Thursday 30 June 2022

Tejomay Tejas... Vinit Vartak ©

 Tejomay Tejas... Vinit Vartak ©

In 1983, the then government set up the Aeronautical Development Agency (ADA) to make India self-sufficient in fighter jets. The Light Combat Aircraft (LCA) project was then undertaken with the help of Aircraft Research and Design Center (ARDC) of Hindustan Aeronautics Limited (HAL). The process of actually landing the aircraft from the drawing board, even with no experience in fighter aircraft construction, was delayed for a number of reasons. For the first time in almost 28 years, the Tejas received initial approval for the flight. After going through many tests and changes, in 2019, Tejas got a certificate of readiness for battle or what is called final clearance. In these 28 years, the Tejas has become even brighter through many changes and by 2022, the same name is being taken in the global market today as an equivalent fighter in its class.

Three categories of Tejas aircraft are being formed today. It includes Tejas M. K. 1, Tejas M. K. 1A and trainer. The Tejas was built by India mainly to replace MiG-21s. Indian Air Force ordered 40 M. K. 1, 70 M. K.1A, and 10 trainer aircraft from H.A.L. is given. While meeting the needs of the Indian Air Force, Tejas is now beginning to make its mark in the international market. India has offered the option of transferring technology while landing its Tejas aircraft at full capacity in the fighter jet market.

As part of this, H.A.L. Has announced plans to open a Tejas aircraft manufacturing plant in Egypt. Egypt is currently looking to buy about 70 aircraft to replace its outdated trainer aircraft. India's Tejas is at the forefront. The issue has been under discussion between Egyptian and Indian officials for the past few months, and in the coming days, senior officials of the Egyptian Air Force will visit HAL in India on the occasion. They will see Tejas Assembly Line on this occasion. They will be shown how the overall Tejas is built and maintained there. H.A.L. has also put forward a proposal to build Advanced Light Helicopter (ALH) and Light Combat Helicopter (LCH) with Tejas.

India has taken steps to make Egypt it's fighter and helicopter hub. On the one hand, it wants to get orders for 70 fighter jets, and on the other hand, it wants to make Tejas a dominant entity by entering the markets of Middle East and North African countries from Egypt. Although the United States, France, Russia and European countries are leading in the production of fighter jets, not every country in the world can afford them. India is the cheapest but at the same time build world class fighter jet and helicopter. China also offer cheap aircraft but they are not reliable. That is the reason many African and Middle East countries are ready to buy such cheap but reliable aircraft and helicopters from India. Priced at around 42 million, the Tejas is the cheapest fighter in its class. The Tejas has become even brighter with Uttam AESA Radar, DARE Unified Electronic Warfare Suite (UEWS), self protection jammer (SPJ), instrument flight rules (IFR) and its pair of world class missiles like Astra BVRAAM and ASRAAM.

Negotiations for a Tejas purchase agreement between Malaysia and India are also said to be in the final stages. India has offered a complete package deal for Malaysia, including the maintenance of the Tejas aircraft and the maintenance of spare parts for the Sukhoi 30 aircraft. Malaysia needs about 36 light combat aircraft. Main battle is between India's Tejas and Turkey's Hurjet. Turkish aircraft have not yet shown their capabilities. They are on paper. At the same time, India's Tejas has shown its mettle at the Singapore Air Show. Another plus point of the agreement with India is that India will take over the responsibility of maintaining Malaysia's Sukhoi 30 aircraft. India has over decades of experience in maintaining Sukhoi 30 aircraft. Therefore, India will be instrumental in keeping Malaysia's Sukhoi 30 aircraft in the air. India will sell a Tejas to Malaysia for around US 50 million. The entire deal is worth more than 900 million.

Though India has wasted many years in the production of Tejas, the right presentation in the international market is slowly increasing Tejas sell. If the agreement is signed with Malaysia and Egypt, Everyone will be agree that Tejas has made its mark in the international market. The Irrigation Agreements will provide India with a large amount of foreign exchange, but at the same time, it will be another step towards self-reliance. My heartfelt salute to all the engineers, scientists, staff who contributed to the creation of Tejas.

Jai Hind !!!

Photo Search Courtesy: - Google

Note: - The wording in this post is copyrighted.



तेजोमय तेजस... विनीत वर्तक ©

 तेजोमय तेजस... विनीत वर्तक ©

१९८३ मधे भारताला लढाऊ विमानात आत्मनिर्भर करण्यासाठी तत्कालीन सरकारने  Aeronautical Development Agency (ADA) ची स्थापना केली. मग Aircraft Research and Design Centre (ARDC) of Hindustan Aeronautics Limited (HAL) च्या साह्याने Light Combat Aircraft (LCA) हे प्रोजेक्ट हाती घेण्यात आलं. लढाऊ विमान बांधणीचा कोणताही अनुभव नसताना अगदी ड्रॉईंग बोर्ड पासून प्रत्यक्षात विमान उतरवण्याच्या या प्रक्रियेला अनेक कारणांनी उशीर झाला. जवळपास २८ वर्षाच्या कालावधी नंतर तेजस ला पहिल्यांदा उड्डाणासाठी प्राथमिक मान्यता मिळाली. नंतर अनेक चाचण्या आणि बदलातून जात २०१९ साली तेजस ला लढाईसाठी सज्ज असल्याचं प्रमाणपत्र किंवा ज्याला फायनल क्लिअरन्स म्हणतात तो मिळाला. या २८ वर्षात तेजस अनेक बदलातून अजून तेजोमय होत गेलं आणि २०२२ येईपर्यंत त्याच्या श्रेणीतील एक तुल्यबळ असं लढाऊ विमान म्हणून त्याच नाव आज जागतिक बाजारपेठेत घेतलं  जाते.  

तेजस विमानांच्या तीन श्रेणी आज बनत आहेत. त्यात तेजस एम. के. १, तेजस एम. के. १ ए आणि ट्रेनर. तेजस ची निर्मिती भारताने मुख्यतः मिग २१ विमानांना बदलण्यासाठी केली गेली आहे. भारतीय वायू सेनेने ४० एम. के. १, ७० एम. के. १ आणि १० ट्रेनर विमानांची ऑर्डर एच.ए.एल. दिलेली आहे. भारतीय वायू सेनेची गरज पूर्ण करताना आता तेजस ने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या कर्तृत्वाची छाप सोडायला सुरवात केली आहे. भारताने आपलं तेजस विमान हे लढाऊ विमानांच्या बाजारात पूर्ण क्षमतेने उतरवताना तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचा पर्याय ही उपलब्ध केला आहे. 

याचाच एक भाग म्हणून एच.ए.एल. ने इजिप्त मधे तेजस विमान निर्मितीचा कारखाना उघडण्याची तयारी दर्शवली आहे. इजिप्त सध्या त्याच्या जुन्या झालेल्या ट्रेनर विमानांना बदली करण्यासाठी जवळपास ७० विमानांच्या खरेदीसाठी उत्सुक आहे. यात भारताचं तेजस सगळ्यात पुढे आहे. गेले काही महिने इजिप्त चे अधिकारी आणि भारताचे अधिकारी यांच्यात या बद्दल चर्चा होत असून येत्या काही दिवसात इजिप्त एअरफोर्स चे बडे अधिकारी या निमित्ताने भारतात एच.ए.एल. च्या तेजस असेम्ब्ली लाईन ला याच निमित्ताने भेट देणार आहेत. त्यांना तिकडे एकूणच तेजस ची निर्मिती कश्या प्रकारे केली जाते आणि त्याचा मेन्टनन्स कश्या प्रकारे केला जातो हे दाखवण्यात येणार आहे. एच.ए.एल. ने तेजस सोबत Advanced Light Helicopter (ALH) आणि Light Combat Helicopter (LCH) ची निर्मिती करण्याचा प्रस्ताव ही इजिप्त पुढे ठेवला आहे.

इजिप्त ला भारताच लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर केंद्र बनवण्याच्या दृष्टीने भारताने ही पावलं टाकली आहेत. एकीकडे ७० लढाऊ विमानांची ऑर्डर मिळवायची आणि त्याच सोबत इजिप्त मधून मिडल ईस्ट आणि नॉर्थ आफ्रिकन देशांच्या बाजारात शिरकाव करून तेजस ला हुकमी एक्का बनवण्याची ही चाल आहे. लढाऊ विमानांच्या निर्मितीत अमेरिका, फ्रांस, रशिया आणि युरोपियन देश पुढे असले तरी जगातील प्रत्येक देशाला त्यांच्या किमती परवडणाऱ्या नाहीत. चीन कडून घेतलेल्या विमानांचा भरवसा नाही अश्या वेळी स्वस्त पण त्याच वेळी जागतिक दर्जाची लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर जर कोणी देत असेल तर तो भारत आहे. अशी स्वस्त पण भरवसा असणारी विमान आणि हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी अनेक आफ्रिकन आणि मिडल ईस्ट देश तयार आहेत. साधारण ४२ मिलियन अमेरिकन डॉलर किंमत असणारं तेजस हे त्याच्या श्रेणीतील सगळ्यात स्वस्त लढाऊ विमान आहे.  Uttam AESA Radar, DARE Unified Electronic Warfare Suite (UEWS), self protection jammer (SPJ),  instrument flight rules (IFR) आणि त्याच्या जोडीला  Astra BVRAAM and ASRAAM सारखी जागतिक दर्जाची मिसाईल घेऊन येणाऱ्या तेजस तेज अजून तेजोमय झालं आहे. 

मलेशिया आणि भारत यांच्यामध्ये सुद्धा तेजस खरेदी कराराची बोलणी अंतिम टप्यात असल्याचं बोललं जात आहे. मलेशियासाठी भारताने संपूर्ण पॅकेज डील दिलेलं असून तेजस विमानांची देखभाल, त्यांचा मेन्टनन्स सोबत सुखोई ३० विमानांचे सुटे भाग देण्याचं ही स्पष्ट केलेलं आहे. मलेशिया ला जवळपास ३६ लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट हवे आहेत. भारताचं तेजस आणि तुर्की च हुरजेट यांच्यात मुख्य लढत आहे. तुर्कीच्या विमानाने अजूनही आपल्या क्षमता दाखवलेल्या नाहीत. त्या कागदावर आहेत. त्याचवेळी भारताच्या तेजस ने सिंगापूर एअर शो मधे आपला जलवा दाखवलेला आहे. भारतासोबत करार करण्याची अजून एक जमेची बाजू म्हणजे मलेशिया च्या सुखोई ३० विमानांची देखभाल करण्याची जबाबदारी ही भारत उचलणार आहे. भारताला गेलं दशकभर सुखोई ३० विमानांची देखभाल करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे मलेशिया च्या सुखोई ३० विमानांना हवेत उडत राहण्यासाठी भारताची मोलाची मदत होणार आहे. भारत एक तेजस मलेशिया ला जवळपास ५० मिलियन अमेरिकन डॉलर मधे विकणार आहे. तर संपूर्ण करार हा ९०० मिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त आहे. 

तेजस च्या निर्मितीत भारताने अनेक वर्ष वाया घालवली असली तरी त्याच आंतरराष्ट्रीय बाजारात केलेलं योग्य सादरीकरण तेजस च तेज हळूहळू वाढवत आहे. मलेशिया आणि इजिप्त सोबत जर हे करार झाले तर तेजस ने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला ठसा उमटवला आहे याबद्दल कोणाचं दुमत नसेल. तसेच या करारांमुळे भारताला खूप मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन तर उपलब्ध होणार आहेच पण त्याच सोबत आत्मनिर्भरतेकडे भारताने अजून एक पाऊल पुढे टाकलेलं असेल. तेजस च्या निर्मितीत योगदान देणाऱ्या सर्व अभियंते, वैज्ञानिक, कर्मचारी या सर्वाना माझा कडक सॅल्यूट. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Tuesday 28 June 2022

संस्कृतीची संस्कृती... विनीत वर्तक ©

 संस्कृतीची संस्कृती... विनीत वर्तक ©

भारताच्या संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास आहे हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहित आहे. त्या हजारो वर्षाच्या प्रवासाचे दाखले देणाऱ्या अनेक गोष्टी भारतात आजही अस्तित्वात आहेत. पण त्या ऐतिहासिक संस्कृतीची जपणूक करण्याची एक संस्कृती मात्र आपण भारतात रुजवू शकलो नाही ही एक मोठी खंत नेहमीच मला होती. आमचे पूर्वज फार थोर, मोठे आणि काळाच्या मानाने बरेच पुढे होते. आज त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा काळाच्या ओघात धूसर होत असताना त्याला जपण्याची एक सुरवात किंवा ती जपणूक करण्याची सुरवात भारताच्या पंतप्रधानांनी नुकतीच केली असं म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही. भारताच्या या हजारो वर्षाच्या प्रवासात पिढ्यान पिढ्या कारागिरीच तंत्रज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेलं आहे. आज ही भारतात अश्या अनेक कारागिरी आणि ती साकारणारे कारागीर आहेत. त्यांच्या याच कारागिरी ला जगाच्या पटलावर आणून भारताच्या संस्कृतीला जपण्याची संस्कृती रुजवण्याची सुरवात झालेली आहे. 

नुकत्याच झालेल्या जगातील प्रगत राष्ट्रांच्या म्हणजेच 'जी ७' राष्ट्रांच्या बैठकीत उपस्थित असणाऱ्या प्रत्येक राष्ट्रप्रमुखाला भारताच्या हजारो वर्षांची कारीगरी जपणाऱ्या वस्तू पंतप्रधानांनी भेट म्हणून दिल्या आहेत. या प्रत्येक वस्तुंना तब्बल ४००० ते ५००० वर्षांचा इतिहास आहे. त्या वस्तू साकारण्याची पद्धत सुद्धा आजच्या फास्ट फॉरवर्ड जमान्यात जुनाट वाटली तरी ती एकमेव अशी आहे. त्यामुळेच या वस्तूंच्या मूल्यांपेक्षा त्या आपल्या सोबत भारताच्या हजारो वर्षाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रवास घेऊन आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच महत्व हे खूप जास्ती आहे. तर या वस्तू कोणत्या आहेत? त्या आपल्या सोबत काय घेऊन आल्या आहेत त्याचा संक्षिप्त आढावा. 

१) अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मिनाक्षी पद्धतीने बनवण्यात आलेले ब्रूच आणि कफलिंक देण्यात आले आहेत. यात चांदीमधे वेगवेगळं डिझाईन बनवून त्यात मिना ग्लास आणि विशिष्ठ पद्धतीचं ग्लू एकमेकात मिसळून त्याला भट्टीत भाजण्यात येत. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की ही प्रोसेस लेयर बाय लेयर करण्यात येते. यात खूप कारीगरी लागते. तसेच ही पद्धत हजारो वर्षापासून विकसित झालेली आहे. या पद्धतीत त्याचा रंग हा अनेकदा गुलाबी होतो. त्यामुळेच याला मिनाक्षी असं म्हंटल जाते. वाराणसी, उत्तरप्रदेश इकडे आजही अश्या पद्धतीने हे खास दागिने बनवले जातात. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी यांना मॅच होईल या पद्धतीने हे खास तयार करण्यात आलेले आहेत. 

२) ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना बुलंदशहर, उत्तर प्रदेश इकडे बनवण्यात आलेली चहा ची मातीची भांडी दिलेली आहेत. ही भांडी विशिष्ठ पद्धतीने तयार केली जातात. एक बेस डिझाईन तयार झाल्यावर त्याला १२०० डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम केलं जाते. त्यात त्या नंतर वेगवेगळे रंग त्यात मेंदीच्या कोनाने भरले जातात. हे पुन्हा एकदा भट्टीत भाजलं जाते. ब्रिटिश पंतप्रधानांना देण्यात आलेल्या क्रॉकरी मधे प्लॅटिनम धातू असलेल्या रंगाचा वापर केला गेलेला आहे. कारण याच वर्षी ब्रिटिश राणी आपल्या सिंहासनाची प्लॅटिनम ज्युबली म्हणजेच ७० वर्ष साजरी करत आहे. त्याचा सन्मान म्हणून भारतीय संस्कृतीचा भाग असलेली आणि ब्रिटिश साम्राज्याचा सन्मान करणारी अशी ही चहाची भांडी त्यांना देण्यात आलेली आहेत. 

३) कॅनडा चे पंतप्रधान जस्टिन ट्रूडेउ यांना काश्मीर मधील कारागिरांनी बनवलेलं एक कार्पेट भेट दिलेलं आहे. हे कार्पेट संपूर्णतः रेशिमपासून बनवलेलं आहे. हातांनी विणलेलं आहे. या पद्धतीने बनवलेली कार्पेट जगात प्रसिद्ध आहेत. ही कार्पेट अतिशय मऊ असून त्यातील प्रत्येक धागा हा अतिशय मेहनत घेऊन विणला जातो. यातील रंगसंगती विशिष्ठ अशी असून वेगवेगळ्या बाजूने बघितल्यास वेगवेगळ्या रंगाचा आभास त्यातून होतो. तसेच दिवसा आणि रात्री त्याचे रंग हे वेगळे भासतात. 

४) फ्रांस देशातून आलेले परफ्यूम्स संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. त्याचसाठी फ्रांस चे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांना अत्तराची खास पेटी भेट दिलेली आहे. यात ६ वेगवेगळ्या पद्धतीची अत्तर असून यातील अत्तर बनवण्याची पद्धत ही तब्बल ५००० वर्षांचा इतिहास असलेली आहे. चंदनाच्या तेलाचा बेस म्हणून वापर करून या वेगवेगळ्या अत्तराची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर एका पद्धतीच्या अत्तरात गरम मसाल्या पासून तयार होणाऱ्या तेलाचा वापर केला आहे. तसेच या पेटीला खास फ्रांस च्या राष्ट्रध्वजातील रंगांनी सजवण्यात आलेलं आहे. 

५) इटली म्हंटल की इटालियन मार्बल आपल्या समोर येतो. इटालियन पंतप्रधान मारिओ ड्रगही यांना खास मार्बल इन्ले टॉप भेट म्हणून दिला आहे. या मार्बल वरील डिझाईन संपूर्णपणे हातानी बनवली गेली आहे. मार्बल मधे बनवलेल्या डिझाईन मधे खाचे करून त्यात वेगवेगळ्या रंगाचे मार्बल तुकडे बसवले गेले आहेत. त्यामुळे याच सौंदर्य खूप वेगळं आहे. 

६) जर्मन चान्सलर ओलॉफ शोल्झ यांना मेटल पॉट भेट दिलेलं आहे. निकेल धातूने कोटिंग केलेलं या भांड्यावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. 

७) जपान च्या पंतप्रधानांना ब्लॅक पॉटरी भेट दिलेली आहे. याच वैशिष्ठ म्हणजे त्याचा काळा रंग. हा रंग पॉटरी ला तेव्हाच येऊ शकतो जेव्हा भट्टीत तापताना तिच्या आजूबाजूला ऑक्सिजन च अस्तित्व नसेल. हजारो वर्षांच्या पूर्वीपासून भारतीय कारागिरांना हे कसं शक्य करायचं हे माहित होतं. त्याच जुन्या पद्धतीने ही भांडी बनवली गेली आहेत. 

८) साऊथ आफ्रिकेचे प्रेसिडेंट सिरिल रामफॉस यांना डोकरा आर्ट पीस देण्यात आलेला आहे. या पीस च वैशिष्ठ म्हणजे हा पीस ४००० वर्ष जुन्या लॉस्ट वॅक्स कास्टिंग पद्धतीने बनवलेला आहे. अश्या पद्धतीने गोष्टी कास्टिंग करण्याची पद्धत फक्त भारतात हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात होती. जेव्हा जग गुहेत रहात होत तेव्हा भारतीय मेटल च कास्टिंग करून कलेचे नमुने तयार करत होते. त्याच संस्कृतीचा हा अर्थ पीस भाग आहे. 

९) अर्जेंटिनाचे राष्टपती अल्बर्टो फर्नांडीझ यांना डोकरा आर्ट मधे बनवलेल्या नंदी ची प्रतिकृती दिली आहे, नंदी च महत्व भारतीय पुराणात खूप आहे. शंकराच वाहन म्हणून नंदी हा नेहमीच पुज्यनीय राहिलेला आहे. 

१०) इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांना रामाच्या दरबाराची लाकडात कोरलेली प्रतिकृती भेट देण्यात आलेली आहे. इंडोनेशियावर भारताच्या संस्कृतीचा प्रभाव राहिलेला आहे. लाकडात कोरण्यात आलेली ही प्रतिकृती तितक्याच जुन्या कालावधीच प्रतिनिधित्व करणारी आहे. 

११) सेनेगल चे राष्टपती मॅकी सल यांना मुंज बास्केट आणि कॉटन ड्युरीज भेट दिलेली आहे. सेनेगल मधे आई कडून मुलीला विणण्याचे बाळकडू दिले जातात. त्याच धर्तीवर भारतात वर्षोनुवर्षे चालत आलेल्या विणण्याच्या कलेला या भेटीतून उजाळा देण्यात आलेला आहे. 

या सगळ्या भेटी अनेकांना सर्वसाधारण वाटू शकतात. या आधीही अश्या भेटी दिल्या गेल्या असतील. पण एकाचवेळी जगातील इतक्या सर्व नेत्यांना भारतीय संस्कृतीची जपणूक करणाऱ्या वेगवेगळ्या भेटवस्तू भेट म्हणून देताना एक नवीन पायंडा पाडला गेला आहे असं माझं मत आहे. हा पायंडा म्हणजे संस्कृती जपणाऱ्या संस्कृतीची सुरवात झालेली आहे. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की हे कारागीर भारताच्या एखाद्या कोपऱ्यात लपलेले आहेत. आज ते त्यांची कारागिरी भारतीयांन पर्यंत पोहचवण्यासाठी धडपडत आहेत. त्याचवेळी भारताचे पंतप्रधान जेव्हा जी ७ सारख्या प्लॅटफॉर्म चा वापर भारताच्या याच संस्कृतीला जगाच्या पातळीवर नोंद घेण्यासाठी करतात. तेव्हा एक प्रकारे भारताची संस्कृती जपण्यासाठी टाकलेलं ते खूप मोठं पाऊल असते. 

भेट दिलेली प्रत्येक गोष्ट नक्कीच ज्यांना भेट दिली आहे त्यांच्यासाठी विशेष अशी आहेच पण त्याच सोबत ज्यांनी तिची निर्मिती केली त्या भारतीय कारागिरांसाठी पण विशेष आहे. मला खात्री आहे यानंतर त्यांच्या हातातून घडल्या जाणाऱ्या आणि भारताच्या संस्कृतीचा हजारो वर्षाचा प्रवास सांगणाऱ्या हा कारागिरीला संपूर्ण जग कुर्निसात करेल. 

जय हिंद!!!

तळटीप :- पोस्ट चा उद्देश भारतीय संस्कृती आणि भारतीय कारागीर यांच्याशी निगडित आहे. या पोस्टचा वापर कोणत्याही राजकीय फायद्यासाठी करू नये अथवा राजकीय आणि व्यक्तीच गुणगान गाण्यासाठी ही पोस्ट लिहलेली नाही.  

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Wednesday 22 June 2022

Struggling journey to the highest place ... Vinit Vartak ©

 Struggling journey to the highest place ... Vinit Vartak ©

The boat does not cross for fear of the waves,

Those who try do not lose ....

This beautiful poem was composed by Sohanlal Dwivedi. In this poem, the mentality of struggling till he succeeds was wrapped in very beautiful words. Today is the occasion to remember this poem. Of 'Draupadi Murmu' selected as president nominee from BJP. The words came out of my mouth as i read their struggling and equally inspiring journey. 

No one can predict where the situation will take a person. In the 1965 film, Balraj Sahni had said a famous dialogue,

"Time is everything, time only makes, and time only spoils"

Draupadi Murmu's entire life revolves around this one dialogue.That is why her selection for the top post in India will be special for a number of reasons. She was born on 20th June 1958 in Baidaposi village of Mayurganj district in a tribal tribe called Santhal. Her father was the Sarpanch in the Panchayat. Therefore, it would be correct to say that she got the first lessons of politics from her father. But her political journey was not easy.Due to the difficult situation at home, she completed her education poorly. She graduated from Ramadevi Women's College with a degree in Arts. She then got a job as a clerk in the electrical and irrigation department of the Orissa government. She later worked as an honorary teacher at the Aurobindo Integral Education Center. She was married to Shyam charan Murmu. As her journey continues with a family of two boys and a girl laughing and playing, the situation took such a turn that any woman should go through collapse.

She joined the Bharatiya Janata Party in 1997. In the same year, she was elected as a corporator in the state of Orissa. She was sworn in as a Minister in the Orissa Government in 2000. She was elected MLA twice from 2000 to 2009. In 2007, She was awarded the Nilkanta Award. The award is given for the best MLA in the Orissa Legislative Assembly. On the one hand, while climbing the ladder of success in political life, a series of crises began in her personal life. Her partner Shyam charan Murmu died. Their eldest son died before she could recover from the shock. Until she recovers from this, time has once again taken away her second son in an accident. In her personal life, the sudden departure of three people, not one or two, completely destroyed her. In her personal life, this sudden storm would have killed any woman, but Draupadi Murmu did not succumb to this situation. Instead, she became stronger and decided to spend her life in social service.

She continued her social service from Bharatiya Janata Party. Respecting her work, the party gave her the responsibility of becoming the governor in 2015. She was appointed as the 9th Governor of Jharkhand. She became the first woman governor of the state of Jharkhand and the first woman from all over India to become a governor from a tribal community. When she was governor, she repealed the land lease law passed by her own (BJP) party but which was a problem for the tribal people. She enhanced the prestige of the post of Governor by giving top priority to public interest and national interest over the party. That is why despite the Biju Janata Dal government in Orissa, the Chief Minister had many times praised her impartial administration.

As she celebrated her 64th birthday at home on June 20, She had no idea that her party would give her a chance to sit at the top position of India. On June 21, 2022, the Bharatiya Janata Party declared her as its candidate for the presidency. A circle of equally inspiring journeys of struggle was completed. Many factors came together to support her name. Struggling political journey through a very difficult situation from a tribal community, absorbing so many traumas in one's personal life and concentrating on social work as well as her ability to make impartial political decisions by embracing all and not just the Bharatiya Janata Party. B.J.D. also supported her name. Therefore, her becoming the President of India is considered a mere formality.

Draupadi Murmu is known in her party and state for her calm, restrained and diligent work. Though her name seems new in the politics of the country, She has left her mark in the politics of the party and the state.That is why her name has received support from both the High Command and the Leader of the Opposition. I have no doubt that her election as the 15th President of India on July 21, 2022 will mark another milestone in her journey to the highest office. My best wishes for her future endeavors.

Jai Hind !!!

Photo Search Courtesy: - Google

Note: - The wording in this post is copyrighted.



सर्वोच्च स्थानाचा संघर्षमय प्रवास... विनीत वर्तक ©

 सर्वोच्च स्थानाचा संघर्षमय प्रवास... विनीत वर्तक ©

लहरों से डर कर नौका पार नहीं होती,

कोशिश करने वालों की हार नहीं होती.... 

