांच प्रक्षेपण होऊ नये तसच त्यांची एकमेकांशी टक्कर होऊ नये म्हणून प्रक्षेपित करताना अंतर ठेवावे लागते. तसेच वेगवेगळ्या कक्षेत जाण्यासाठी वेगवेगळ्या अंतरावर अग्निबाण प्रज्वलित होणे गरजेचे असते. समजा ४ उपग्रह ५०० किमी च्या कक्षेत स्थापन केले तर पुढचे ५ कदाचित ५४२ किमी च्या कक्षेत असू शकतात अश्या वेळी अग्निबाण पुन्हा प्रज्वलित होऊन रॉकेट च्या सहायाने उरलेल्या ५ उप्ग्रहण ५४२ किमी च्या कक्षेत नेणे क्रमप्राप्त असते. अग्निबाणाला पुन्हा प्रज्वलित करून पुन्हा बंद करणे हि प्रक्रिया अतिशय जोखमीची असते. कारण हि उंची गाठायला ३-४ सेकंदाच प्रज्वलन फक्त गरजेचे असते. ते हि योग्य वेळेत म्हणजे गाडीच इंजिन नेमक्या वेळी फक्त ४ सेकंद चालू करायचं म्हंटल तर किती कठीण असेल ते हि चावी आपल्या हातात असताना तर मग काहीच कंट्रोल नसताना जमिनीवरून अवकाशात हे इंजिन सुरु करण किती क्लिष्ठ असेल ह्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.    

जर उपग्रहांची मांडणी बघितली तर ती वर्तुळाकार स्वरूपात असते. म्हणजे हे २० उपग्रह वर - खाली गोलाकार पद्धतीने ठेवलेले असतात. ह्याचा अर्थ प्रत्येक उपग्रहाला कक्षेत सोडण्यासाठी रॉकेटला स्वताला ओरीयंट करावे लागते. म्हणजे जो उपग्रह सोडणार तो त्या दिशेने वळवावा लागतो. कक्षेची उंची आणि उपग्रहाची दिशा ह्याचा योग्य तो समन्वय साधल्या नंतरच त्याच प्रक्षेपण केल जात. अवघ्या २६ मिनिटात उड्डाण ते सगळ्या उपग्रहांची त्यांच्या कक्षेत मांडणी केली गेली. ह्यावरून किती प्रचंड गुंतागुंतीच्या प्रक्रिया पूर्ण केल्यावर हे यश मिळते. म्हणूनच विसात एक हे यश इस्रो , भारत आणि अवकाश संशोधनाच्या प्रचंड मोठा टप्पा आहे. येत्या काळात पी. एस. एल. व्ही च्या मदतीने एकाच वेळी अतिशय जास्त तफावत असणार्या कक्षेत उपग्रहांची मांडणी करण्याचा इस्रो च संशोधन चालू आहे. त्याच वेळी १००% यशासह पी. एस. एल. व्ही ने भारताची पताका अवकाशात खूप उंचीवर फडकत ठेवली आहे. 
The Man Who Knew Infinity... विनीत वर्तक

श्रीनिवास रामानुजन म्हणजे गणिताला पडलेल अदभूत स्वप्न. अवघ्या ३२ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी तब्बल ३९०० प्रमेय त्यांनी मांडलीत. त्यातील जवळपास सगळीच प्रमेय आता गणिताच्या भाषेत बरोबर आहेत हे आता सिद्ध झाल आहे. १८८७ ते १९२० अश्या छोट्या आयुष्यात त्यांनी जे गणितामध्ये काम केल. ते अजूनही कोणाला जमलेलं नाही. वयाच्या अवघ्या ३१ वर्षी लंडन येथील रॉयल सोसायटी ची फेलोशिप मिळाली. असा बहुमान मिळवणारे ते दुसरे भारतीय होते. १९१८ साली ट्रिनिटी कॉलेज केंब्रीज ची फेलोशिप सुद्धा त्यांना मिळाली. हा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय होते.

