Thursday 11 June 2015

    वेळेच महत्व....... विनीत वर्तक
    वेळेच महत्व सांगणारी एक गोष्ट लहान असताना वाचली होती. अगदी एका तपापासून ते एका शतांश सेकंदा पर्यंत. काल त्याच महत्व अजून अधोरेखित झाल. जेव्हा सगळे देश नेपाळ मध्ये झालेल्या भूकंपाच्या घटनेत नेपाळ ला सहानभूती देत होते तेव्हा भारतीय वायुसेनेच विमान काठमांडू मद्धे मदत घेऊन उतरल सुद्धा होत.
    माझ्या दृष्टीने हा खूप मोठा फरक आहे दृष्टिकोनाचा. सी-१७ ग्लोब्मास्तर जगातील एक अत्याधुनिक विमान जे अगदी मोजक्या जागेत अगदी कठीण परिस्तिथीत कुठेही उतरू शकते. प्...रचंड महाग असलेल हे अत्याधुनिक विमान युद्धासाठी वापरले जाते अश्या अत्यधुनिक विमानातून एन. डी. आर. एफ जे जवान ,सामुग्री , डॉक्टर, बाकी मदत जसे पाणी, फ्युल , ब्लान्केत , टेंट इत्यादी सामान काठमांडू मध्ये भारताने पाठवून पण दिल.
    भारतीय सेना , वायुसेना , नौसेना जगात अद्वितीय आहेतच त्यांच्या शौर्याला , देशाविषयीच्या निष्ठेबद्दल प्रचंड आणि खरच खूप प्रचंड आदर जनमानसात आहे. त्यांच्या ह्या कर्तुत्वाला सलाम आणि अगदी कुर्निसात आहेच. पण ह्या वेळेस कुठे तरी तो आदर राजकारण्यांविषयी वाटू लागला आहे.
    एखादी सेना कितीही चांगली असली तरी त्याला एक लीडर लागतो. तेव्हाच त्या सेनेच कर्तुत्व उजळून निघते. मोदींच्या रूपाने एक कणखर लीडर भारतीय सेनेला मिळाला आहे ह्यात कोणाच दुमत नसेल. येमेन मधील भारतीयांना परत आणण्याची कामगिरी असो वा आता नेपाळ मद्धे दिली जाणारी मदत ह्या मद्धे खास मोदि टच आहे हे आपण मान्य करायला हव.
    येमेन मधून भारतीयांना परत आणताना २ तासासाठी बॉम्ब वर्षाव आणि गोळीबारी बंद करावी ज्या योगे भारतीय विमानांना उडता येईल अशी रिक्वेस्ट मोदी नि सौदी अरेबियाच्या नेतृत्वाला केली होती. भारताच्या ह्या स्पेशल रिक्वेस्ट चा मान ठेवून सौदी अरेबियाने दोन तासांची मुभा दिली होती. त्या वेळेतच आपण भारतीय नागरिक तसेच ४१ देशांच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवू शकलो. ह्यात भारतीय सेनेच, जनरल व्ही. के . सिंग ह्याच कर्तुत्व आहेच पण सगळ्यात पुढे राहून लीडर प्रमाणे राजकारणातून मार्ग काढणाऱ्या मोदींच हि आहे.
    आज पर्यंत मला नाही आठवत कि भारताने कधी इतक्या प्रचंड वेगाने सूत्र हलवली आहेत. वर बघता ह्या सगळ्या गोष्टी एकदम सहज वाटत असल्या तरी अश्या गोष्टींसाठी प्रचंड प्लानिंग, अनेक संस्थांचा ताळमेळ तसेच राजकीय मनोबल लागते. सगळ्याच आघाड्यांवर मोदि आणि त्यांचे सहकारी प्रशंसेस पात्र आहेत. मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज, एस जयशंकर,राजनाथ सिंग तसेच अगदी सुरेश प्रभून पर्यंत सगळ्यांनीच आपला वाटा उचलेला आहे.