सोहनलाल द्विवेदीनी ही सुंदर कविता रचलेली होती. या कवितेतून त्यांनी यश मिळेपर्यंत संघर्ष करण्याची मानसिकता खूप सुंदर शब्दांत गुंफलेली होती. आज या कवितेची आठवण व्हायला निमित्त झालं ते राष्ट्रपती पदासाठी एन.डी.ए. कडून निवड झालेल्या 'द्रौपदी मुर्मू' यांचं. त्यांचा संघर्षमय आणि तितकाच प्रेरणादायी प्रवास बघितल्यानंतर हे शब्द ओठातून हळूच बाहेर आले. 

परिस्थिती माणसाला कुठे नेऊन ठेवेल याचा अंदाज कोणालाच येत नसतो. १९६५ च्या वक्त चित्रपटात बलराज साहनी यांनी एक फेमस डायलॉग म्हटला होता,

"वक्त ही सबकुछ हैं, वक़्त ही बनाता हैं, और वक़्त ही बिगाड़ता हैं" 

द्रौपदी मुर्मू यांचं संपूर्ण आयुष्य या एका डायलॉगच्या भोवती फिरलेलं आहे. त्यामुळेच भारताच्या सर्वोच्च पदासाठी त्यांची होणारी निवड ही अनेक कारणामुळे विशेष असणार आहे. २० जून १९५८ रोजी मयूरगंज जिल्ह्याच्या बैदापोसी गावात संथाल या आदिवासी जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पंचायतीमध्ये सरपंच होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू त्यांना आपल्या वडिलांकडून मिळालं असं म्हटलं तर ते योग्य ठरेल. पण त्यांचा राजकीय प्रवास सोप्पा नव्हता. घरची बेताची परिस्थिती यामुळे त्यांनी आपलं शिक्षण हलाखीत पूर्ण केलं. रामादेवी महिला कॉलेजमधून त्यांनी कला शाखेत पदवी घेतली. त्यानंतर त्यांना ओरिसा सरकारच्या इलेक्ट्रिकल आणि जलसिंचन विभागात क्लार्कची नोकरी मिळाली. नंतर त्यांनी अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन सेंटर मधे मानद शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यांचं लग्न श्यामचरण मुर्मू यांच्याशी झालं. दोन मुलगे आणि एक मुलगी असं हसतं खेळतं कुटुंब असा त्यांचा प्रवास सुरू असताना परिस्थितीने अशी काही वळणं घेतली की त्यात कोणतीही स्त्री कोलमडून जावी. 

१९९७ साली त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. ओरिसा राज्यात त्याच वर्षी नगरसेविका म्हणून निवडून गेल्या. २००० साली ओरिसा सरकारमध्ये मंत्रीपदाची  शपथ त्यांनी घेतली. २००० ते २००९ मध्ये दोन वेळा आमदार म्हणून त्या निवडून आल्या. २००७ साली त्यांना निलकांता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ओरिसाच्या विधानसभेतील उत्कृष्ट आमदारासाठी हा पुरस्कार दिला जातो. एकीकडे राजकीय जीवनात यशाच्या पायऱ्या चढत असताना व्यक्तिगत आयुष्यात मात्र संकटांची मालिका सुरू होती. आपल्या जोडीदाराचा म्हणजेच श्यामचरण मुर्मू यांचा मृत्यू झाला. त्या धक्यातून सावरत नाही तोवर त्यांच्या मोठ्या मुलाचा मृत्यू झाला. यातून सावरत नाही तोवर पुन्हा एकदा काळाने एका अपघातात त्यांचा दुसरा मुलगा हिरावून नेला. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात एक-दोन नाही तर तीन माणसाचं अचानक जाणं हे त्यांना संपूर्णपणे उध्वस्त करून गेलं. व्यक्तिगत आयुष्यात या अचानक आलेल्या वादळाने खरे तर कोणतीही स्त्री कोलमडून गेली असती, पण द्रौपदी मुर्मू या परिस्थिती पुढे झुकल्या नाहीत उलट अजून कणखर होऊन त्यांनी समाजसेवेत आपलं आयुष्य जगण्याचं नक्की केलं. 

आपलं समाजसेवेचं व्रत भारतीय जनता पक्षातून त्यांनी सुरू ठेवलं. त्यांच्या याच कार्याचा मान ठेवताना २०१५ साली पक्षाने त्यांच्यावर राज्यपाल बनण्याची जबाबदारी दिली. त्या झारखंड राज्याच्या ९ व्या राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्या. झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल आणि संपूर्ण भारतातून आदिवासी समाजातून राज्यपाल बनणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. राज्यपाल असताना त्यांनी आपल्या पक्षाने पास केलेला पण आदिवासी लोकांसाठी अडचण ठरणारा जमिनीच्या भाडेकराराचा कायदा रद्द केला. पक्षापेक्षा त्यांनी लोकहिताला आणि देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन राज्यपाल या पदाची शोभा वाढवली. त्यामुळेच ओरिसात बिजू जनता दलाचं सरकार असतानाही मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा त्यांच्या निष्पक्ष कारभाराची स्तुती केली होती. 

२० जून रोजी आपला ६४ वा वाढदिवस आपल्या घरी साजरा करत असताना आपला पक्ष त्यांना भारताच्या सर्वोच्च स्थानावर बसण्याची संधी देणार आहे याची छोटीशी पण कल्पना त्यांना नव्हती. २१ जून २०२२ ला भारतीय जनता पार्टीने त्यांना आपल्या पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून उमेदवारी घोषित केली. एका संघर्षमय तितक्याच प्रेरणादायी प्रवासाचं एक वर्तुळ पूर्ण झालं. त्यांच्या नावाला पाठिंबा मिळण्यासाठी अनेक बाजू जमेच्या ठरल्या. एक आदिवासी समाजातून अतिशय कठीण परिस्थितीतून संघर्ष करत केलेला राजकीय प्रवास, स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यात इतके धक्के पचवून सामाजिक कार्याचा घेतलेला ध्यास याचसोबत सर्वांना सामावून घेत निष्पक्षपणे राजकीय निर्णय घेण्याची त्यांची ताकद एकट्या भारतीय जनता पार्टीचा नव्हे तर ओरिसातील जवळपास ३१,००० मतांचं बाहुबल असलेल्या बी. जे. डी. चा पाठिंबा मिळवून गेली. त्यामुळे त्यांचं भारताचं राष्ट्रपती होणं ही केवळ एक औपचारिकता मानली जात आहे. 

द्रौपदी मुर्मू या शांत, संयमी आणि आपलं काम चोख बजावणाऱ्या म्हणून त्यांच्या पक्षात आणि राज्यात ओळखल्या जातात. देशाच्या राजकारणात त्यांचं नाव नवीन वाटलं तरी पक्षाच्या आणि राज्याच्या राजकारणात त्यांनी आपली छाप सोडलेली आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाला अगदी हाय कमांड ते विरोधी पक्षातील नेत्यांकडून पाठिंबा मिळालेला आहे. येत्या २१ जुलै २०२२ ला भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड सर्वोच्च स्थानाकडे त्यांचा एक संघर्षमय प्रवासाचं अजून एक वर्तुळ पूर्ण करणारी असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यांच्या पुढील वाटचालीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!! 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday 20 June 2022

Space_Internal Part 4 ... Vinit Vartak ©

 Space_Internal Part 4 ... Vinit Vartak ©

As we engage in the struggles and difficulties of Earth, a man-made leap to another planet in this universe is exploring life on another planet that existed millions of years ago. This second planet is Earth's neighbor 'Mars'. Currently, NASA's Perseverance Rover is exploring for life in a rock called Jezoro in the Delta River basin. The Perseverance Rover was launched on Mars in February 2021. Many of you may have seen it coming down live. The rover has traveled about 11 kilometers on Mars for more than a year. Now he has begun his important work. Millions of years ago, there was water on Mars. Mars also had rivers like Earth. One of them is the Delta River.

Mars was in the Sun's habitat zone millions of years ago. (The habitable zone is the distance from the Sun where the temperature is neither too high nor too low. Water may be in liquid form.) Although water is not in the form of a river on Mars today, the character of the river created by that water exists. We know that water carries with it a lot of mud and many things. This is called sedimentary deposition in technical language. The chances of life in it are very high. For this reason, NASA has launched its Perseverance Rover into the Delta River basin.

So this Perseverance Rover has started a series of inventions. Some shocking events have taken place in his journey. On May 28, 2022, the rover set aside a 5-centimeter area of ​​soil and set out to observe the rock inside. (We can see this place in the photo below) According to the scientists, the sedimentary deposition is clearly visible here and it has a very high probability of having life or finding some of its threads. It is a matter of pride for Indians that this soil research is being carried out by an Indian-British scientist. The name of this scientist is Sanjeev Gupta. He was born in Agra, India and at the age of 5 his family settled in England. Sanjeev Gupta is an internationally renowned geologist who has been tasked with finding life in a Martian soil sample.

The Perseverance Rover, built at a cost of over 3 billion US dollars, is a masterpiece of human technological prowess. It has 43 pencil shaped tubes that can be filled with soil samples. About 30 of these tubes will be brought back to Earth by NASA from 2030 to 2033. Two vehicles are being built with the help of the European Union at a cost of 5 billion US dollars. One of these spacecraft will land on Mars and fly into the orbit of Mars with 30 tubes in the abdomen of the Perseverance Rover. The other spacecraft will be matched with the orbit of Mars and then it will be handed over to him. This second spacecraft will then land on Earth with very important soil samples. An Indian-British scientist has been entrusted with the task of verifying these specimens.

Perseverance Rover has discovered some amazing things in its journey as written above. One of them is a piece of thermal blanket stuck in the rocks of Mars by the camera of Perseverance Rover. (In the photo we can see this piece stuck in the rocks of Mars) NASA has clarified that this piece is the thermal blanket of the space suit used while landing on Mars.Many have ridiculed NASA on Mars but man has started doing dirt. Many had wondered how a man-made piece could have landed on Mars when no human had ever landed on it.

Perseverance Rover has just captured another startling sight. A round stone (roughly the size of a football) on the tip of a rock is captured by a rover's camera. (You can see this rock in the photo below) According to NASA, this rock has been in this position for more than 3 billion years.This photo has once again sparked the discussion of aliens. This is because the chances of the stone remaining natural in this way are very rare. Many have suggested that the tune may have been set by an alien. But all these possibilities have been ruled out by NASA. The Perseverance Rover was carrying a small helicopter called Ingenuity in its belly. This helicopter flew 28 times in the atmosphere of Mars. In the first week of May, however, the helicopter lost contact with the Perseverance Rover. The solar panel of the helicopter was covered in dust due to a dust storm on Mars and lost contact with the Perseverance Rover due to power outage. However, this helicopter was built to carry only 5 flights. In fact, with 28 flights, it has performed much better than expected.

NASA hopes that the Perseverance Rover will open many screens of Mars' past in the near future. Today, man-made objects from a distance of 202 million kilometers are searching for life on other planets. Although we do not know the intricacies of this, we should congratulate the many anonymous researchers who have come to understand these technical capabilities of human beings and put them into practice. Because these achievements are not achieved in one day. Sometimes it costs a living. My heartfelt salute to all those anonymous researchers.

Photo Search Courtesy: - NASA - J. P. L. (Jet Propulsion Laboratory), Google

Note: - The wording in this post is copyright.






#अवकाशाचे_अंतरंग भाग ४... विनीत वर्तक ©

 #अवकाशाचे_अंतरंग भाग ४... विनीत वर्तक ©

आपण पृथ्वीवरच्या भांडणात आणि अडचणीत व्यस्त आहोत तेव्हा या विश्वाच्या दुसऱ्या ग्रहावर मानवाने घेतलेली एक उंच उडी करोडो वर्ष आधी अस्तित्वात असलेल्या दुसऱ्या ग्रहावरच्या जीवसृष्टीचा शोध घेत आहे. हा दुसरा ग्रह म्हणजेच पृथ्वीचा शेजारी 'मंगळ'. सध्या नासा च पर्सीवरंस रोव्हर डेल्टा नदीच्या पात्रात असलेल्या जेझोरो नावाच्या खड्यात सजीवसृष्टीचा शोध घेत आहे. पर्सीवरंस रोव्हर मंगळावर फेब्रुवारी २०२१ मधे उतरवलं गेलं. आपल्यापैकी अनेकांनी ते उतरताना लाईव्ह बघितलं ही असेल. तर एका वर्षापेक्षा जास्त काळ मंगळावर या रोव्हर ने जवळपास ११ किलोमीटर चा प्रवास केला आहे. आता त्यांने आपल्या महत्वाच्या कामाला सुरवात केली आहे. करोडो वर्षापूर्वी मंगळावर पाणी होतं. मंगळावर सुद्धा पृथ्वी प्रमाणे नद्या होत्या. त्यातील एक म्हणजेच डेल्टा नदी. 

मंगळ हा करोडो वर्षाआधी सुर्याच्या हॅबिटायटल झोन मधे होता. ( हॅबिटायटल झोन म्हणजे सूर्यापासून असं अंतर की जिकडे तापमान खूप जास्त पण नसेल आणि खूप कमी पण नसेल. पाणी हे द्रवरूपात असू शकेल.) पण खगोलीय घटनांमुळे तो सूर्याच्या हॅबिटायटल झोन पासून लांब गेला आणि मंगळाच्या विरळ वातावरणामुळे तिथे असलेलं पाणी वाफ होऊन अवकाशात लुप्त झालं. आज मंगळावर पाणी नदीच्या स्वरूपात नसलं तरी त्या पाण्यामुळे निर्माण झालेलं नदीचं पात्र हे अस्तित्वात आहे. आपल्याला माहित आहे की पाणी आपल्या सोबत अनेक गाळ आणि अनेक गोष्टी वाहून आणत असते. ज्याला तांत्रिक भाषेत सेडीमेंट्री डिपोझिशन असं म्हणतात. त्यातच जीवन असण्याच्या शक्यता खूप जास्ती असतात. याच कारणामुळे नासाने आपलं पर्सीवरंस रोव्हर हे डेल्टा नदीच्या पात्रात उतरवलेलं आहे. 