गणित आणि अवकाश ह्या दोन्ही क्षेत्रात भारत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. भारतीयांच्या ह्या बुद्धिमत्तेचे अटकेपार झेंडे जर कोणी लावले असतील तर श्रीनिवास रामानुजन ह्यांनी. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी गणितातील ५००० थियरम वाचून काढली होती. पुढल्याच वर्षी म्हणजे अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी बर्नोली नंबर तसेच युरल- मास्चोरेनी कोन्सटट त्यांनी १५ डेसिमल प्लेसेस पर्यंत आकडेमोड केला होता. ह्या वयात अश्या अदभूत बुद्धिमत्तेने त्यांनी जगात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. त्यांनी सबमिट केलेले पेपर तर त्या काळातील गणिती विद्वानांना हि बुचकळ्यात टाकत होते.

पण ह्या बुद्धिमत्तेला जी. एच. हार्डी ह्या इंग्लिश गणित तज्ञाने ओळ्खल आणि त्यांना संशोधनासाठी इंग्लंड ला बोलावलं. रामानुजन जे कार्य केल त्यांच्या विद्वत्तेला हार्डी ह्यांनी आपल्या एका वाक्यात सगळ स्पष्ट केल आहे.

Hardy's personal ratings of mathematicians. Suppose that we rate mathematicians on the basis of pure talent on a scale from 0 to 100, Hardy gave himself a score of 25, J.E. Littlewood 30, David Hilbert 80 and Ramanujan 100.'"

रामानुजन ह्यांनी गणितातील असे शोध लावले ज्यावर प्रचंड अस संशोधन आजही चालू आहे .

His original and highly unconventional results, such as the Ramanujan prime and the Ramanujan theta function, have inspired a vast amount of further research.”

हार्डी आणि रामानुजन नंबर १७२९ हा हि एक गणिती शोध रामानुजन ह्यांनी लावला. ह्याच्या मागची कथा मोठी मजेशीर आहे.

The number 1729 is known as the Hardy–Ramanujan number after a famous visit by Hardy to see Ramanujan at a hospital. In Hardy's words:[94]
I remember once going to see him when he was ill at Putney. I had ridden in taxi cab number 1729 and remarked that the number seemed to me rather a dull one, and that I hoped it was not an unfavorable omen. 'No', he replied, 'it is a very interesting number; it is the smallest number expressible as the sum of two cubes in two different ways.'
Immediately before this anecdote, Hardy quoted Littlewood as saying, "Every positive integer was one of [Ramanujan's] personal friends."[95]
The two different ways are
1729 = 13 + 123 = 93 + 103.
Generalizations of this idea have created the notion of "taxicab numbers".


असा हा भारतीय गणितज्ञ आपल्या मागे एक खूप मोठा वारसा ठेऊन गेला. पण आपल्याच पूर्वजांना विसरण्यात धन्यता मानणारे आपण जेव्हा जगाने नोंद घेतली जाते. तेव्हा जागे होतो. सलमान खान, शाहरुख खान आणि आमीर खान मध्ये डूबलेल्या त्यांचे तद्दन फालतू आणि टुकार पिक्चर बघण्यासाठी तिकीटबारीवर गर्दी करणाऱ्या सो कोल्ड सुजाण प्रेक्षकांना ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर एक चांगला सिनेमा येऊन गेला हे माहित हि नसेल.


ज्यांच्या स्मरणार्थ आपण २२ डिसेंबर हा दिवस गणिती दिवस साजरा करतो. त्या भारताच्या अदभूत गणिती तज्ञावर हॉलीवूड ने एक सिनेमा काढला. देव पटेल चा हा चित्रपट चुकवू नये असाच होता. पण टुकार खानांच्या गर्दीत जगाला गणित शिकवणाऱ्या गणित तज्ञाच्या आयुष्य जवळून अनुभवण्याचा योग मात्र आपण हरवून बसलो. म्हणून कदाचित फायनाइट मद्धे रमणाऱ्या लोकांना कस कळणार... “The Man Who Knew Infinity
हे विश्व आमुचे घर...  विनीत वर्तक

