भावनाचोरी... विनीत वर्तक ©
Saturday 31 July 2021
भावनाचोरी... विनीत वर्तक ©
Friday 30 July 2021
खोटारडा चीन... विनीत वर्तक ©
Tuesday 27 July 2021
अंतरांचं गणित (भाग २)... विनीत वर्तक ©
अंतरांचं गणित (भाग २)... विनीत वर्तक ©
Monday 26 July 2021
अंतरांचं गणित (भाग १)... विनीत वर्तक ©
अंतरांचं गणित (भाग १)... विनीत वर्तक ©
Sunday 25 July 2021
ए वतन तेरे लिए... विनीत वर्तक ©
काल संध्याकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन कट्टा यांच्यातर्फे आयोजित कारगिल विजय दिवसाच्या पूर्वसंध्येला एका कार्यक्रमाला झूम वरून उपस्थित होतो. प्रमुख वक्ते होते निवृत्त लेफ्टनंट जनरल पाटणकर. त्यांच्या कडून कारगिल विजय गाथा ऐकताना एका सैनिकाचा उल्लेख आला. आज कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने इतिहासाच्या पानात लुप्त झालेल्या अश्याच एका सैनिकाची गाथा आजच्या दिवसाने पुढे ठेवत आहे.
ए वतन तेरे लिए... विनीत वर्तक ©
हर करम अपना करेंगे
हर करम अपना करेंगे
ए वतन तेरे लिए......
दिल दिया है जां भी देंगे
ए वतन तेरे लिए......
कर्मा चित्रपटातील हे गीत ऐकलं की आजही अंगावर रोमांच उभे राहतात. पण रोमांच उभं राहणं वेगळं आणि ते प्रत्यक्षात जीवाची बाजी लावून खरं करणं यात जमीन आस्मानाचा फरक आहे. तो जेवढा फरक आहे तेवढाच फरक एक सैनिक आणि एका सामान्य नागरिकात आहे. कारण ज्यांनी कधी कारगिल, द्रास, बटालिक, मश्कोह हा भाग पहिलाच नाही त्यांना कारगिल युद्धाची जाणीव तितकी होणार नाही. कारण युद्ध हे अनुभवावं लागते ते घरात बसून समजून घेता येत नाही. ही गोष्ट आहे अश्याच एका सैनिकांची ज्याने वर लिहलेला प्रत्येक शब्द अनुभवला. आपल्या प्राणाची बाजी लावून भारताच्या सरहद्दीचं रक्षण करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याच्या या पराक्रमाचे वर्णन त्याच्या कमांडींग ऑफिसर कडून ऐकण्याचं भाग्य मला काल लाभलं. ते म्हणजे निवृत्त लेफ्टनंट जनरल पाटणकर.
राजस्थान च्या झुंझुणु जिल्ह्यातील एक १९ वर्षाचा तरुण भारतीय सैन्याच्या ८ जट बटालियन मधे १९८० साली दाखल झाला. आपल्या चपळतेने त्याने डोंगर रांगामधील चढाईत निपुणता मिळवली होती. त्याच नाव होतं 'हवालदार शिशराम गिल'. १९९९ ला कारगिल युद्धाचे पडघम वाजल्यावर ऑपरेशन विजय च्या अंतर्गत ८ जट बटालियन ला भारताच्या सरहद्दीच रक्षण आणि त्याच्या आत घुसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना पळवून लावण्याची जबाबदारी दिली गेली होती. त्यांना १७,००० फूट उंचीवर असलेल्या शत्रूच्या 'मंजू' नावाच्या पोस्ट वर तिरंगा फडकवायचा होता. कारगिल युद्धात शत्रूकडे उंचीचा फायदा होता. भारतीय सैन्याची कोणतीही कारवाई शत्रू डोंगरावरून बघू शकत होता. भारतीय सैन्य दरीत तर शत्रू डोंगरावर दबा धरून बसला होता. डोंगरावर चढाई करण्याची कोणतीही हालचाल आणि शत्रूला त्याचा सुगावा लागणार हे स्पष्ट होतं.