तर या पर्सीवरंस रोव्हर ने अनेक शोधांची मालिका सुरु केलेली आहे. त्याच्या या प्रवासात काही अचंबित करणाऱ्या घटना ही समोर आल्या आहेत. २८ मे २०२२ ला या रोव्हर ने एक ५ सेंटीमीटर भागातील माती बाजूला करून आत असलेल्या दगडाचा वेध घेण्यासाठी तयारी केली आहे. ( खाली दिलेल्या फोटोत ही जागा आपण बघू शकतो ) वैज्ञानिकांच्या मते इकडे सेडीमेंट्री डिपोझिशन स्पष्टपणे दिसत असून यात जीवन असण्याच्या किंवा त्याचे काही धागेदोरे मिळण्याच्या शक्यता खूप वाढलेली आहे. भारतीयांसाठी यात अभिमानाची गोष्ट अशी या मातीच्या संशोधनाचं सारथ्य एक भारतीय- ब्रिटिश वैज्ञानिक करत आहेत. संजीव गुप्ता असं या वैज्ञानिकांचे नाव आहे. त्यांचा जन्म भारतातील आग्रा इकडे झालेला असून वयाच्या ५ व्या वर्षी त्यांच कुटुंब इंग्लंड मधे स्थायिक झालं. संजीव गुप्ता हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जिऑलॉजिस्ट असून त्यांच्यावर मंगळाच्या मातीच्या नमुन्यात जीवन शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

पर्सीवरंस रोव्हर हे तब्बल ३ बिलियन अमेरीकन डॉलर खर्च करून बनवलेलं मानवाच्या तांत्रिक क्षमतेचा एक अत्युच्य अविष्कार आहे. यात ४३ मातीचे नमुने भरता येतील अश्या पेन्सिल च्या आकाराच्या ट्यूब आहेत. यातील जवळपास ३० ट्यूब नासा पुन्हा पृथ्वीवर २०३० ते २०३३ पर्यंत पृथ्वीवर परत आणणार आहे. यासाठी तब्बल ५ बिलियन अमेरीकन डॉलर खर्च करून दोन यान युरोपियन युनियन च्या साह्याने बनवण्यात येत आहेत. यातील एक यान मंगळावर उतरून पर्सीवरंस रोव्हरच्या पोटात असलेल्या ३० ट्यूब घेऊन मंगळाच्या कक्षेत उड्डाण करेल. दुसरं यान जे मंगळाच्या कक्षेत असेल त्याच्याशी जुळून मग ते त्याच्याकडे सुपूर्द करेल. मग हे दुसरं यान हे अतिशय महत्वाचे मातीचे नमुने घेऊन पृथ्वीवर उतरेल. या नमुन्यांची शहानिशा करण्याची जबाबदारी एका भारतीय- ब्रिटिश वैज्ञानिकाकडे देण्यात आलेली आहे. 

पर्सीवरंस रोव्हर ने आपल्या प्रवासात वर लिहिलं तसं काही अचंबित करणाऱ्या गोष्टी शोधल्या आहेत. त्यातील एक म्हणजे थर्मल ब्लॅंकेट चा एक तुकडा मंगळाच्या दगडांमध्ये अडकलेला पर्सीवरंस रोव्हरच्या कॅमेराने टिपला आहे. ( फोटो मधे आपण अडकलेला हा तुकडा मंगळाच्या दगडांमध्ये बघू शकतो) मंगळावर उतरताना वापरण्यात आलेल्या स्पेस सूट च्या थर्मल ब्लँकेट चा हा तुकडा असल्याचं नासा ने स्पष्ट केलं आहे. अनेकांनी मंगळावर पण माणसाने घाण करायला सुरवात केली असं म्हणून नासाची खिल्ली ही उडवली आहे. मंगळावर आज पर्यंत कोणताही मानव उतरला नसताना मानव निर्मित असा तुकडा कसा काय मंगळावर पोहचला याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. 

पर्सीवरंस रोव्हर नुकतीच अजून एक अचंबित करणारं दृश्य टिपलेले आहे. एका दगडाच्या शिळेच्या टोकावर एक गोलाकार दगड (साधारण फुटबॉल च्या आकाराचा) रोव्हर च्या कॅमेरा ने टिपलेला आहे. ( खाली फोटोत हा दगड आपण बघू शकता ) नासाच्या मते हा दगड अश्या पद्धतीने तब्बल ३ बिलियन वर्षापेक्षा अधिक काळ तिकडे अश्या स्थितीत आहे. या फोटोमुळे पुन्हा एकदा एलियन च्या चर्चेला उधाण आलं आहे. कारण अश्या पद्धतीने दगड नैसर्गिकरित्या  राहण्याची शक्यता अतिशय विरळ आहे. अनेकांनी एलियन ने हा ठेवलेला असू शकतो हा सूर ही आवळलेला आहे. पण या सर्व शक्यता नासाने फेटाळून लावल्या आहेत. पर्सीवरंस रोव्हर ने आपल्या पोटात इंजेन्यूटी नावाचं एक छोटे हेलीकॉप्टर ही नेलेलं होत. या हेलिकॉप्टर ने २८ वेळा मंगळाच्या वातावरणात उड्डाण केलं. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मात्र या हेलिकॉप्टर चा पर्सीवरंस रोव्हर शी संपर्क तुटलेला आहे. मंगळावर आलेल्या धुळीच्या वादळामुळे या हेलिकॉप्टर च्या सौर पॅनल धुळीने झाकला गेला आणि ऊर्जा निर्मिती थांबल्याने याचा संपर्क पर्सीवरंस रोव्हरशी तुटलेला आहे. पण तरीही या हेलिकॉप्टर ने फक्त ५ उड्डाण भरण्यासाठी याची निर्मिती केली गेली होती. प्रत्यक्षात २८ उड्डाण करून याने त्याच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त चांगली कामगिरी केली आहे. 

येत्या काळात पर्सीवरंस रोव्हर मंगळाच्या भूतकाळाचे अनेक पडदे उघडेल अशी आशा नासाने व्यक्त केली आहे. तब्बल २०२ मिलियन किलोमीटर लांबून मानवाने बनवलेल्या या गोष्टी आज जीवनाचा शोध इतर ग्रहावर घेत आहेत. यातील किचकट बाबी जरी नाही कळल्या तरी मानवाच्या या तांत्रिक क्षमतांना समजून घेऊन ती प्रत्यक्षात उतरावणाऱ्या अनेक अनाम संशोधकांच आपण अभिनंदन केलं पाहिजे. कारण या सिद्धी एका दिवसात मिळत नाहीत. त्यासाठी कधी कधी आयुष्य खर्ची घालावी लागतात. त्या सर्व अनाम संशोधकांना माझा कडक सॅल्यूट. 

क्रमशः

फोटो शोध सौजन्य :-  नासा - जे. पी. एल. ( Jet Propulsion Laboratory),  गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  






The Good, the Bad and the Ugly ... Vinit Vartak ©

 The Good, the Bad and the Ugly ... Vinit Vartak ©

The movie The Good, the Bad and the Ugly came to Hollywood in 1966. It starred Clint Eastwood (The Good), Lee Van Cliff (The Bad) and Eli Wallach (The Ugly). Today marks the 56th anniversary of the film. Even so, owning one is still beyond the reach of any other movie. The film depicts the American Civil War. It depicts the aftermath of the Glorita Pass war and looting in 1862. Many of you have seen this movie. The same storyline was rooted in its beauty and its legendary soundtrack still thrills today.

The story of the film naturally revolves around three personalities. All three are searching for a gold treasure worth 2,00,000 US $. The Bad comes first. So this bad guy knows that a man named Bill Carson knows the address of this treasure. He sets out in search of him. Here The Good and The Ugly together make money by cheating. Even though The Ugly is working with The Good, he is thinking of killing him. That's how he came to be with the dying Bill Carson. This bill reveals the secret of that gold treasure to Carson the Good. Then begins a thrilling journey in which the three of them try to cuddle up to each other. Then it is better to see how it ends in the movie. 

The Good, the Bad and the Ugly is not a movie but a fable. Who set a new standard for how a film can be made. The word 'Western' came to Hollywood movies after this movie. Today, after so many years, the magic of this film has not diminished. Recently marks the 92nd anniversary of Clint Eastwood. This movie remain one of the best of his career. 

Today, the film teaches a lot. There are so many people around us. The Good, the Bad and the Ugly. Sometimes you have to deal with them because of the situation or the cure. We have to work together. Even there, people are still trying to bully us every moment. We can decide how to be wary of such people, when and how to do tricks and how to give a percentage of courage. Often we can decide exactly which group the people around us belong to. The good, the bad or the ugly.

Photo Search Courtesy: - Google

Note: - The wording in this post is copyright.



The Good, the Bad and the Ugly... विनीत वर्तक ©

 The Good, the Bad and the Ugly... विनीत वर्तक ©

१९६६ साली हॉलिवूड मधे The Good, the Bad and the Ugly नावाचा एक चित्रपट आला. क्लिंट इस्टवूड ( द गुड), ली व्हॅन क्लिफ ( द बॅड) आणि एली वॉलाच ( द अग्ली ) यांच्या प्रमुख भुमिका त्यात होत्या. आज या चित्रपटाला ५६ वर्षाचा कालावधी लोटून गेला आहे. तरीपण या चित्रपटाचा समावेश सार्वकालिक सर्वोत्तम चित्रपटात आणि एकूणच चित्रपटाची दिशा बदलण्यात आजही केला जातो. या चित्रपटात अमेरिकन सिव्हिल वॉर चित्रित केलं गेलं आहे. १८६२ मधील ग्लोरिटा पास इकडे झालेल्या युद्धाची आणि तिथल्या लुटमारीची पार्श्वभूमी यात चित्रित केली गेली आहे. हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी बघितलेला असेल. त्याच कथानक हेच मुळी खूप सुंदर होतं आणि त्याचा लिजेंडरी साउंड ट्रॅक आजही अंगावर रोमांच उभं करतो.  

चित्रपटाची कथा साहजिक तीन व्यक्तिरेखां भोवती फिरते. हे तिघेही दोन लाख अमेरिकन डॉलर किंमत असलेल्या सोन्याच्या खजिन्याचा शोध घेत असतात. सगळ्यात पहिले समोर येतो तो द बॅड. तर या बॅड ला माहित पडते की बिल कार्सन नावाच्या माणसाला या खजिन्याचा पत्ता माहित आहे. तो त्याच्या शोधात निघतो. इकडे द गुड आणि द अग्ली एकत्र मिळून फसवून पैसे कमवत असतात. द अग्ली जरी द गुड सोबत काम करत असला तरी मनातून तो त्याला मारण्याचा विचार करत असतो. अशातच त्यांची गाठ मरणाला टेकलेल्या बिल कार्सन शी पडते. हा बिल कार्सन द गुड च्या कानात त्या सोनाच्या खजिन्याचे रहस्य सांगतो. मग इकडून सुरु होतो एक रोमांचकारी प्रवास ज्यात हे तिघे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. मग याचा शेवट कसा होतो ते चित्रपटात पाहणं उत्तम. 

 The Good, the Bad and the Ugly हा एक चित्रपट नाही तर ती एक दंतकथा आहे. जिने चित्रपट कसा बनवला जाऊ शकतो याची नवीन परिमाणं जगापुढे ठेवली. या चित्रपटानंतर 'वेस्टर्न' हा शब्द हॉलिवूड च्या चित्रपटात आला. आज इतकी वर्ष उलटून गेली तरी या चित्रपटाची जादू काही कमी झालेली नाही. आज  क्लिंट इस्टवूड ने ९२ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाला साज चढवला असेल तर तो हाच चित्रपट होता. 

आज ही हा चित्रपट खूप काही शिकवून जातो. आपल्या आजू बाजूला असेच खूप सारे लोक असतात. द गुड, द बॅड आणि द अग्ली. अनेकवेळा परिस्थितीमुळे किंवा नाईलाजाने आपल्याला त्यांची सोबत करावी लागते. सोबत काम करावं लागते. तिकडेही आपल्यावर प्रत्येक क्षणाला कुरघोडी करण्याचे प्रयत्न आजही लोक करत असतात. अश्या लोकांपासून कसं सावध राहायचं कधी कोणते आणि कसे डावपेच आखायचे आणि शहास प्रतिशह कसा द्यायचा हे आपण ठरवू शकतो. अनेकदा आपल्या आजूबाजूला असणारी माणसं नक्की कोणत्या ग्रुप मधे येतात हे आपण ठरवू शकतो. द गुड , द बॅड का द अग्ली. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Friday 17 June 2022

अग्निपथ... विनीत वर्तक ©

 अग्निपथ... विनीत वर्तक ©

भारतीय सेनेने नव्याने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेवरून देशभर आंदोलन उभं राहिल्यानंतर नक्की कश्यामुळे इतका वादंग केला जात आहे? नक्की या योजनेने काय बदल होणार आहेत? या योजनेत असलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टींचा काय परीणाम होणार आहे? खरच हा वाद योग्य आहे का? 

अग्निपथ योजना नक्की काय आहे? ती लागू करण्याची कारण? 