मनुष्य प्राणी कितीहि मोठा झाला तरी तो ह्या विश्वाच्या मानाने किती सूक्ष्म आहे. ह्याचा विचार केला तर भोवळ येईल. ज्या पृथ्वीवर आपण नांदतो. ती एका सोलार सिस्टीम चा भाग आहे. ह्यातील सगळ्यात मोठा ग्रह गुरु आहे. पृथ्वी तब्बल १२० पट गुरुपेक्षा लहान आहे. आपली पूर्ण सोलार सिस्टीम ज्या आकाशगंगेचा भाग आहे त्या मिल्की वे च्या मध्य भागापासून आपली सोलार सिस्टीम तब्बल ३०,००० प्रकाश वर्ष दूर आहे. (एक प्रकाशवर्ष म्हणजे एका वर्षात प्रकाश कापेल ते अंतर. प्रकाशाचा वेग आहे तब्बल ३ लाख किमी प्रती सेकंद) म्हणजे आता जो प्रकाश आपल्याला दिसतो आहे आपल्या आकाशगंगेतील तो तब्बल ३०,००० वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे तिकडे आता काय चालू असेल ते समजायला अजून ३०,००० वर्ष जावी लागतील. आपल्या आकाशगंगेत अश्या किती सोलार सिस्टीम असतील. ज्याच्या बद्दल आपण पूर्णतः अनभिज्ञ आहोत.

हि तर झाली आपली आकाशगंगा आता आपल्या शेजारील सगळ्यात जवळची आकाशगंगा आहे स्पायरल अन्द्रोमेडा. ती तब्बल २.५३७ मिलियन प्रकाशवर्ष लांब आहे. ( तेथून निघालेला प्रकाश हा २.५३७ मिलियन वर्षा पूर्वीचा आहे. ). अश्या छोट्या आकाशगंगेचा मिळून एक ग्रुप तयार केला आहे. त्याला वर्गो सुपर क्लस्टर अस म्हंटल जाते. त्यात मिल्की वे, अन्द्रोमेडा सारख्या हजारो आकाशगंगा आहेत. प्रत्येक आकाशगंगेत बिलियन सूर्य आहेत आणि अगणित ग्रह. म्हणजे हजारो आकाशगंगेत किती सूर्य असतील ह्याची मोजदाद करायला अंक कमी पडतील.

आता हे प्रचंड वर्गो सुपर क्लस्टर विश्वाचा एक छोटा भाग पण नाही. असे १०० बिलियन सुपर क्लस्टर आहेत. सध्यातरी इतकच विश्व आपण बघू शकलो आहोत. त्या विश्वाची व्याप्ती अजून किती मोठी आहे कि तिथवर आपण जाउच शकलेलो नाहीत. ह्याच कारण तिकडून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत अजून पोहचू शकलेला नाही. १३.५ बिलियन वर्षापूर्वी विश्वाची उत्पत्ती झाली अस म्हणतात. कदाचित तिकडून निघालेला प्रकाश पोचायला अजून काही मिलियन, बिलियन वर्ष लागतील. हे सगळ वाचून स्तिमित व्हायला होत नाही का? आपण ह्या सर्वात किती क्षुद्र आहोत नाही का?

मानव निर्मित सगळ्यात दूरवर गेलेली गोष्ट म्हणजे वोयेजर १ हे यान. सप्टेंबर ५ , १९७७ सोडलेलं यान आता जून २०१६ पर्यंत तब्बल सूर्यापासून फक्त २.०२ X १० च्या १० व्या घाता इतक लांब गेल आहे. ज्याला इंटलस्टेलर स्पेस अस म्हणतात. अवकाश अंतराच्या मानाने हे अंतर काहीच नाही. ३८ वर्ष तब्बल १५-१६ किमी / सेकंद ह्या वेगाने प्रवास केल्यानंतर अजून सुद्धा हे यान संदेश पाठवत आहे. २०२५ पर्यंत पाठवत राहील अस नासा च म्हणन आहे. त्या नंतर जर काही आदळल नाही तर ह्याचा प्रवास असा सुरु राहील. ३०० वर्षानी ते ओर्ट क्लाउड मध्ये प्रवेश करेल. तब्बल ३०,००० वर्षांनी त्यातून बाहेर पडेल. ह्यानंतर सुद्धा त्याचा प्रवास सुरु राहिला तर ४०,००० वर्षांनी ग्लीसे ४४५ ह्या तार्या जवळ पोचेल. जो आपल्या पासून १.६ प्रकाश वर्ष दूर आहे. विश्वाचा पसारा किती प्रचंड आहे त्यात आपण एक थेंब सुद्धा नाही आहोत.


