Sunday 22 January 2017

चिंता आणी प्रभावाची वर्तुळ... विनीत वर्तक
कालच माझ्या मित्राला खूप काळजीत बघितलं. काय झाल अचानक ह्याला? ह्या विचारांनी न राहवून विचारल. तर एकदम काळजीच्या स्वरूपात तो म्हणाला आता कस होणार? मी म्हंटल कस होणार म्हणजे? काय झाल? तो म्हणे मोदींनी ५००-१००० नोटा बंद केल्या. मी म्हंटल मग त्याने काय झाल? तो म्हणजे काही झाल नाही. पण आता देशाच कस होणार? मी म्हंटल देशाच काय? तो लगेच अरे तस नाही इतक करप्शन आहे सगळीकडे. सगळे राजकारणी भ्रष्टाचारी. मग मी म्हंटल ह्यावर तू काय कारणार? तो म्हणे विचार करतो आहे? मी म्हंटल कसला. तर म्हणे देशात असे राजकारणी नको. देशात निरक्षरता नको. गरिबी नको. मी म्हंटल तुझ्या चिंतेच्या वर्तुळातून बाहेर येऊन प्रभावाच्या वर्तुळात काही करू शकतो का? ह्यावर तो प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे बघत राहिला. म्हणजे काय? ह्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मी म्हंटल सांगतो.
आपण सतत दोन वर्तुळांमध्ये फिरत असतो. एक म्हणजे चिंतेच आणी दुसर प्रभावाच. ही वर्तुळे आपल्याला समजली तर खूप बदल आपण करू शकतो. चिंतेची वर्तुळ म्हणजे पोकळ काळजी म्हणू त्याला. जस माझ्या मित्राला जाणवत होती. राजकारणी भ्रष्टाचारी, देशातील निरक्षरता, देशातील गरिबी, शिक्षणव्यवस्थेचा बोजवारा, त्याला काय वाटते, त्याने / तिने अस वागायला नको होत हे किंवा असे काळजीचे अनेक डोंगर आपल्या मनात घर करत असतात. हे डोंगर किंवा ही वर्तुळ म्हणजे मृगजळा सारखी फसवी असतात. ह्या पोकळ भावना. पोकळच त्या. कारण आपण त्यात काहीच करू शकत नाही. राजकारणातील भ्रष्टाचार दूर इकडे समुद्रात राहून बंद होणार का? शिक्षणपद्धतीत बदल मी करण्याची माझी शिक्षणिक, सामाजिक पात्रता आहे का? किंबहुना मी करू शकतो का? त्याला किंवा तीला काय वाटावे हे मी ठरवू शकतो का? किंबहुना माझ ऐकून ती किंवा तो वागू शकेल का? देशातील गरिबी आणी निरक्षरता मी विचार करून संपणार आहे काय? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नाही अशीच येत होती. म्हणजे माझ्या मित्राच्या विचारांना, काळजीला खरे तर काहीच अर्थ नव्हता. ह्या वर्तुळात खरे तर काहीच आपण करू शकत नाही. पण त्याची काळजी, विचार करून मानसिक, शारीरिक शक्ती खर्च करतोच. त्याशिवाय येणार दडपण, चिंता ह्या वेगळ्याच.
दुसर वर्तुळ म्हणजे प्रभावांच. वर आलेल्या विचारांना मी कस उत्तर शोधू शकतो. तर मी माझ्या कामाच्या ठिकाणी प्रामाणिक नक्कीच राहू शकतो. मी गरीब मुलांना, लोकांना आर्थिक मदत करू शकतो. मी माझ्या ज्ञानाचा फायदा उपेक्षित लोकांपर्यंत नक्कीच पोहचवू शकतो. मी माझ्या क्षेत्रात एक मापदंड बनवू शकतो की जो येणाऱ्या लोकांना मार्गदर्शक बनू शकेल. मी कसा वागेन किंवा कोणत्या प्रसंगात कशी प्रतिक्रिया देईन ह्याच कंट्रोल स्वतःकडे ठेवण्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकतो. म्हणजे जिकडे माझा प्रभाव आहे. किंवा जिकडे मी स्वतः काही प्रभाव पाडू शकतो. अश्या गोष्टीनचा आपण कितीसा विचार करतो?
चिंतेच वर्तुळ आपल खूप मोठ असते. पण प्रभावाच अगदी छोट. समाजात उच्च, मानाच स्थान असलेल्या कोणत्याही व्यक्ती बघा. त्याचं प्रभावाच वर्तुळ हे खूप मोठ असते तर चिंतेच खूप कमी. अश्या यशस्वी व्यक्तीना आपल्यासारखे विचार येत नसतील का? नक्कीच येत असतील. पण फरक आहे तो वर्तुळांचा. सर्व सामान्य चिंतेच वर्तुळ मोठ करण्यात आपली शक्ती घालवतात तर यशस्वी प्रभावाच. “ Instead of expecting world to change they become agent of change” म्हणजेच आपल्या प्रभावाच वर्तुळ मोठ करतात. हे वर्तुळ जितक मोठ होत जाते. तितकीच त्या माणसांची उंची. त्याचवेळी कमी होत जातात ती चिंतेची वर्तुळ. असलेली शक्ती कोणत्या वर्तुळात गुंतवायची हे आपण ठरवायचं. चिंतेच्या की प्रभावाच्या.
माझ्या बोलण्यानंतर मित्राच्या चेहऱ्यावर प्रचंड समाधान दिसल. माझ्या बोलण्याने त्याच्या चिंतेची वर्तुळ कुठल्याकुठे गायब झाली होती. पण सगळ्यात समाधान होत ते उमलत असलेली प्रभावाची वर्तुळ बघण. कस होणार? ह्या पेक्षा कस होऊ शकते ह्या पासून कोण करणार? ते मी काय करू शकतो. ह्यापर्यंत त्याचा झालेला प्रवास माझ्यासाठी सुखद अनुभव होता. प्रत्येकांनी विचार करा आपण आपली शक्ती कुठे खर्च करत आहोत. चिंता की प्रभावाच्या वर्तुळात.

No comments:

Post a Comment