भारतात सैन्यात प्रवेश घेणं हे ऐच्छिक ठेवलेलं आहे. प्रत्यक्षात आपल्या संविधानात ते सगळ्या नागरिकांना अनिवार्य करण्याची तरतूद केलेली आहे. पण त्याचा वापर करण्याची गरज आजवर आपल्याला भासलेली नाही. आजवर आपल्या देशाच्या संरक्षणासाठी अनेक पराक्रमी लोकांनी आपलं रक्त सांडल आहे. देशाच्या सुरक्षितेत आपलं योगदान देणं ही भावना आजही अनेक भारतीयांच्या मनात आहे. पण गेल्या काही वर्षात सैन्यात प्रवेश घेणं हे एखाद्या सरकारी नोकरी प्रमाणे झालं होतं. सरकारी नोकरी म्हणजे आयुष्यभर नोकरी जाण्याची चिंता मिटली असा एक प्रवाह आहे. तोच प्रवाह सैन्यातील प्रवेशाबाबत निर्माण झाला. साहजिक देशभावनेपेक्षा कायमस्वरुपी नोकरी ज्यात सरकारी फायदे, पेन्शन मिळते अश्या दृष्टीने सैन्यातील प्रवेशाकडे कल सुरु झाला. 

जेव्हा इतर सरकारी नोकऱ्यांमधून पेन्शन हा प्रकार हद्दपार झाला तेव्हा भारतीय सेना अशी एकमेव हक्काची जागा राहिली की तिकडे पेन्शन मिळण्याची सोय होती. त्याचसाठी सैन्यात प्रवेश घेण्यासाठी अनेक इन्स्टिट्यूट उभ्या राहिल्या. ( महाराष्ट्रातील चाटे कोचिंग क्लासेस प्रमाणे )  जिकडे सैन्यात प्रवेश मिळवून देणं  हा एक धंदा झाला. त्यात लाखो रुपये भरून प्रवेश घेणारा एक नवीन वर्ग अस्तित्वात आला. एकीकडे हे होत असताना दुसरीकडे सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकांवर पेन्शन आणि इतर स्वरूपात कराव्या लागणाऱ्या खर्चाचा आकडा हा ३.३ लाख कोटी रुपयां पलीकडे गेला. २०२२ पर्यंत हा खर्च ५.२५ लाख कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. भारताच्या एकूण रक्षा क्षेत्रासाठी दिलेल्या पैश्यातील फक्त पेन्शन साठी होणारा खर्च हा तब्बल २२% आहे. याचा अर्थ भारताच्या सुरक्षिततेसाठी भारतीय सैन्याकडे फक्त ७८% उरतात. त्यामुळे कुठेतरी या पेन्शन च्या आकड्याला कात्री लावणं हे गरजेचं बनलं आहे. 

तिसरी एक बाजू काळाच्या प्रवाहात समोर येत होती ती म्हणजे युद्ध करण्याच्या स्थितीत झालेला बदल. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे माणसांची युद्ध भूमीवरील गरज कमी होत जाणार आहे. ड्रोन, मिसाईल आणि इतर तंत्रज्ञान ज्या वेगाने विकसित होते आहे त्याने येत्या १० वर्षात एकूणच सरहद्दीवर लागणाऱ्या सैनिकांची गरज यामुळे कमी होत जाणार आहे. अश्या सर्व परिस्थितीचा विचार करून कुठेतरी भारतीय सैन्याला त्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीने 'अग्निपथ' नावाची योजना समोर आणली गेली आहे. ही योजना कशी असणार आहे या बद्दल आधीच खूप लिहिलं गेलं आहे. त्यामुळे वेगळ त्यावर विस्ताराने लिहीत नाही. 

अग्निपथ योजनेला विरोध का होतो आहे? 

भारतीय सैन्यात समाविष्ट होणं म्हणजे नोकरी करणं नाही. असं विधान भारताचे पहिले सी. डी. एस. जनरल बिपीन रावत यांनी काही वर्षापूर्वी केलं होतं. हे विधान त्यांनी खूप विचारांती केलं होतं. भारतीय सैन्यात प्रवेश घेण्यासाठी उगवलेल्या प्रत्येक टपरीची त्यांना जाणीव होती. त्यामुळेच देशभक्ती ची ओढ, देशाचं सैन्यबळ आणि त्याची संख्या तसेच त्यावर होणारा खर्च या सर्वांचा विचार करून अग्निपथ योजना समोर आलेली आहे. अग्निपथ योजनेची वैशिष्ठ विचारली की आत्तापर्यंत त्यात भाग घेतलेल्या लोकांना किती पैसे मिळतील याची आकडेवारी समोर येते. यावरून भारतीय सैन्यात जाणं म्हणजे नोकरी करणं ही भावना किती प्रबळ आहे हे सिद्ध होते. 

जसं वर म्हंटल की भारतीय सैन्यातील प्रवेश आयुष्यभरासाठी असणार का? याच उत्तर आता भारतीय सैन्यातील तुमचा ४ वर्षाचा प्रवास ठरवणार आहे. त्यामुळेच चाटे क्लासेस सारख्या नाक्यावर उघडलेल्या आणि १००% यशाची खात्री देणाऱ्या क्लासेस च्या हातातून यशाची गुरुकिल्ली हरवणार आहे. तसेच लाखो  रुपये भरून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता आपला प्रवेश स्पर्धा करून मिळवावा लागणार आहे. याच सोबत पेन्शन ची सोय असलेली एक पक्की सरकारी नोकरी हातातून जाणार आहे. त्यामुळेच हा रोष अश्या प्रकारे दंगली करून व्यक्त केला जात आहे. भारतीय सेना म्हणजे नोकरी नव्हे इकडे सुरु झालेला प्रवास अनेकांच्या पचनी पडणारा नाही. 

अग्निपथ योजनेमुळे काय चांगल वाईट होणार आहे? 

अग्निपथ योजनेतून एकाचवेळी अनेक उद्दिष्ठ साध्य होणार आहेत. तरुण वयात एकूणच भारतीय सेना काय असते? सैन्यात भरती होणं म्हणजे काय? त्यातून शिकल्यानंतर तरुणांच्या व्यक्तिमत्वात त्याचा नक्कीच एक चांगला फरक पडणार आहे. वयाच्या १७ ते २१ व्या वर्षी आणि पुढल्या प्रवासासाठी शिक्षणासोबत, देशसेवा आणि पैश्याची तजवीज आपोआप होणार आहे. जवळपास ११ ते १२ लाखांच्या दरम्यान जमा होणारी रक्कम त्यांच्या पुढल्या प्रवासासाठी नक्कीच फायद्याची आहे. तरुणांना या सेवेतून मिळालेल्या सर्टिफिकेट चा फायदा इतर अनेक क्षेत्रात घेता येणार आहे. लक्षात घ्या मुंबई, पुण्यात बसून अमेरिकेत जायची स्वप्न बघणारा आणि देशाच्या गप्पा मारणारा तरुण भारतीय सेनेत जात नसतो. त्यामुळे ज्या कुटुंबातली मुलं आणि मुली यात जातात त्यांना या योजनेमुळे नक्कीच फायदा होणार आहे. 

देशाच्या दृष्टीने बघायला गेलं तर पेन्शन चा अधिभार कमी होणार आहे. त्यामुळे जास्त पैसे देशाच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध होणार आहेत. त्याचवेळी दरवर्षी नवीन रक्ताची आणि तरुणांची भरती योग्य रीतीने सैन्यात होणार आहे. ४ वर्ष त्यांच्यावर नजर ठेऊन चांगल्यात चांगल्या लोकांना प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच एकूण सैन्याचा दर्जा वाढणार आहे. देशप्रेमाची भावना वाढीला लागणार आहे. सैन्याचा अनुभव हा प्रत्येक अग्निविराच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करणारा असणार आहे यात शंका नाही. 

अग्निपथ या योजनेची दुसरी बाजू आहे. एक सैनिक घडवायला साधारण ७-८ वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे ४ वर्षात दाखल होणारा सैनिक कितपत समृद्ध असेल याबाबतीत अनेक रक्षा विश्लेषकांच्या मनात शंका आहे. आपली नोकरी ही कायम स्वरूपी नसल्याने सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या संख्येत घाट तसेच त्यांच्या देशप्रेमाच्या भावनेत घट होऊ शकेल असा एक मत प्रवाह आहे. अग्निपथ योजनेतून त्या २५% तरुणात प्रवेश मिळवण्यासाठी लॉबिंग होण्याची शक्यता ही दाट आहे. पण या सगळ्या शक्यता जर तर च्या आहेत. 

एकूणच अग्निपथ ही योजना भारतीय सैन्याला आणि भारतीय सैन्यात सामील होऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी एक नवी उभारी देणारी असेल असं माझं प्रामाणिक मत आहे. 

जय हिंद!!!

ता.क. :- वरील पोस्ट मध्ये मांडलेले मुद्दे माझे वैयक्तिक आहेत. कोणत्याही पक्ष, व्यक्ती  अथवा राजकारणाशी पोस्ट मधे आलेले मुद्दे संबंधित नाहीत.  

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Thursday 16 June 2022

पाळीव प्राण्यांच बेगडी प्रेम... विनीत वर्तक ©

 पाळीव प्राण्यांच बेगडी प्रेम... विनीत वर्तक ©


पाळीव प्राणी हे नेहमीच माणसाच्या आयुष्याचा भाग राहिलेले आहेत. आपल्या समाजरचनेत ही त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे. पाळीव प्राणी अनेकदा माणसापेक्षा इनामदार असल्याची अनेक उदाहरण आपण ऐकलेली आणि बघितलेली आहेत. त्यांना लावलेला लळा आणि केलेलं प्रेम हे त्यांच्याकडून परत मिळण्याचे अनेक किस्से आपण अनेकदा वाचतो. त्यामुळे पाळीव प्राण्यांबद्दल आकस असण्याचे काही कारण नाही. पण सध्या समाजात त्यांच्यावरच्या बेगडी प्रेमाने शिरकाव केला आहे. प्रेम करण्यापेक्षा दाखवण्यावर आजकाल भर दिला जातो आहे. त्यांच्या स्वच्छतेबद्दल जागरूक असणारे प्राणीमित्र जेव्हा विष्ठा करण्यासाठी दुसऱ्याच्या दारात उभं करतात तेव्हा नक्की हे प्रेम आणि आस्था खरी की खोटी असा प्रश्न पडतो.

दररोज सकाळी उठून आपल्या आवडत्या प्राण्याला घेऊन दुसऱ्यांच्या दारात विष्ठा करण्यासाठी निर्ल्लजपणे उभे करणारे प्राणी मित्र आपल्याला दररोज दिसतात. फेसबुक आणि सोशल मिडिया वरून प्राणी प्रेमाच भरतं आलेल्या आणि आपल्या कुत्रा, मांजरावर भरभरून लिहणाऱ्या अनेक लोकांची सकाळ ही त्यांच्या पाळीव प्राण्यांना दुसऱ्यांच्या दारात घाण करण्यासाठी नेण्यात जात असते. आपलं प्राणी प्रेम जगाला दाखवण्यासाठी अगदी ४० ते ५० हजार खर्च करून इथल्या वातावरणात न राहणारी कुत्रे आणि मांजर पाळून आपणच काय ते प्राणी मित्र असल्याच्या अविर्भावात ते जगत असतात. बरं इतके पैसे खर्च करून पाळलेल्या त्या कुत्र्या, मांजराच्या विष्ठेची सोय मात्र दुसऱ्याच्या गेटसमोर किंवा सोसायटीत किंवा रस्त्याच्या कडेला करण्याबद्दल हे लोक आग्रही असतात. त्यांची घाण आपण साफ केली पाहिजे याच साधं सौजन्य ही दाखवण्याची त्यांची मानसिकता नसते. आपल्या कुत्र्याला आणि मांजराला आपल्या घरात अगदी गादीवर लोळवणारे जेव्हा दुसऱ्याच्या घरासमोर घाण करून ही जागा पब्लिक आहे असं मान वर करून बोलतात तेव्हा तीच घाण उचलून त्यांच्या घरात टाकण्याचा मोह अनेकदा होतो.

पावसाळ्याच्या दिवसात याच घाणीमुळे कित्येक रोगांचा धोका वाढतो पण काय आहे आपलं ते घर आणि दुसऱ्याचा तो उकीरडा हे मानून सोशल मिडियावर आपल्या बेगडी प्रेमाचं प्रदर्शन करणाऱ्या प्राणिमित्रांना ची हे समजण्याची मानसिकता नसते. ज्या प्रमाणे उठ सांगितल्यावर उठणारा तो पाळीव प्राणी आणि बस सांगितल्यावर बसणाऱ्या पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ मोठ्या अभिमानाने शेअर करणाऱ्या प्राणी मित्रांनी त्यांच्या विष्ठेची आपण कशी व्हीलेवाट लावतो याचे ही व्हिडीओ शेअर करावेत. पण ते शक्य होणार नाही. दुसऱ्याच्या गेटवर , भिंतीवर, सोसायटी, गार्डन, रस्त्यावर आपल्या परदेशातून आयात केलेल्या पाळीव प्राण्याची विष्ठा रोज सकाळी आणि रात्री नित्यनियमाने पेरणाऱ्या या लोकांना ते झेपणार नाही. कारण त्यात त्यांना घाण वाटते. आपलं पाळीव प्राण्यांचं प्रेम हे फक्त त्याच्या घरामधील गोष्टींसाठी मर्यादित असते.

रस्त्यावर, गल्ली बोळात झुंडीने रात्री - अपरात्री जाणाऱ्या सामान्य माणसांवर भुंकून आणि हल्ले करणाऱ्या भटक्या कुत्र्यांवर दया आणि प्रेम दाखवण्याची एक नवीन स्पर्धा सुरु झालेली आहे. या भटक्या कुत्र्यांमुळे कितीतरी लहान मुलांना त्रास झालेला आहे. वयोवृद्ध माणसांना लागलं आहे. रात्री कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांना जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे. बाईक आणि गाडीचे कितीतरी अपघात या अश्या कुत्र्यांमुळे झालेले असताना भूतदया दाखवण्याच्या नादात आणि आम्ही प्राणीप्रेमी सिद्ध करण्याच्या नादामुळे अनेकांना त्याचा त्रास होतो आहे. कारण हे बेगडी प्रेम करणारे दोन दिवस येऊन, त्यांना दूध पाजून किंवा खायला देऊन आपल्या घरात स्वस्त बसतात. पण त्याच्यामुळे चेकाळलेल्या या कुत्रा- मांजरीचा त्रास मात्र तिकडे राहणाऱ्या लोकांना भोगावा लागतो. त्यांच्या चावण्यामुळे रेबीज सारख्या रोगाची लागण होते. मला तर एक नेहमी प्रश्न पडतो की पाळीव प्राण्याबद्दल इतकच प्रेम वाटणारे प्रत्यक्षात मात्र त्यांना आपल्या घरासमोर सुद्धा येऊन देत नाहीत.