    भारतीय सेना, वायुसेना आणि नौसेना ह्याचं कार्य जितक उच्च कोटीच आहे त्याच लेवल पर्यंत राजकारण जाताना बघण हा ह्या दुखांच्या क्षणात एक सुखद अनुभव आहे. त्या लोकांवर जे दुख आल त्याची तुलना आपण करू शकत नाही किंवा सांत्वन सुद्धा पण ह्या दुःखाच्या आणि प्रचंड अडचणीच्या वेळेस भारताने , भारतीय सेनेने, भारतीय राजकारण्यांनी , भारताच्या लोकांनी जी तत्परता दाखवली आहे त्याला नेपाळ च नाही तर सगळ जग सलाम करते आहे.


    व्हाय आय स्टोप वाचिंग पोर्न .... विनीत वर्तक
    यु ट्यूब वरील एक विडीओ आपल्या सर्वानीच विचार करावा असा आहे. पोर्न हा सगळ्याचा आवडता विषय आहे पण कोणी त्यावर बोलायला तयार नसते. पोर्न मुवीज , ब्लू फिल्म्स आपल्या मनाच्या अंतरंगावर कसा परिणाम करतात. कळत नकळत आपल्या भावनांना कंट्रोल करतात आणि त्याचे काय परिणाम होतात इतक्या स्पष्टपणे प्रथमच जाणवले.
    सेक्स हे नेहमीच मनाशी संबंधित असलेली गोष्ट पण हळू हळू का होईना त्यातला मनाचा भाग बाजूला जाऊन शरीर आणि स्पेशली आपले जेनेटिक ऑर्गन जे ह...्या क्रियेत भाग घेतात तेच महत्वाचे बाकी सगळ काहीच मायने नसत असा समज हळू हळू मूळ धरू लागला आहे. त्याला कुठेतरी पोर्न इंडस्ट्री जबाबदार आहे.
    एक स्त्री आणि एक पुरुष जरी कुठल्याही स्वरूपाचे शरीरिक संबंध करत असले तरी त्यात बाकी सगळ बाजुला फक्त जेनेटिक ओरगन स्पेशली पुरुषांच्या बाबतीत किती मोठे असेल आणि सगळा फोकस तिकडेच म्हणजे स्पर्श , भावना , फोरप्ले हे काही महत्वाचे नाही फक्त आणि फक्त पेनीट्रेशन महत्वाचे हे दाखवण्याचा अट्टाहास. स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा भावना, स्पर्श , फोरप्ले सगळ बाजूला ठेवून पुरशाला आकर्षित करण्याचं तंत्र म्हणजे उन्नत्ता मग ती छातीच्या बाबतीत असो वा फिगरच्या बाबतीत. ह्या सगळ्याचा आपल्या मनावर होणारा परिणाम ह्याचा कधीतरी आपण विचार करतो का?
    रान गावरीली नि इतक्या सुस्पष्ट पद्धतीने इकडे सांगतो कि कश्या सगळ्या गोष्टी बलात्कार, विकृत मानसिकतेला जन्म देतात. हे घडल्यानंतर पुरुष आणि स्पेशली स्त्रीची होणारी घुसमट आणि त्यातून वाईट मार्गाचे अनुकरण ड्रग्स , एस्कोर्त , वैश्या व्यवसाय आणि एकूणच त्याची परिणीती एड्स , आत्महत्या आणि आयुष्याचा शेवट....
    आपण पोर्न बघतो म्हणजे आपण डिमांड करतो आहोत तर बाजारातून सप्लाय होणारच आणि सप्लाय हवा असेल तर अजून मुली , अजून स्त्रिया ह्या चक्रात फसत राहणार , ओढल्या जाणार. एका छोट्या गोष्टीतून २ क्षणांच्या आनंदासाठी आपण एक मोठी डिमांड बाजारपेठेत निर्माण करतो आणि त्यातून अश्या गोष्टीना हातभार लावतो.