ज्या सर्व गोष्टीचा मोठेपणा आपण बाळगतो, अभिमान बाळगतो त्या ह्या विश्वाच्या पसार्यात किती क्षुद्र आहेत हे वाचल्यावर स्पष्ट झालच असेल. विश्वाची उत्पत्ती हे क्यालेंडर मानल. म्हणजे ज्या दिवशी विश्व जन्माला आल तो दिवस १ जानेवारी मानला आणि शेवट ३१ डिसेंबर ठरवला. प्रत्येक महिना १ बिलीयन वर्ष प्रत्येक दिवस ४० मिलियन वर्ष तर मानव उत्पत्ती पासून ते आजपर्यंतचा आपला इतिहास. ३१ डिसेंबर च्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटे आणि ५६ सेकंद. म्हणजे अवघ्या ४ सेकंदात सामावला आहे. ज्या मानव असण्याचा आपल्याला गर्व आहे. तो ह्या विश्वाचा किती क्षुद्र भाग आहे. तेव्हा विश्वाच वैश्विक रूप खूप प्रचंड आहे. आपण तिकडे कधी पोहचू शकत नाही. पण निदान ते समजून घेतल तरी ते हि नसे थोडके. 
बदललेली कार्यालय... विनीत वर्तक

कार्यालय किंवा ऑफिस म्हंटल कि आपल्यासमोर येतात फाईल्स चा ढीग. जळमटानां सोबत घेऊन रडत फिरणारे पंखे. नॉयलॉन च्या उसवलेल्या खुर्च्या आणि घड्याळाकडे बघत काम करणारी लोक. अस ८०-९० च्या दशकात असणार साधारण कार्यालयीन चित्र कॉम्प्यूटर च्या प्रवेशाने हळू हळू बदलून गेल. पंख्यांची जागा वातानुकुल हवेने घेतली. टेबलांची जागा क्युबिकल्स नि घेतली. फाईलींच्या जागी आता इमेल्स चे ढीग जमू लागले. षंढ चेहऱ्याने काम करणारे आता प्रेझेंटेशन साठी धावू लागले. घड्याळाचे काटे आता रात्र झाल्यावर दिसू लागले. उसवलेल्या खुर्च्यांची जागा आता रोलिंग चेअर ने घेतली.

पण हरवले ते चेहरे. लंच टाईम ला आज डब्यात काय? अस विचारत डल्ला मारणारे हात आखडले. कोबीच्या भाजी चा सुगंध आता हरवून गेला. टेबला शेजारी बसून एकमेकांनां चिमटा काढणारे ते हास्याचे बोल आता बंदिस्त झाले. सुख दुःखाचे चे शेअर आता तोंडाने नाही तर फेसबुक, व्हात्स अप च्या भिंतीमागून होऊ लागले. माणस बदलली पण व्यक्त होण्याची, काम करण्याची साधन, कार्यालय बदलली. तरी काम तीच. उलट वाढलेली टेन्शन, न संपणारे कामाचे तास, सतत कनेक्टेड राहण्याचा फार्स नकळत कुठेतरी हे सगळ माणसाच्या कार्य करणाच्या पद्धतीवर अतिशय वाईट पद्धतीने आपला ठसा उमटवायला लागल.

ह्याची सुरवात आत्ता आपल्याकडे झाली असली तरी अमेरिकेत ती आधीच झाली होती. म्हणूनच कुठेतरी ह्याला उत्तर शोधण्याची कसरत सुरु झाली. कार्यकुशलता कशी वाढवता येईल. ऑफिस हे ऑफिस न राहता कुठेतरी त्याला आपलेपणाचा, निसर्गाशी एकरूप करण्याचा प्रयत्न केला गेला. लोकांना कार्यालय-ऑफिस मध्ये  आल्यावर घराची आठवण होऊ नये इतक. त्यांनी स्वताला इतक गढून घ्यावं कि फक्त काम आणि काम. ह्या सर्वांचा परिणाम लगेच दिसून येऊ लागला. कंटाळवाण्या ऑफिस, कार्यालयाची जागा प्रशस्त जागे ने घेतली. अगदी भिंतीच्या रंगापासून बिल्डींग च्या आकारा पर्यंत सगळ्याचा विचार केला गेला.