सरसकट पाळीव प्राण्यांबद्दल प्रेम वाटणारे असे असतात असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण आक्षेप हे बेगडी प्रेम दाखवणाऱ्या लोकांचा आहे. जे दाखवण्यासाठी प्रेम करतात. प्रत्यक्षात त्यांच्या या प्रेमामुळे अनेकांना त्याचा त्रास होत असतो याची कल्पना पण त्यांना नसते. कल्पना असली तरी ती स्विकारण्याची मानसिकता नसते. अश्या भटक्या कुत्र्यांची जबाबदारी सरकारने किंवा तिथल्या पालिकेने घ्यावी अस असताना पण पालिकेमध्ये हेच लोक मानवतेची बाजू घेऊन जेव्हा अश्या कुत्र्यांना पुन्हा मोकाट सोडण्याची तजवीज करतात तेव्हा नक्की हसावं की रडावं हेच कळत नाही.

पाळीव प्राण्यांबद्दल मला आकस आहे असं नाही. पण पाळीव प्राण्यांच संगोपन करताना आपल्या मुलांप्रमाणे सर्व जबाबदारी घेण्याची मानसिकता बेगडी प्रेम दाखवणाऱ्या लोकांमध्ये नसते हे प्रकर्षाने दिसून येते. आपलं प्रेम आपल्या पुरती मर्यादित ठेवून त्याच प्रदर्शन न करण्याची प्रगल्भता शिकवण्याची गरज आज नक्कीच आहे. आपण जर एखादी जबाबदारी स्विकारत आहोत तर ती संपूर्णपणे निभावण्याच व्रत ही पूर्ण करायला हवं. सोयीस्कर बेगडी प्रेमामुळे त्याचे त्रास आपल्या आजूबाजूच्या लोकांना होतात याच भान जरी आलं तरी आपण एक पाऊल पुढे गेलो असं मी म्हणेन.

ता.क. :- वरील पोस्ट मधे मांडलेले मुद्दे माझे वयक्तिक अनुभव आहेत. सरसकट सगळेच तसे असतात असं माझं म्हणणं नाही किंवा तसा कोणता हेतू नाही. पोस्टचा उद्देश बेगडी प्रेम दाखवणाऱ्या लोकांना आरसा दाखवण्याचा आहे.

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



Monday 13 June 2022

Powerful India ... Vinit Vartak ©

 Powerful India ... Vinit Vartak ©


For the last 3 years, the clouds of war have been gathering on the border of India. Pakistan on the one hand and China on the other have shifted their focus towards India. In a situation called the Two Front War. India is going through that situation. Even if there is no actual war, the war situation is the same for the army and the defense systems of the country. At such a time, India has taken rapid steps in the last few years to secure India on both sides. India needed to make rapid changes in its air force to counter a formidable enemy like China. As part of this, India signed an agreement with France for 36 Rafale aircraft and added them to the Indian Air Force.

With the advent of Rafael, China's mathematics has completely changed. According to a report by Chinese defense experts, China will need three fighter jets to counter India's Rafael. These three aircraft require a fifth generation J-20 stealth fighter jet and two other fourth generation fighter jets. This means that with the arrival of Rafael, India has made China 1: 3. That is why China, which is just on the border today, has not dared to move forward. But this math is temporarily on India's side. The declining strength of the Indian Air Force is, of course, a matter of concern for India. Although India has repeatedly called for tenders for the purchase of fighter jets from the international market to strengthen the Indian Air Force, no agreement has been reached in the last eight years due to various reasons. But at the same time, the strength of the air force is declining.

After the production of Tejas MK1, India joined AMCA. (The Advanced Medium Combat Aircraft) and T.B. D. F. Although ambitious projects like (Twin Engine Deck Based Fighter) as well as Tejas have started working on MK2 version, in reality, these things are likely to dawn by 2030 to add to India's defense readiness. At such a time, the Indian Air Force and Navy will not be able to protect India from the rapidly declining number of aircraft. That is why India has once again taken steps to procure fighter jets from another country. Significant agreements are likely to be reached by the end of this year.

The Indian Air Force has invited tenders for the purchase of 114 aircraft. India is expected to spend about 30 billion USD on it. But it is impossible to buy 114 aircraft at such a price with the terms of their technology transfer and manufacturing in India. If we spend more money on these aircraft, then India's ambitious projects will have to be slashed. That is why the number of fighter jets is likely to be halved to almost half by combining India's need and future self-reliant India. Of these, 18 aircraft are in ready condition and 36 aircraft will be manufactured in India. The agreement is considered a real competition between the two aircraft.

It is almost certain that one of the US F15 EX and France's Rafael will win. The Rafael F4 version is at the forefront. India has already purchased the Rafael aircraft. Therefore, arrangements for those aircraft are already in place in India. France is ready to accept many conditions of India. With this, Rafael is one step ahead of the American aircraft. Therefore, in the next few months, there is a strong possibility of an agreement between India and France for the purchase of 54 Rafael. India's second aircraft carrier INS Vikrant will join the Indian Navy on August 15, 2022. For that, the Indian Navy needs STOBAR ("short take-off but arrested recovery") type aircraft. The Indian Navy is not satisfied with the technology of the MiG-29 on INS Vikramaditya. That is why the Indian Navy has turned its attention to one of the two, the Rafael M and the Super Hornet F18 for INS Vikrant.

Tests for both aircraft are almost complete for INS Vikrant. It shows America's F18 Super Hornet ahead of Rafael M. India will buy 26 fighter jets for the navy in the coming months. At the same time, by signing an agreement with both the United States and France, India will be able to reach a political settlement through this agreement. It is now clear that India will also buy Chinook and Apache its helicopters from the US. Both the helicopters are already part of the Indian Army and the India is said to be very satisfied with their efficiency. In particular, Chinook helicopters, during the Indo-China conflict, easily delivered cannons like Howitzer to India's battlefield at high altitudes. Which, of course, made the China to change there positions. For this, the Indian Air Force has demanded Chinook and Apache helicopters.

Overall, these three agreements, which are crucial to India's defense, are coming to an end in the coming months, which will add a huge boost to India's defense readiness. This will enable India to be one step ahead of the enemy on both fronts by 2030 and beyond until the ambitious project of a self-reliant India is completed. Good luck with this agreement as soon as possible.

Jai Hind !!!

Photo Search Courtesy: - Google

Note: - The wording in this post is copyrighted.



सामर्थ्यवान भारत... विनीत वर्तक ©

 सामर्थ्यवान भारत... विनीत वर्तक ©

गेली ३ वर्ष भारताच्या सिमेवर युद्धाचे ढग गर्दी करून आहेत. एकीकडे पाकिस्तान तर दुसरीकडे चीन ने आपला मोर्चा भारताकडे वळवलेला आहे. अश्या परिस्थितीत ज्याला टू फ्रंट वॉर असं म्हंटल जाते. त्या परिस्थितीतुन भारत जात आहे. प्रत्यक्ष युद्ध झालं नसलं तरी युद्धजन्य परिस्थिती ही सैन्यासाठी आणि देशाचं संरक्षण करणाऱ्या यंत्रणांसाठी सारखीच असते. अश्या वेळेस भारताला दोन्ही बाजूंवर सुरक्षित करण्यासाठी भारताने गेल्या काही वर्षात अतिशय वेगाने पावलं टाकली आहेत. भारताला चीन सारख्या प्रबळ शत्रूला सीमेवर थोपवण्यासाठी आपल्या वायू दलात वेगाने बदल करण्याची गरज भासली. त्याचाच एक भाग म्हणून भारताने फ्रांस सोबत ३६ राफेल विमानांचा करार करून ती भारतीय वायू दलात समाविष्ट केली.

राफेल च्या येण्याने चीन च गणित पूर्णपणे बदलून गेलं आहे. चीन च्या संरक्षण तज्ञांच्या अहवालानुसार भारताच्या एका राफेल ला टक्कर देण्यासाठी चीन ला ३ लढाऊ विमानांची गरज भासणार आहे,. या ३ विमानात एक पाचव्या पिढीतील जे २० सारखं स्टेल्थ लढाऊ विमान आणि इतर दोन ही चौथ्या पिढीतील लढाऊ विमान गरजेची आहेत. याचा अर्थ राफेल च्या येण्याने भारताने १:३ अशी स्थिती चीन ची केलेली आहे. त्यामुळेच चीन आज सीमेवर फक्त तळ ठोकून आहे त्याची पुढे यायची हिम्मत झालेली नाही. पण हे गणित तात्पुरतं भारताच्या बाजूने आहे. भारतीय वायू सेनेची कमी होत जाणारी ताकद हा भारतासाठी चिंतेचा विषय नक्कीच आहे. भारतीय वायू सेनेला बळकट करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय बाजारातून लढाऊ विमानांच्या खरेदीच्या निविदा अनेकदा मागवल्या असल्या तरी गेली ८ वर्ष त्या संबंधीचे करार अस्तित्वात अनेक कारणांनी आलेले नाहीत. पण त्याचवेळी वायू सेनेची ताकद मात्र कमी होत गेलेली आहे.

तेजस एम के १ च्या निर्मिती नंतर भारताने ए.एम.सी.ए. (The Advanced Medium Combat Aircraft) आणि टी.बी. डी. एफ. (Twin Engine Deck Based Fighter) सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प तसेच तेजस एम.के.२ व्हर्जन वर काम करण्यास सुरवात केली असली तरी प्रत्यक्षात या गोष्टी भारताच्या संरक्षण सज्जतेत भर घालण्यासाठी २०३० साल उजाडण्याची शक्यता आहे. अश्या वेळेस भारतीय वायू दल आणि नौदल वेगाने कमी होत जाणाऱ्या विमानाच्या संख्येने भारताचं संरक्षण करू शकणार नाही. त्यासाठीच पुन्हा एकदा भारताने एखाद्या दुसऱ्या देशातून लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी पावलं टाकली आहेत. त्या संबंधीचे महत्वाचे करार या वर्षाअखेरपर्यंत होऊ शकतात.

भारतीय वायू दलाने ११४ विमानांच्या खरेदीसाठी निविदा मागवलेल्या आहेत. भारताने त्यासाठी जवळपास ३० बिलियन अमेरिकन डॉलर चा खर्च अपेक्षित धरलेला आहे. पण इतक्या किमतीत ११४ विमान त्यांच्या तंत्रज्ञान हस्तांतरण आणि भारतात बनवण्याच्या अटींसह विकत घेता येणं अशक्य आहे. त्यापेक्षा जास्त पैसे आपण या विमानांसाठी घालवले तर भारताच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना कात्री लावावी लागेल. यासाठीच भारताची गरज आणि भविष्यातला आत्मनिर्भर भारत यांची सांगड घालून ही संख्या जवळपास अर्धी करून ५४ च्या आसपास लढाऊ विमानांचा करार होण्याची शक्यता दिसते आहे. यातील १८ विमान ही तयार स्थितीत तर ३६ विमान भारतात बनवली जाणार आहेत. या करारात दोन विमानात खरी स्पर्धा मानली जात आहे.

अमेरिकेचं एफ १५ इ एक्स आणि फ्रांस च राफेल यापैकी एक जण ही बाजी मारेल असं जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यातही राफेल एफ ४ च व्हर्जन हे सगळ्यात पुढे आहे. भारताने आधीच राफेल विमान खरेदी केली आहेत. त्यामुळे त्या विमानांसाठी लागणारी व्यवस्था भारतात आधीपासून आहे. फ्रांस भारताच्या अनेक अटी मानण्यास तयार आहे. या सोबत राफेल अमेरिकेच्या विमानापेक्षा एक पाऊल पुढे आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात भारत आणि फ्रांस दरम्यान ५४ राफेल खरेदीचा करार होण्याची दाट शक्यता दिसत आहे. भारताची दुसरी विमानवाहू युद्धनौका आय.एन.एस. विक्रांत येत्या १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या नौदलात समाविष्ट होत आहे. त्या साठी भारतीय नौदलाला STOBAR ("short take-off but arrested recovery") अश्या पद्धतीच्या विमानांची गरज आहे. आय.एन.एस. विक्रमादित्य वर असलेल्या मिग २९ च्या तंत्रज्ञानाने भारतीय नौदल समाधानी नाही. त्यामुळेच भारतीय नौदलाने विक्रांत साठी राफेल एम आणि सुपर हॉर्नट एफ १८ या दोघांपैकी एक यावर आपलं लक्ष्य वळवलेलं आहे.