भारतीय सैन्याकडे एकच पर्याय होता तो म्हणजे शत्रूला चुकवत डोंगर चढाई करायची. रात्रीची वेळ हा एकमेव पर्याय होता कारण सूर्याची किरण आली की शत्रूला सुगावा लागणार. हा सगळा भाग जवळपास १५,००० ते १७,००० फुटावर होता. त्यामुळे चढाई साठी कित्येक तास लागणार होते. शत्रूची एक नजर आणि खेळ खल्लास कारण लपायला एक झाडही त्या उंचीवर नव्हत. सरळसोट ७० ते ८५ अंशाचे कडे समोर होते. प्रतिकूल वातावरण, थंडी अश्या प्रतिकूल वातावरणात वरून होणारा गोळ्यांचा, मोर्टार चा मारा. या सगळ्याला चुकवत आपलं लक्ष्य साध्य करणं हे एक खूप खूप कठीण काम होतं. रात्रीच्या वेळेत ही बर्फापेक्षा थंड असलेल्या कातळांवर चढाई करणं सोप्प नव्हतं. ८ जुलै १९९९ च्या रात्री भारताच्या मदतीला निसर्ग आला. डोंगरावर पावसाचे ढग उतरले. ढग आणि पावसामुळे शत्रूला दरीत काय चालू आहे हे उंचीवरून दिसणार नव्हतं. हीच वेळ होती की लक्ष्याकडे कूच करण्याची. लेफ्टनंट जनरल पाटणकरांनी आपल्या सैनिकांना आज्ञा दिली की सकाळी तिरंगा मंजू पोस्ट वर फडकला पाहिजे. रात्रीच्या अंधारात पाऊस पडत असताना १७,००० फुटावर हाडं गोठवणाऱ्या थंडीत चढून जाण अशक्य अशी गोष्ट होती पण घाबरतील ते भारतीय सैनिक कुठले. क्षणाचा विलंब न करता त्या टीम चा लिडर हवालदार शिशराम गिल ने सांगितलं, 'हम अपना मिशन कामयाब करके लौटेंगे'.
रात्रीच्या त्या काळजाला थरकाप उडवणाऱ्या अंधारात आणि पावसात हवालदार शिशराम गिल च्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांनी मंजू पोस्ट कडे कूच केलं. अतिशय खडतर आणि अशक्य असणाऱ्या ८५ अंशाच्या कोनातले कडे त्यांनी सर केले. लक्ष्याच्या जवळ येताना पाकिस्तानी सैनिकांना त्यांची चाहूल लागली आणि त्यांनी प्रचंड गोळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर सुरु केला. मोर्टार आणि गोळ्यांच्या पावसात भारतीय सैनिक लपायला कोणतीही जागा नसताना आपल्या लक्ष्याकडे आगेकूच करत होते. या धुमश्चक्रीत हवालदार शिशराम गिल यांच्या पायाला गोळ्या लागल्या आणि ते जवळपास जायबंदी झाले. परत मागे फिरण्याची मुभा असताना देखील आपण मागे गेलो तर आपल्या सैनिकांच मनोधैर्य खचेल आणि आपलं लक्ष्य पूर्ण होणार नाही. तसेच देशाच्या सुरक्षिततेसाठी दिलेला आपला शब्द खाली पडेल जो आपण आपल्या कमांडिंग ऑफिसर ला दिला होता याची जाणीव असल्याने त्यांनी मागे फिरण्याचा निर्णय न घेता उलट अजून त्वेषाने शत्रूवर गोळीबार करत आपली आगेकूच सुरु ठेवली. जखमी अवस्थेत ही त्यांनी पाकिस्तान च्या १ कमांडिंग ऑफिसर, २ ज्युनिअर ऑफिसर, ३ इतर सैनिकांचा आपल्या गोळ्यांनी वेध घेतला. तब्बल ६ पाकिस्तानी सैनिकांना त्यांनी ढगात पाठवून दिलं होतं. तर अजून ४ सैनिकांना त्यांनी जखमी केलं. त्यांच्या या पराक्रमापुढे पाकिस्तानी सैनिकांनी नांगी टाकली. भारताने सकाळी ३ वाजता मंजू पोस्टवर तिरंगा फडकावला. आपलं लक्ष्य पूर्ण केल्यानंतरच हवालदार शिशराम गिल हुतात्मा झाले.