काम करण्याची जागा, आजूबाजूचा निसर्ग, हवेचे तापमान, रंगसंगती, काम करण्याच्या वेळा, ह्यात सगळ्यात बदल झाले. स्पेशली काही कोर्पोरेट ऑफिस तर प्रेमात पडण्याची ठिकाण झाली. कारण शहराच्या भाऊ गर्दीत निसर्गाच्या सानिध्यात काम करता करता प्रेम करता आल तर अजून काय हवे. गुगल च्या ऑफिस बद्दल ऐकून होतो कि तिथला परिसर एकूणच ऑफिस हे निसर्गाला जोडलेलं आहे. २०१० साली जेव्हा अमेरिकेला गेलो तेव्हा माझ अमेरिकेतील ऑफिस बघून सर्दच झालो. प्रचंड असा एकरोवारी परिसर. पूर्ण हिरवळीने नटलेला. उंच उंच झाडांची गुंफण. जेवणाची जागा तर शब्दात मांडता येणार नाही इतकी सुंदर. एक छोटा तलाव त्याला चोहोबाजूने वेढलेली हिरवळ आणि झाडे. त्यात असणारे मासे, कासव त्याच्या अगदी बाजूला जेवण करण्याची व्यवस्था. जेवताना आपण कोणत्यातरी वनभोजनासाठी आलो आहोत असच वाटायचं.

पूर्ण अर्ध्या दिवसाचा क्षीण त्या एका तासात कुठे पळून जायचा कळायचा नाही. आसपासच्या त्या सौंदर्याने खरच कार्यकुशलतेवर परिणाम होतो ह्याचा अनुभव मी घेतला. अनेक लोकांशी बोलल्यावर सगळ्यांना ह्याचा अनुभव येत होता. जेवणापेक्षा त्या सुंदर तलावाकाठी नुसत बसून राहण हा एक अविस्मरणीय अनुभव होता. ऑफिस- कार्यालय इतक हि सुंदर असू शकते ह्यावर तेव्हा विश्वास बसला. हळू हळू हीच प्रथा भारतात हि येत आहे. मुंबई सारख्या शहरात हे कठीण असल तरी अश्यक्य नाही. बेंगलोर, हैद्राबाद मधील आय.टी कंपन्यांची ऑफिस हि अश्या तर्हेने आहेत.

बीइंग स्पेशल ... विनीत वर्तक

आपण बरेचदा कोणतही कार्य किंवा क्रिया करतो तेव्हा कोणाकडून तरी त्याचा उल्लेख व्हावा. ते बघितल जाव किंवा कुठेतरी त्या व्यक्तीने आपल्याला त्याची दाद द्यावी किंवा त्याची कदर करावी अस आपल्याला नेहमीच वाटते. अगदी छोट्यात छोटी गोष्ट का असेनात. पण ज्या व्यक्तीसाठी आपण ते करत आहोत त्या व्यक्तीचा प्रतिसाद आपल्याला खूप महत्वाचा असतो. परीक्षेत खूप चांगले मार्क मिळाल्यावर सगळ्यात जास्त छान वाटते. जेव्हा आपल्या पालकांची, शिक्षकांची कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडते. एखाद्या कलाकाराला सगळ्यात जास्ती आनंद होतो जेव्हा प्रेक्षकांकडून त्याच्या कलेची पावती मिळते. एखाद्या खेळाडूला सगळ्यात जास्ती आनंद होतो ऑलम्पिक मध्ये पदक मिळते तेव्हा. ह्या सर्व वेळी एकच फिलिंग असते ती म्हणजे बीइंग स्पेशल.

प्रत्येक वेळी माणस, कार्य बदलू शकेल पण फिलिंग तीच रहाते. आपण केलेल्या मेहनतीच चीज म्हणा किंवा आपल्या प्रयत्नांच यश हे तेव्हाच आपल्याला समाधान देते जेव्हा त्याचा आपल्याला अपेक्षित असलेल्या व्यक्तींकडून त्याचा सन्मान होतो. त्याची नोंद घेतली जाते. आयुष्यात अनेक शिखरे पादाक्रांत केली अगदी एवरेस्ट सुद्धा पार केला. तर तो क्षण, ती वेळ , ते यश शेअर करणार किंवा ज्याच्याशी शेअर करावस वाटणार बरोबर असेल तर त्याच वेळी त्याच समाधान मिळते. एवरेस्ट सर करून सुद्धा त्याची दखल घेणार कोणी नसेल तर त्या यशाला काहीच अर्थ नसतो. चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळी प्रमाणे

डोळे पुसणार कोणी असेल
तर डोळे भरून यायला अर्थ आहे.
कोणाचे डोळे भरणार नसतील
तर मरण सुद्धा व्यर्थ आहे.