आय.एन. एस. विक्रांत साठी या दोन्ही विमानांच्या चाचण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. यात राफेल एम पेक्षा अमेरिकेचं एफ १८ सुपर हॉर्नट पुढे जाताना दिसत आहे. भारत नौदलासाठी २६ लढाऊ विमान घेणार असून हा करार येत्या काही महिन्यात होणार आहे. एकाचवेळी अमेरिका आणि फ्रांस या दोन्ही मित्र देशांन सोबत करार करून राजकीय दृष्ट्या सुद्धा भारत ताळमेळ या करारातून साधणार आहे. या सोबत भारत अमेरिकेकडून चिनुक आणि आपाचे हेलिकॉप्टर ही खरेदी करणार असल्याचं आता स्पष्ट होते आहे. ही दोन्ही सैनिकी हेलिकॉप्टर भारतीय सेनेचा आधीच भाग असून त्यांच्या कार्यक्षमतेमुळे भारतीय वायू दल अतिशय समाधानी असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष करून चिनुक हेलिकॉप्टर ने भारत- चीन विवादाच्या वेळी अगदी हॉवित्झर सारख्या तोफा अगदी उंचावर भारताच्या युद्धभूमीवर सहजरित्या पोचवल्या होत्या. ज्यामुळे चीन च्या रणनीतीवर खूप फरक पडल्याचं सांगितलं जाते. यासाठी भारतीय हवाई दलाने चिनुक आणि आपाचे हेलिकॉप्टर ची मागणी केलेली आहे.

एकूणच काय तर भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे हे तीन करार येत्या काही महिन्यात पूर्णत्वाला जात असून त्यामुळे भारताच्या संरक्षण सज्जतेत खूप मोठी भर पडणार आहे. २०३० पर्यंत आणि त्या पुढे आत्मनिर्भर भारताचे महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाला जाई पर्यंत याच गोष्टी भारताला दोन्ही आघाड्यांवर शत्रूपेक्षा एक पाऊल पुढे राहण्याची क्षमता देणार आहेत. हे करार लवकरात लवकर होऊन जगातील सर्वोत्तम लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर भारताच्या सीमेवर शत्रूशी दोन हात करायला सज्ज होवोत यासाठी शुभेच्छा.

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



Wednesday 8 June 2022

#Khaare_vaare_matlai_vaare (Part 23) ... vinit vartak ©

 #Khaare_vaare_matlai_vaare (Part 23) ... vinit vartak ©

“No country in the world is giving us money for fuel and coal. Only India is giving "... Ranil Wickremesinghe, Sri Lankan PM

This statement made by the Prime Minister of Sri Lanka yesterday is once again underlining the role of India's Vasudhaiva Kutumbakam on the world map. Sri Lanka is currently going through a very difficult situation. In the next six months, Sri Lanka needs  6 billion USD to run the country. India alone is responsible for providing 3.5 billion USD. India will provide aid to Sri Lanka in the form of medicine, diesel, fertilizer, coal and other essential commodities. When the whole world has turned its back on Sri Lanka. Then India alone stands for its neighbor. The Sri Lankan Prime Minister went on to say that there are limits to how much India can help. People in India are asking why we are helping Sri Lanka when our country is in trouble. 

Based on a statement made by a party spokesperson, Arab nations are currently pursuing an agenda against India. Basically, after the statement of one party spokesperson got so much air, different politics is being played on the world stage. It has the hand of some political leaders in India. All these gods have been put in the water for the sake of tarnishing the image of India and for our political gain. The country will sink, but our party should grow. This is the role of many political leaders. The real reason behind the Arab nations taking this role is the politics of oil.

India imports about 70% -80% of its daily oil requirements. To this day, we had to rely on Arab nations to meet his natural needs. India was getting about 50% -60% of oil from Arab nations including Iraq, Iran, Saudi Arabia, Oman, UAE. The rest of the need was met by African nations, the United States and South American countries. Russia's share was only 1%. Anyway, India has the largest refineries in the world. No country in the world can hold India's hand in producing petroleum products from crude oil. The Indian Reliance's Jamnagar refinery is the largest in the world. Reliance's refinery processes 1.2 million barrels of oil per day. (12 lakh barrels, 1 barrel is 158 liters). 80% of the products produced from this i.e. diesel, petrol are exported to the world. It is followed by the Nayara Refinery on the west coast of India, which has the largest capacity in the world. Apart from this, refineries of many companies like Indian Oil, Bharat Petroleum, Hindustan Petroleum are producing other products from crude oil in India.

Until now, these companies have been importing crude oil from Arab nations, processing it and exporting it to India and the world. But in the wake of the Russia-Ukraine war, many things changed on the world stage. Many nations in the world have imposed sanctions on Russia's crude oil. India has always been a friend of Russia. India took a neutral stance on Russia at all levels without succumbing to international pressure. Russia, aware of its ally's help, allowed India and Indian companies to buy crude oil at 40 USD cheaper than the international crude price, as well as in rupee and ruble. Of course, Russia has an advantage. Internationally, Russian oil, which lost markets across Europe, including the United States, Australia and Japan, was not getting a buyer. That is why Russia decided to sell the oil cheaply to China and India, the two largest countries in the world.

India and Indian companies benefited from the fact that while the price of oil was going up to 130 USD per barrel in the international market, Russian crude oil became available to India at about 2/3 of this price. India and Indian oil companies then began importing large quantities of Russian crude oil. No country in the world has been able to stop India from buying this oil because of its neutrality and weight in the international arena. In May alone, India imported 8,40,645 barrels / day of oil from Russia. In April, the figure was 3,88,666 barrels per day. Now, in one month, India has more than doubled its imports from Russia. In May 2021, the figure was 1,36,774 barrels / day. This shows how fast India is turning to Russian crude oil. India will import about 10,50,000 barrels / day of oil in June 2022, but in the following month, more crude oil orders were placed by Indian companies with Russia. 

Now the sadness of the Arab nations has come to the fore. The rate at which India is turning to Russian oil. At that rate, the Arab nations' dependence on oil is rapidly diminishing. Arab nations cannot afford to lose such a large customer base. At the same time, Indian oil companies will be able to sell crude oil products cheaper than in other countries. (Note that Russia offers a discount of 40 USD per barrel.) Indian companies are seeing a huge increase in profits. India is selling this product to the whole world including USA, Australia, Europe. Indian companies exported 3.37 million barrels of diesel to the world in March alone. Indian oil companies, which have refineries, are expected to make a profit of 40 billion USD this year. Due to high profit margins of Indian companies, naturally Indian companies can sell them cheaper than other countries. This is hurting the Arab nations. The Arab nations have played a ploy to tarnish India's image in order to stop it. His own political leaders are supporting him from some countries and some from abroad. While these things have not tarnished India's image, there is no denying that these countries have had the opportunity to speak out about India.

Politics based on religion is bad on both sides. All politicians, party workers and party office bearers need to keep in mind that it tarnishes its own image as a country. The statement did not help but benefit the Arab nations against India. Of course, India has rightly registered its protest. But overall, the economic aspect is more important than religion in all these controversies. The rapid movement of Indian winds towards Russian crude hurts the stomachs of Arab nations. In the global petroleum market, the salty winds have now been replaced by the Matalai winds. Which are going to bring a storm with you. Due to the possibility of which the Arab nations have already begun to form a front. 

I would not be surprised if there are more attempts to tarnish India's image in the near future. Reason money speaks. The Arab world, which is economically dependent on crude oil alone, will be hit the hardest by these changed winds. My guess is that they could go to any lengths to stop his progress.

Jai Hind !!!

Photo Search Courtesy: - Google

Note: - The wording in this post is copyrighted.



#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २३)... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २३)... विनीत वर्तक ©

“No country in the world is giving us money for fuel and coal. Only India is giving"... Ranil Wickremesinghe, Sri Lankan PM

काल श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी केलेलं हे विधान भारताची वसुधैव कुटुंबकम भुमिका पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर अधोरेखित करत आहे. श्रीलंका सध्या अतिशय बिकट परिस्थितीतून जात आहे. पुढल्या ६ महिन्यात श्रीलंकेला देश चालवण्यासाठी ६ बिलियन अमेरिकन डॉलर ची गरज आहे. त्यातील ३.५ बिलियन डॉलर पुरवण्याची जबाबदारी एकट्या भारताने उचलली आहे. ही मदत श्रीलंकेला औषध, डिझेल, खत, कोळसा आणि इतर जीवनावश्यक्य वस्तूंच्या स्वरूपात भारत करणार आहे. जेव्हा संपूर्ण जगाने श्रीलंकेकडे पाठ फिरवली आहे. तेव्हा एकटा भारत आपल्या शेजारील देशासाठी उभा आहे. श्रीलंकन पंतप्रधानांनी पुढे जाऊन असं म्हंटलेलं आहे की, भारत किती मदत करू शकतो यावर मर्यादा आहेत. भारतात लोक विचारत आहेत की जेव्हा आपल्या देशात अडचण आहे तेव्हा आपण श्रीलंकेला मदत का करत आहोत? हे सूचक वक्तव्य सुद्धा त्यांनी श्रीलंकन जनतेला ऐकवलं आहे. 

कोणत्यातरी पक्षाच्या प्रवक्त्याने केलेल्या विधानाचा आधार घेत अरब राष्ट्रांनी भारताविरुद्ध एक अजेंडा सध्या राबवला आहे. मुळात एका पक्ष प्रवक्त्याच्या विधानाला इतकी हवा मिळण्यामागे वेगळं राजकारण जागतिक पटलावर खेळलं जात आहे. यात भारतातील काही राजकीय नेत्यांचा हात आहे. भारताची प्रतिमा कशी मालिन होईल आणि त्यातून आपला राजकीय फायदा कसा होईल यासाठी या सर्वानी देव पाण्यात ठेवले आहेत. देश बुडाला तरी चालेल पण आपला पक्ष मोठा झाला पाहिजे अशीच भूमिका अनेक राजकीय नेत्यांची बघायला मिळत आहे. अरब राष्ट्रांनी ही भूमिका घेण्यामागे खरं कारण आहे ते तेलाचं राजकारण. 

भारत त्याला लागणाऱ्या रोजच्या तेलाच्या गरजेपकी जवळपास ७०%-८०% क्रूड ऑइल आयात करतो. साहजिक इतकी गरज भागवण्यासाठी त्याला आजपर्यंत अरब राष्टांवर अवलंबून राहावं लागत होतं. भारत जवळपास ५०%-६०% ऑइल अरब राष्ट्रांकडून ज्यात इराण, सौदी अरेबिया, ओमान, यु.ए.ई  सारख्या देशांचा  सहभाग आहे त्यांच्याकडून घेत होता. या नंतर उरलेली गरज आफ्रिकन राष्ट्र, अमेरिका आणि साऊथ अमेरिकन देशांकडून भागवत होता. रशिया चा हिस्सा या सगळ्यात अवघा १% इतका होता. असं असलं तरी भारतात जगातील सगळ्यात मोठ्या रिफायनरी आहेत. कच्या तेलापासून पेट्रोलियम प्रॉडक्ट तयार करण्याच्या बाबतीत जगातील कोणताच देश भारताचा हात धरू शकत नाही. भारताच्या रिलायन्स कंपनीची जामनगर इकडे असलेली रिफायनरी जगात सगळ्यात मोठी आहे. रिलायन्स च्या या रिफायनरीत रोज १.२ मिलियन बॅरल ऑईल प्रोसेस केलं जाते. ( १२ लाख बॅरल, १ बॅरल म्हणजे १५८ लिटर). यातून निर्माण झालेले ८०% प्रॉडक्ट म्हणजेच डिझेल, पेट्रोल जगात निर्यात केलं जाते. या खालोखाल नायरा रिफायनरी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तिची क्षमता ही जागतिक तुलनेत खूप मोठी आहे. या शिवाय इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम अश्या अनेक कंपन्यांच्या रिफायनरीज भारतात कच्या तेलापासून बाकीचे प्रॉडक्ट तयार करत असतात. 

आत्तापर्यंत या कंपन्या अरब राष्ट्रांकडून कच्च तेल घेऊन त्यावर प्रक्रिया करून ते भारतात आणि जगात निर्यात करत होत्या. पण रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी जागतिक पटलावर बदलल्या. जगातील अनेक राष्ट्रांनी रशियाच्या कच्या तेलावर निर्बंध घातले. भारत हा नेहमीच रशियाचा मित्र राहिला आहे. भारताने आंतरराष्ट्रीय दबावाला न दबता रशिया बद्दल सगळ्या स्तरावर तटस्थ भूमिका घेतली. रशियाने आपल्या मित्राची या मदतीची जाणीव ठेवताना भारताला आणि भारतीय कंपन्यांना आंतरराष्ट्रीय कच्या तेलाच्या किमतीपेक्षा ४० डॉलर स्वस्त भावाने तसेच रुपया आणि रुबेल मधून कच्च तेल विकत घेण्याची सूट दिली. अर्थात यात रशियाचा फायदा आहे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर संपूर्ण युरोप, अमेरिकेसह, ऑस्ट्रेलिया आणि जपान च मार्केट गमावलेल्या रशियन तेलाला कोणी गिऱ्हाईक मिळत नव्हता. त्यामुळेच रशियाने जगातील सगळ्यात मोठे दोन देश चीन आणि भारताला हे तेल स्वस्तात विकण्याचा निर्णय घेतला. 

भारताला आणि भारतीय कंपन्यांना याचा फायदा असा झाला की जिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव १३० डॉलर प्रति बॅरल जात असताना भारताला यापेक्षा जवळपास २/३ किमतीत रशियन कच्च तेल उपलब्ध झालं. भारताने आणि भारतीय तेल कंपन्यांनी मग रशियन कच्च तेल मोठ्या प्रमाणावर आयात करायला सुरवात केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत निष्पक्ष असल्यामुळे तसेच भारताचं वजन असल्याने जगातील कोणतीच राष्ट्र भारताला हे तेल विकत घेण्यापासून रोखू शकलेली नाहीत. एकट्या मे महिन्यात भारताने रशियाकडून ८,४०,६४५ बॅरल / प्रति दिवस ऑईल रशियाकडून आयात केलं. एप्रिल मधे हाच आकडा ३,८८,६६६ बॅरल / प्रति दिवस इतका होता. आता एका महिन्यात भारताने रशियाकडून आपली आयात दुपटीपेक्षा जास्त केली आहे. मे २०२१ मधे हाच  आकडा १,३६,७७४ बॅरल / प्रति दिवस इतका होता.  यावरून स्पष्ट होते आहे की कश्या पद्धतीने भारत अतिशय वेगाने रशियाच्या कच्च्या तेलाकडे वळतो आहे.  जून २०२२ मधे भारत जवळपास १०,५०,००० बॅरल / प्रति दिवस ऑईल आयात करेल तर त्या नंतरच्या महिन्यात यापेक्षा जास्ती प्रमाणात कच्च्या तेलाच्या ऑर्डर भारतीय कंपन्यांनी रशियाला दिलेल्या आहेत. 