हर करम अपना करेंगे
ए वतन तेरे लिए......
दिल दिया है जां भी देंगे
ए वतन तेरे लिए..
हवालदार शिशराम गिल यांनी अदम्य साहस, पराक्रम आणि देशप्रेम दाखवताना आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या या अभूतपूर्व देशभक्ती बद्दल भारत सरकारने त्यांना 'वीर चक्राने' सन्मानित केलं. काल निवृत्त लेफ्टनंट जनरल पाटणकर यांच्याकडून त्यांच्याविषयी ऐकताना हा पराक्रम किती मोठा होता याची जाणीव झाली. त्यांच्या मते हवालदार शिशराम गिल हे तानाजी मालुसरे होते. कारण त्यांनी मंजू पोस्ट जिंकली पण सरांनी आपला सिंह गमावला. ९ जुलै १९९९ ला आपल्या वाढदिवसाच्या अवघ्या ७ दिवस आधी त्यांनी देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं.
आज या गोष्टीला २२ वर्षाचा काळ लोटला पण भारतीय नागरिकात हवालदार शिशराम गिल यांच नाव कुठेच येत नाही. आमच्या पुढच्या पिढीला औरंगजेब आणि मुघल शासक किती चांगले होते हे पद्धतशीरपणे शिकवलं जाते. पण भारतमातेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे हवालदार शिशराम गिल सारखे कित्येक सैनिक इतिहासाच्या पानात जाणूनबुजून लुप्त केले जातात. आज कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने अश्या अनेक विरांच्या स्मृतीस मी कडक सॅल्यूट करतो. तसेच त्यांच्या पराक्रमाचा वारसा माझ्या शब्दातून पुढच्या पिढीकडे देण्याचं एक वचन देतो.
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Saturday 24 July 2021
'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'... विनीत वर्तक ©
'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'... विनीत वर्तक ©
एका वजनाचा प्रवास... विनीत वर्तक ©
एका वजनाचा प्रवास... विनीत वर्तक ©
Tuesday 20 July 2021
एक आशेचा किरण... विनीत वर्तक ©
एक आशेचा किरण... विनीत वर्तक ©
कोरोनाची दुसरी लाट आता थोडी ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. भारत सोडून भारताच्या साऊथ ईस्ट एशिया असणाऱ्या देशांमध्ये मात्र कोरोना ने हाहाकार माजवला आहे. सध्या अश्याच कठीण परिस्थिती मधे मी काम करत आहे. कोरोना चे वेगवेगळे व्हेरिएंट समोर येत आहेत आणि ते आधीच्या विषाणूपेक्षा जास्ती वेगाने प्रसार होण्यास कारणीभूत ठरत आहेत. एकूणच कोरोना विषाणू आणि त्याचा शरीरावर होणारा परीणाम, त्याला विरोध करण्यासाठी शरीरात तयार होणारी प्रतिकारशक्ती, तसेच या सगळ्यात कोरोना लसी च मिळणारं पाठबळ या सर्वांचा अभ्यास सध्या जगात सुरु आहे. त्यातून काही निष्कर्ष पुढे आलेले आहेत. नुकत्याच झालेल्या अभ्यासावरून जे निष्कर्ष पुढे आले आहेत त्यात आशेचा एक किरण दिसून येत आहे. तर काय आहे हा अभ्यास आणि त्याचे निष्कर्ष?