प्रेमात, नात्यात मग ते कोणताही नात असो. त्या माणसाला आपल्या छोट्या गोष्टीची जाणीव असावी हीच आपली माफक अपेक्षा असते. एक बंगला, गाडी, सोने जे करू शकणार नाही ते एका मिठीत असते. हाताने पकडलेल्या मुठीत असते, खांद्यावर ठेवलेल्या डोक्यावर असते अन पुसलेल्या अश्रूत असते. बीइंग स्पेशल हि फिलिंग इतकी सुंदर असते कि त्या साठी माणूस काही पण करू शकतो. प्रेमात अजून काय असते? ज्या प्रेमासाठी माणस कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. ती ह्याच फिलिंग साठी तर. प्रेम म्हणजे तरी काय? तो एक कटाक्ष, ती एक नजर, ते दिलेली साथ. सगळच बीइंग स्पेशल.

पण नेहमीच आपण रीसिविंग एंड ला का रहाव. आपण हि होऊन शकतो कि कोणाच्या आयुष्यात ते बीइंग स्पेशल. त्याची एक वेगळीच मज्जा असते. कधी तरी अनुभवून बघा. विश्वासाने दिलेली साथ मित्र, बायको ते मैत्रीण, नवरा सगळ्या नात्यात. तुझ्यामुळे आज हे शक्य झाल. किंवा तू होतास / होतीस म्हणून मी इथवर पोहचू शकले / शकलो. ह्यात त्या व्यक्तीला तर समाधान देतेच पण आपल्याला त्याहून जास्ती वेगळी अनुभूती देते. आपण हि कोणासाठी तरी स्पेशल आहोत हि फिलिंग आपलाच उत्कर्ष करणारी आहे.


त्यासाठी काही जास्ती कराव लागत नाही. कोणताही क्लिमिष मनात न ठेवता देत राहिलो कि हळूच ते येत. ते न विकत घेता येत, ना ओरबाडून घेता येत, न कोणाला सांगून मागता येत. ते कमवाव लागते आपल्या कृतीतून. ती कशी, केव्हा, कुठे करावी हे ज्याच त्यान ठरवावं. ती व्यक्ती कोणती हे सुद्धा. सगळच आपल्या मनाप्रमाणे होईल अस नक्कीच नाही. पण समोरून जरी परत नाही मिळाल तरी आपली निष्पक्ष भावनेने केलेली कृती आपल्याच मनात स्वताला बीइंग स्पेशल करतच असते नाही का?         
ह्युमन डिव्हाईन रिलेशन .. विनीत  वर्तक

माणूस हा कळपात राहणारा प्राणी आहे. जन्मल्यापासून जी नाळ जोडली जाते ती मरेपर्यंत कोणाशी न कोणाशी जोडलेली असते. आई पासून होणारी सुरवात मग बहिण – भाऊ ते मित्र- मैत्रीण अशी होत जोडीदारा पर्यंत कधी येऊन पोहचते आपल्यालाच कळत नाही. जोडीदार आयुष्यात आल्यावर मात्र तोच आपल सर्वस्व मानून कित्येक जण आयुष्य काढतात. खूप जणांच्या बाबतीत खरे हि असेलच पण सगळ्यांच्या बाबतीत मात्र ते कुठेतरी त्या सत्यापासून खूपच लांब असते.

आयुष्यात जोडीदार कसा असावा ह्याचे ठोकळे प्रत्येकाचे वेगळे असतात. खूप सारे कोन त्याला असतात. प्रत्येक कोन जुळेल अस नाही. त्यामुळे कुठेतरी फट रहातेच. बर्याचदा आपण स्वतःला किंवा जोडीदाराला बदलवून ती फट कमी करत असतोच. पण पूर्ण बसलेल्या कोनाची मज्जा त्याला येत नाही. अर्थात आयुष्य हेच तर असते. जुळलेले कोन आणी न जुळलेल्या फटी ह्याची जुळवाजुळव करण्यात ते कसे निघून जाते आपल्याला समजत हि नाही.

पण कधी सगळेच कोन जुळणारा ठोकळा मिळाला तर? विचार करूनच खूप वेगळ वाटत असेल नाही का? असा कोणीतरी किंवा अशी कोणीतरी जी आपल्याला सगळ्याच लेवल वर समजून घेईल. आपण जसे आहोत तस अगदी सेम. विचारांची बैठक, स्वभाव, एकूणच व्यक्तिमत्व अगदी आपल्यासारखच. ज्याच्याशी बोलताना समाजाने लावलेली सगळी झापड विरगळून पडतील. ते नात दिसण, रंग , रुप आणि इतर तत्सम जाणीवेपलीकडे असेल.