    आपण बदलू शकतो का?? तर होय आणि समाज तर तो सुद्धा. सुरवात स्वतःपासून आणि सगळ्यांसाठी हि पोस्ट. इकडे एकही पुरुष नसेल आणि अगदी स्त्री सुद्धा कि कधी पोर्न बघितलं नसेल . पण ते सांगण्याच धाडस करणे म्हणजे स्वताच्या इमेज शी तडजोड करण अस सगळ्यांना वाटते कारण चांगले आणि वाईट ठरवण्याची आपली व्याख्या सेक्स ह्या स्टेशन वरून जाते. जिकडे सगळ्यांना उतरायचे असते पण उतरताना कोणी बघितले नाही पाहिजे अशी इच्चा असते. त्या उतरणाऱ्या आणि उतरू पाहणाऱ्या सगळ्यांसाठीच हि पोस्ट..
    रान गावरीली थ्यांक्स एक वेगळच विचार दिलास..
    ब्रेकिंग न्यूज...... विनीत वर्तक
    काल लागला बुवा एकदाचा निकाल. सगळ्यांचे जीव नुसते कासावीस होत होते. मिडीयाने पण भारतात सध्या ह्या खटल्या च्या निकालाशिवाय काहीच घडत नाही आहे. अस चित्र निर्माण केल. त्यात वृत्तपत्रे हि काही मागे नव्हती. लहानपणी वाटायचे कि आपल नाव टी व्ही किंवा वृत्तपत्रात यायला काहीतरी चांगले करावे लागते. मोठे व्हावे लागते. पण आजकाल वाईट कामाची प्रसिद्धी पहिल्या पानावर आणि ब्रेकिंग न्यूज मध्ये मिळते.
    त्यात पण शिक्षेचा निकाल ऐकून कस डोळ्यात पाणी आल. आणि त्याने... कपडे काय घातले. त्याच्या आईच सांत्वन कोणी कोणी केल. ह्यावर आपल्या मीडियाची मदार. ज्या निष्पाप लोकांचा बळी गेला. केस इथवर यायला किती तरी जणांची आयुष्य बरबाद झाली. त्याच्या डोळ्यातील अश्रून पर्यंत आपला मिडिया, आपली पत्रकारिता कधी पोहचू शकली नाही. कारण तिकडे गेले तरी ती ब्रेकिंग न्यूज होत नाही. ती फक्त एक बातमी असते.
    मला काल गम्मत वाटत होती कि काय लोक त्याच्या पुढे मागे धावतात. त्याने काय केल आहे तुमच्या आमच्या साठी?? एकवेळ अण्णा हजारे किंवा अजून कोणतेही सामाजिक कार्यकर्ते ह्यांच्या हाकेला असे लोक धावले असते. तर खरच खूप छान वाटल असत. पण तो दिवस कधी येणार नाही. कारण तिकडे सेलिब्रेटी नाही, पैसा नाही , मेन म्हणजे बाईट नाही. कोण आधी बातमी पोहचवते ह्यात सुद्धा स्पर्धा. शेवटी काय हजेरी लावून गोष्टी आहेत तश्याच.
    गिरे तो भी टांग उपर ह्या युक्ती प्रमाणे गोंजार्ण्यासाठी बरेच लोक लाईन लावून उभे होते. मग झोपलेले लोक कुत्रे काय ते रेल्वेचे मोटरमन इथपर्यंत सगळ्यांनीच आपले तारे तोडले. काय आहे वाहत्या प्रसिद्धीच्या गंगेत हात धुवायला फुकट मिळाले तर कोणाला नको आहे. पण शेवट काय आपण तरीही पिक्चर बघणार , शिट्या मारणार , ते दिसले कि सही घ्यायला मागे पुढे करणार. आता तर काय सेल्फी घेऊन कधी एकदा फेसबुक आणि व्हात्स अप वर टाकणार आणि एवरेस्ट सर केल्याच्या जल्लोषात सहभागी होणार.
    कायदा आपल्याला कधी समजलाच नाही. असला कायदा समजून घेण्याची माझी तरी मानसिक किंवा बौद्धिक पातळी नाही. जिकडे न्याय कोण कोणाला देत हे न्याय देवतेलाच ठाऊक. असो आता हे सगळ बिगुल संपून पुन्हा मिडिया आणि वुत्तपत्रे ब्रेकिंग न्यूज कडून बातम्यांकडे वळतील अशी भाबडी आशा बाळगूया.