युनायटेड किंगडम मधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाची अस्रझेनेका ही लस कोरोना चे धोके कमी करण्यासाठी जगभरातील ८० पेक्षा देशात दिली जात आहे. भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याच लसीची निर्मिती 'कोव्हीशील्ड' नावाने करत असून आजवर भारतातील ज्या ४० कोटी पेक्षा जास्त भारतीयांच लसीकरण झालं आहे. त्यात सगळ्यात मोठा वाटा हा याच लसीचा आहे. तर यु.के. मधे जो अभ्यास या लसीवर सुरु आहे. त्यातून काही चांगले निष्कर्ष पुढे आलेले आहेत. या लसी घेतल्यानंतर आपल्या शरीरात अँटीबॉडी ची निर्मिती होते. याच अँटीबॉडी कोरोना विषाणू विरुद्ध शड्डू ठोकून त्याचा नायनाट करतात. पण या अँटीबॉडी काही विशिष्ठ काळ आपल्या शरीरात राहतात. त्याचसोबत ही लस शरीरात 'टी सेल्स' ची निर्मिती करण्यासाठी शरीराला प्रशिक्षण देतं राहते. संपूर्ण शरीरात या 'टी सेल्स' च जाळ निर्माण करून कोरोना पासून आपलं संरक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.
आपल्या शरीरात नक्की कश्या पद्धतीने कोरोना च्या विषाणू ला मारलं जाते त्यासाठी शरीराची कोणत्याही विषाणू च्या विरुद्ध लढण्याची प्रक्रिया सोप्या शब्दात समजून घ्यावी लागेल. कोणत्याही विषाणू, जिवाणू, अँटीजेन च आपल्या शरीरात आगमन झालं की आपल्या पांढऱ्या रक्त पेशीत असणारे 'बी सेल्स' हे काम करायला सुरवात करतात. हे बी सेल्स आपल्या हाडांच्या मधे म्हणजे बोन मॅरो मधे जन्माला येतात आणि तिथे त्यांची वाढ होते. हे बी सेल्स आणि वर सांगितलेले टी सेल्स मिळून प्लास्मा सेल बनवतात ज्या पुढे अँटीबॉडी बनवून विषाणूंचा खात्मा करतात. हे दोन्ही सेल्स आपल्या इम्यून सिस्टीम चा भाग आहेत जी अश्या विषाणू आणि जिवाणू सोबत लढा देऊन शरीराला निरोगी ठेवते. (ही प्रक्रिया तशी गुंतागुंतीची आहे. त्यामुळे त्यातील वैद्यकीय भाषेला सोपं करून सांगितलेलं आहे.). यातील टी सेल्स शरीरात जास्त काळ रहात नाहीत पण बी सेल्स मात्र शरीरात राहतात. पुन्हा समजा जर अश्या कोणत्याही विषाणू, जिवाणू च आक्रमण जर शरीरावर झालं तर शरीराच्या इम्यून सिस्टीम ला संदेश देऊन पुन्हा त्यांच्यावर आपल्या साथीदारांच्या म्हणजेच टी सेल्स च्या मदतीने हल्ला करतात.
एडेनोव्हायरस लसी म्हणजेच अस्रझेनेका / कोव्हीशील्ड या ज्या लोकांनी घेतल्या आहेत त्यांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलेलं आहे की यांनी आपल्या शरीरात खूप काळ वास्तव्य करणाऱ्या फायब्रोब्लास्टिक रेटिक्युलर सेल मधे प्रवेश केलेला आहे. हेच सेल टी सेल्स प्रमाणे काम करण्यास सक्षम आहेत. याचा असा निष्कर्ष निघतो की शरीरातले टी सेल जरी काही काळाने नष्ट झाले तरी लसीमुळे आपल्या शरीरात खूप काळ राहणारे फायब्रोब्लास्टिक रेटिक्युलर सेल हे टी सेल्स प्रमाणे कार्यरत राहतात. त्यामुळे एडेनोव्हायरस लसी घेतलेल्या लोकांना कदाचित आयुष्यभर कोरोना पासून लढण्याची शक्ती मिळण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. अर्थात हा काही प्रयोगात समोर आलेला निष्कर्ष आहे. अजून यावर संशोधन किंवा या निष्कर्षाला वेगवेगळ्या पद्धतीने पडताळून बघणं हे संशोधन अजून सुरु आहे. पण तूर्तास समोर आलेला हा निष्कर्ष दिलासा देणारा आहे.