असा जुळणारा ठोकळा मिळतो तेव्हा ते रिलेशन डिव्हाईन असते. म्हणजे आपण विचार करू शकतो त्या पलीकडे. ती व्यक्ती जोडीदार असेलच अस हि नाही. आपल्या वयाची असेल अस हि नाही. आपल्याला प्रत्यक्ष भेटेल असही नाही. भेटली तरी ती प्रत्येक वेळी आपल्या सोबत असेल अस हि नाही. पण तरीसुद्धा तीच असणं आपल्याला पदोपदी जाणवते. तीच असण आपल्याला आधार देते. त्या व्यक्तीचा एक शब्द सुद्धा आपला मूड चेंज करू शकतो. ती व्यक्तीच्या अस्तित्वाने आपल्याला छान वाटते. ती व्यक्ती आपल्याला सगळ्या अस्तित्वाच्या पलीकडे एक डिव्हाईन ब्लिस देऊ शकते. जर ते नाते बनले तर ती रिलेशनशिप आपल्याला परमोच्च समाधान देऊ शकते. सुख आपल्याला कोणत्याही रिलेशनशिप मद्धे मिळू शकते पण आपल्याला समजून घेणार, समजून सांगणार कोणी असेल तरच समाधान मिळते.

कोणी हेच प्रेम असही म्हणेल पण प्रेमात अपेक्षा येतात सगळ्याच बाबतीत मग त्या इमोशनल असो, फिजिकल असो. प्रेमात तिसर कोणी स्वीकारता येत नाही. प्रेमात हेतू असतात. मग ते कोणत्याही पातळीवरचे असू शकतात. प्रेम हे एकांगी पण असू शकते बऱ्याचदा असतेही. प्रेम नेहमीच सुख देते अस  हि नाही. प्रेम खुपदा अव्यक्त असू शकते आणि त्याचे ठोकताळे आयुष्याच्या अनेक पातळीवर बदलत राहतात. पण डिव्हाईन रिलेशनशिप ह्या पलीकडे आहे. ती ह्या सगळ्या पलीकडे असते. तिसरी व्यक्ती असो वा चौथी त्याने आपल्याला ठोकळ्याच्या कोनात कोणताच बदल होत नाही. काळाच्या परिणामावर हि ते जूळलेले कोन तसेच राहतात. त्यात कोणतेही हेतू नसतात. फक्त त्याचं जुळण आपल्याला आत्मिक, अत्युच्य अस समाधान देते. अपेक्षा नसल्याने अपेक्षा आणि प्राप्ती ह्यातल अंतर शून्य असते. त्यामुळे गैरसमज, भांडण किंवा हेवेदावे ह्याला काही जागाच नसते.

डिव्हाईन रिलेशन समजणे तस सोप्प आहे. देव किंवा परमात्म्या सोबत तर आपल नात डिव्हाईन असतेच कि. तो कुठेच दिसत नाही. तो कधीच काही बोलत नाही. पण त्याच अस्तित्व आपल्याला जाणवत रहाते. त्याची साथ, सांगत किंवा नुसत्या विचारांची सांगत सुद्धा अत्युच्य अस समाधान देते. ज्या वेळेस तो आपल्याशी बोलतो किंवा समजून घेतो तेव्हा मिळणार समाधान दुसर्या कोणत्याच गोष्टीत येत नाही. तिकडे फक्त असते ब्लिस. एक अत्युच्य समाधानाचा क्षण पण हेच सगळ एखाद्या माणसात आपल्याला मिळाल तर ते नात ह्युमन डिव्हाईन रिलेशन असेल. एक वेगळच पण संपूर्ण असलेल. कदाचित तुमच्या आयुष्यात असेल हि, किंवा असून हि तुम्हाला जाणवलेल नसेल, किंवा अजून यायचं हि असेल. पण तस जर कोणी आपल्या हयातीत आपल्याला भेटल तर आपण स्वताला खूप भाग्यवान समजावं. कारण जिकडे ५० वर्ष बरोबर राहून संसार होतात तिकडे अस कोणीतरी एका क्षणात त्या ५० वर्षाचं समाधान देत.