आता अरब राष्ट्रांची दुखरी नस समोर आली असेल. ज्या वेगाने भारत रशियन ऑईल कडे वळतो आहे. त्या वेगाने त्याच अरब राष्ट्रांच्या तेलावर असलेलं अवलंबित्व कमी होते आहे. अरब राष्ट्रांना इतका मोठा ग्राहक गमावणे परवडणारं नाही. त्याच सोबत भारतीय तेल कंपन्या या कच्च्या तेलापासून तयार झालेली प्रॉडक्ट इतर देशांच्या तुलनेत स्वस्त विकू शकणार आहेत. ( लक्षात घ्या प्रत्येक बॅरल मागे रशिया घसघशीत ४० डॉलर ची सूट देतो आहे.) भारतीय कंपन्यांना होणाऱ्या नफ्यात प्रचंड वाढ होते आहे. भारत ही प्रॉडक्ट अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपसह संपूर्ण जगाला विकतो आहे. भारतीय कंपन्यांनी एकट्या मार्च महिन्यात ३.३७ मिलियन बॅरल डिझेल जगात निर्यात केलेलं आहे. भारतीय तेल कंपन्या ज्यांच्या रिफायनरीज आहेत त्या एका वर्षात तब्बल ४० बिलियन अमेरिकन डॉलर चा नफा या वर्षी कमावतील असा अंदाज आहे. भारतीय कंपन्यांची प्रॉफिट मार्जिन जास्ती असल्यामुळे साहजिक भारतीय कंपन्या इतर देशांच्या तुलनेत स्वस्तात ती विकू शकत आहेत. याचा फटका अरब राष्ट्रांना होतो आहे. भारताला रोखण्यासाठी भारताची प्रतिमा मालिन करण्याची चाल अरब राष्ट्रांनी खेळली आहे. त्याला साथ देणारे आपलेच राजकीय नेते काही देशातून तर काही विदेशातून पाठिंबा देत आहेत. या गोष्टींमुळे भारताच्या प्रतिमेला धक्का बसला नसला तरी भारताविषयी बोलण्याची संधी मात्र या देशांना मिळाली हे वास्तव नाकारून चालणार नाही. 

धर्माच्या आधारावर राजकारण हे दोन्ही बाजूने वाईट आहे. त्यात एक देश म्हणून आपलीच प्रतिमा डागाळते याच भान सर्व राजकारणी, पक्ष कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी यांनी ठेवणं गरजेचं आहे. त्या वक्तव्यावरून फायदा तर काही झाला नाही पण अरब राष्ट्रांना भारता विरुद्ध फुत्कार करायला संधी मिळाली. अर्थात भारताने योग्य रीतीने आपला ही निषेध नोंदवला आहे. पण एकूणच या सर्व वादामध्ये धर्मापेक्षा आर्थिक बाजू जास्त महत्वाची आहे. भारतीय वाऱ्यांचा रशियन क्रूड कडे वेगाने होणारा प्रवास अरब राष्टांच्या पोटात दुखतो आहे. जागतिक पेट्रोलियम मार्केट मधे खाऱ्या वाऱ्यांची जागा आता मतलई वाऱ्यांनी घेतली आहे. जे आपल्यासोबत एक वादळ आणणार आहेत. ज्याच्या शक्यतेमुळे अरब राष्ट्रांनी आत्तापासून मोर्चेबांधणी ला सुरवात केली आहे. 

येत्या काळात भारताची प्रतिमा मालिन करण्याचे आणखी जोरदार प्रयत्न झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण पैसा बोलता हैं. एकट्या क्रूड ऑइल च्या जिवावर संपूर्ण देशाचं अर्थकारण करणाऱ्या अरब राष्ट्रांना या बदललेल्या वाऱ्यांचा फटका सगळ्यात जास्ती बसणार आहे. त्याची प्रगती थांबवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतील असा माझा अंदाज आहे. 

क्रमशः 

जय हिंद !!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



#News_on_Tapari 8 ... Vinit Vartak ©

#News_on_Tapari 8 ... Vinit Vartak ©

Two days ago, India launched Agni 4 or I.R. B. M. Successfully tested an intermediate-range ballistic missile (IRBM). What exactly did this test of Agni 4 achieve? Why are Agni series missiles so important? It is important to know this.

The launch of the Agni Missile Series was due to the progress made by China in this area. In the 1960s, China acquired nuclear capability with the help of Russia. It took 70 decades for India to acquire nuclear capability. China had made great strides in this area due to its good leadership. India, however, as an advocate of peace, remained indifferent in this matter. That's why China took a leap in missile technology in the 1980s and 1990s. Then India's scars hit. India needed to emerge as a powerful nation to counter China's growing dominance. This is the challenge facing India. D.R.D.O. then president Dr. A.P.J.Abdul Kalam Recognized this. After he made the political leadership aware of this, India started working on missile technology. This project of India was named 'Agni' which is one of the 5 elements of nature.

Agni missile technology was developed in stages. The first missile in the series, Agni 1, was first tested in 1989. Initially, it had a range of 700 to 2000 kilometers. In the next stage, Agni 2, Agni 3, Agni 4, Agni 5 and Agni 6 along with Agni Prime are being developed. Agni missiles are capable of carrying nuclear warheads alongside conventional warheads. That is why Agni series missiles are very important for India to control China.

Two days ago, India last night tested the Agni 4 missile in the Agni series. This test was part of a user trial. This meant that the missile was intended to test the capabilities of the people and the organizations that would use it, and to see how well the missile was performed. Agni 4 is an intermediate-range ballistic missile (IRBM) as written on the missile. This missile is capable of carrying a conventional or nuclear warhead up to 4000 kms with a weight of 800-1000 kgs. In the current test, the missile has hit its target at a distance of 4000 km within 100 meters. Besides, the missile was not just a nuclear warhead. All other systems were real. All of these systems work successfully in the dark at night, making the test a success. The missile had undergone several modifications. It was the first to use composite material as well as modern motor systems and laser guided navigation systems. This not only reduces the weight but also increases the accuracy.

The Agni 5 missile is also in the advanced stage of deployment. Its user trials will start soon. India is deliberately underestimating the potential of Agni 5. Many defense experts privately say that Agni 5 is capable of hitting targets at a distance of 8000 km. D.R.D.O. Agni 6 is also being built and its capacity will be to see the target at a distance of 12,000 km. It will have the capacity to carry 10 different (Multiple Independent Reentry Vehicles) nuclear warheads weighing 3000 kg. Once a missile is fired, we will be able to carry out nuclear attacks on 10 different targets simultaneously.

The test of fire has once again shown the world that India is ready for any situation. For the past few months, India has been conducting continuous missile tests. These tests of the world's best missile technology, such as BrahMos and Agni, are strengthening India's global position. Congratulations to all the scientists, engineers, staff, DRDO, Bharat Dynamic Limited as well as their subsidiaries, consultants and other contractors behind these tests and best wishes for their future endeavors.

Jai Hind !!!

Photo Search Courtesy: - Google

Note: - The wording in this post is copyrighted.



#टपरीवरच्या_बातम्या ८... विनीत वर्तक ©

 #टपरीवरच्या_बातम्या ८... विनीत वर्तक  ©


भारताने दोन दिवसांपूर्वी अग्नी ४ या आय.आर. बी. एम. म्हणजेच intermediate-range ballistic missile (IRBM) ची यशस्वी चाचणी केली. अग्नी ४ च्या या चाचणीने नक्की काय साधलं? मुळात अग्नी सिरीज मधील क्षेपणास्त्र का महत्वाची आहेत? हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

अग्नी मिसाईल सिरीज ची सुरवात होण्यामागे चीन ने या क्षेत्रात केलेली प्रगती कारणीभूत होती. ६० च्या दशकात चीन ने रशियाच्या साह्याने आण्विक क्षमता मिळवली होती. भारताला आण्विक क्षमता मिळवायला ७० च दशक उगवावं लागलं. चीन ने तोवर या क्षेत्रात चांगल्या नेतृत्वामुळे खूप प्रगती केली होती. भारत मात्र शांतीचा पुरस्कर्ता म्हणून या बाबतीत गाफील राहिला. त्यामुळेच जेव्हा चीन ने १९८० ते ९० च्या दशकात मिसाईल तंत्रज्ञानात उंच उडी घेतली. तेव्हा भारताचे धाबे दणाणले. चीनच्या वाढत्या वर्चस्वाला शह द्यायचा असेल तर भारताने ही सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून पुढे येण्याची गरज होती. भारतासमोर असलेलं हे आव्हान डी.आर. डी.ओ. चे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ओळखलं. त्यांनी राजकीय नेतृत्वाला याची जाणीव करून दिल्यावर भारताने मिसाईल तंत्रज्ञानावर काम करायला सुरवात केली. भारताच्या या प्रोजेक्ट ला निसर्गातील ५ तत्वांपैकी एक असणाऱ्या 'अग्नी' च नाव दिलं गेलं.

अग्नी मिसाईल तंत्रज्ञान हे टप्याटप्याने विकसित करण्यात आलं. या सिरीज मधील पहिलं मिसाईल अग्नी १ ची पहिल्यांदा १९८९ मधे चाचणी करण्यात आली. सुरवातीला याची क्षमता ७०० ते २००० किलोमीटर च्या टप्यात मारा करण्याची होती. याच्या नंतरच्या स्टेज मधे अग्नी २, अग्नी ३, अग्नी ४, अग्नी ५ आणि अग्नी ६ सोबत अग्नी प्राईम विकसित करण्यात येत आहेत. अग्नी मिसाईल हे पारंपरिक वॉरहेड सोबत आण्विक वॉरहेड नेण्यास सक्षम आहे. त्यामुळेच चीनवर अंकुश ठेवण्यासाठी अग्नी सिरीज ची मिसाईल ही भारतासाठी अतिशय महत्वाची आहेत.

दोन दिवसांपूर्वी भारताने अग्नी सिरीज मधील अग्नी ४ या मिसाईल ची रात्री चाचणी घेतली. ही चाचणी युझर ट्रायल चा एक भाग होती. याचा अर्थ हे मिसाईल जी लोक आणि ज्या संस्था वापरणार त्यांना त्याच्या क्षमता बघण्यासाठी आणि मिसाईल कितपत चाचण्यात खरं उतरते हे बघण्यासाठी होती. अग्नी ४ हे मिसाईल वर लिहिलं तसं intermediate-range ballistic missile (IRBM) आहे. हे मिसाईल ८००-१००० किलोग्रॅम वजनाच पारंपरिक किंवा आण्विक वॉरहेड ४००० किलोमीटर वर नेण्यास सक्षम आहे. आता झालेल्या चाचणीत या मिसाईल ने ४००० किलोमीटर वरील आपलं लक्ष्य १०० मीटर अंतराच्या आत वेधलं आहे. या शिवाय या मिसाईल मधे फक्त आण्विक वॉरहेड नव्हतं. बाकी सगळ्या प्रणाली या खऱ्या होत्या. रात्रीच्या वेळी अंधारात यातील सर्व प्रणालींनी अचूक काम करत ही चाचणी यशस्वी केली आहे. हे मिसाईल मधे आधीपेक्षा अनेक बदल करण्यात आले होते. यात कंपोझिट मटेरियल तसेच आधुनिक मोटर प्रणाली आणि लेझर गायडेड नेव्हिगेशन प्रणाली पहिल्यांदा वापरण्यात आली होती. यामुळे याच वजन तर कमी झालच पण त्याचसोबत त्याच्या अचूकतेत वाढ झाली आहे.

अग्नी ५ हे मिसाईल सुद्धा डिप्लॉयमेंट च्या एडव्हान्स स्टेज मधे आहे. याच्या पण युझर ट्रायल लवकरच सुरु होतील. अग्नी ५ ची क्षमता जाणून बुजून भारत कमी सांगतो आहे. अनेक रक्षा विशेतज्ञ खाजगीत हे सांगतात की अग्नी ५ तब्बल ८००० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्यास सक्षम आहे. डी.आर.डी.ओ. अग्नी ६ च ही निर्माण करत असून याची क्षमता तब्बल १२,००० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्याची असणार आहे. ३००० किलोग्रॅम वजनाचे १० वेगवेगळे (Multiple Independent Reentry Vehicle) आण्विक वॉरहेड नेण्याची याची क्षमता असणार आहे.  एक मिसाईल डागल्यावर आपण १० वेगवेगळ्या लक्ष्यांवर आण्विक हल्ला एकाच वेळी करू शकणार आहोत.

अग्नी च्या चाचणीने भारताने आपण कोणत्याही स्थितीसाठी तयार असल्याचं जगाला पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. गेले काही महिने भारत सातत्याने मिसाईल च्या चाचण्या करत आहे. ब्राह्मोस, अग्नी अश्या जगातील सर्वोत्तम मिसाईल तंत्रज्ञानाच्या या चाचण्या भारताचं जागतिक स्थान अधिक मजबूत करत आहेत. या चाचण्यांमागे असणाऱ्या सर्व वैज्ञानिक, अभियंते, कर्मचारी, डी.आर.डी.ओ., भारत डायनॅमिक लिमिटेड तसेच त्यांच्या उपकंपन्या, कन्सल्टन्ट आणि इतर कंत्राटदार यांच खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढल्या कार्याला शुभेच्छा

जय हिंद !!!

 
फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.