अजून याच विषयावर जो वेगवेगळा अभ्यास सुरु आहे त्यातून आलेले काही निष्कर्ष समाधान देणारे आहेत. अजून एक महत्वाचा निष्कर्ष जो समोर येतो आहे तो म्हणजे लसींच मिक्स एन्ड मॅच चा. एडेनोव्हायरस लसी म्हणजेच अस्रझेनेका / कोव्हीशील्ड आणि एम आर एन ए बेस वर असलेल्या फायझर आणि मोडेना लसींचे डोस जर मिक्स केले तर जास्ती चांगल्या पद्धतीने कोरोना विषाणू च्या विरुद्ध इम्युनिटी निर्माण होतं असल्याचं पुढे येत आहे. चार आठवड्यांच्या अंतराने या लसी दिलेल्या होत्या. तसेच आधी कोव्हीशील्ड आणि मग फायझर ची लस घेतल्यास सगळ्यात जास्ती इम्युनिटी निर्माण होतं असल्याचा निष्कर्ष ही या संशोधनातून पुढे आला आहे. दोन कोव्हीशील्ड लसींच्या डोसा पेक्षा अश्या पद्धतीने मिक्स-मॅच केल्यास कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यास आपलं शरीर अतिशय चांगल्या पद्धतीने तयार होत असल्याचं पुढे आलं आहे. या दोन्ही लसीमधील अंतर १२ आठवडे केल्यावर काय होते यावर पुढील संशोधन सुरु आहे. कोव्हीशील्ड लसीचा तिसरा बूस्टर डोस घेतल्यास तयार झालेल्या अँटीबॉडी अल्फा, बीटा आणि डेल्टा अश्या सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंना लढा देण्यास समर्थ असल्याचं ही या प्रयोगातून समोर आलं आहे.
हे सगळे निष्कर्ष कुठेतरी आशेचा किरण असले तरी कोणतीच लस कोरोना चा संसर्ग थांबवू शकत नाही. त्यामुळे 'ऑफेन्सिव्ह डिफेन्स' हेच आपलं मुख्य शस्त्र बनवण्याची गरज आहे. मास्क वापरणे, गर्दी ची ठिकाण शक्य होतील तितकी टाळणे तसेच इतर कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणि न होण्यासाठी घ्यावा लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्याला कसोशीने पाळाव्या लागणार आहेत. तूर्तास आपल्यासोबत इतरांची काळजी आपल्या वागण्यातून घेणं हे सगळ्यांनी अंगिकारण्याची गरज आहे.
तळटीप:- वरील लिहलेल्या गोष्टी या प्रयोगातून समोर आलेल्या आहेत. त्या सर्वमान्य होण्यास काही कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे लसींच्या बाबतीत पुढे जाताना योग्य वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज आहे तसेच कोरोना टाळण्यासाठी मास्क, अंतर आणि हात वरचेवर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Monday 19 July 2021
पैश्याचं गणित... विनीत वर्तक ©
पैश्याचं गणित... विनीत वर्तक ©
Saturday 17 July 2021
#खारे_वारे_मतलई_वारे (भाग १२)... विनीत वर्तक ©
#खारे_वारे_मतलई_वारे (भाग १२)... विनीत वर्तक ©
Wednesday 14 July 2021
मृत्युंजयी गोरखा... विनीत वर्तक ©
मृत्युंजयी गोरखा... विनीत वर्तक ©
Monday 12 July 2021
जंटलमन प्रेक्षक आणि पूर्वग्रह मिडिया... विनीत वर्तक ©
जंटलमन प्रेक्षक आणि पूर्वग्रह मिडिया... विनीत वर्तक
Saturday 10 July 2021
क्वीन ऑफ स्पोर्ट्स... विनीत वर्तक ©
क्वीन ऑफ स्पोर्ट्स... विनीत वर्तक ©
Tuesday 6 July 2021
एक छोटी सी लव्ह स्टोरी... विनीत वर्तक ©
एक छोटीसी लव्ह स्टोरी... विनीत वर्तक ©