Sunday 22 January 2017

अग्नी... विनीत वर्तक
गेल्या आठवड्यात भारताने अग्नी ५ ह्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र ची चौथी यशस्वी चाचणी घेतली. ह्या यशस्वी चाचणी नंतर हे क्षेपणास्त्र त्याच्या पुढच्या कस्टमर ट्रायल साठी सज्ज झाल आहे. शत्रूच्या मनात धडकी भरवणारे खरे तर चीन च्या गोटात खळबळ माजवणाऱ्या ह्या क्षेपणास्त्राने भारताला काही मोजक्या देशांच्या पंक्तीत नेऊन बसवले आहे. तब्बल ५५०० ते ५८०० किमी पल्ला असणाऱ्या व १५०० किलोग्र्याम पर्यंत अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल हे क्षेपणास्त भारताच्या भात्यातील घातक समजले जाते. चीन च्या मते ह्याची क्षमता ८००० किमी पेक्षा जास्त आहे. परंतु आंतराष्ट्रीय मंचावर भारत जाणून बुजून ह्याचा पल्ला कमी सांगत आहे.
एक लक्ष्य भेद्ल्यावर आपण नवीन लक्ष ठेवतो आणी ते गाठलेल्या लक्ष्यापेक्षा अजून जास्ती उंचीवरच असते. अग्नी ५ यशस्वी होताच भारताने पुढल्या लक्षावर आपली नजर वळवली आहे. ते आहे अग्नी ६ किंवा सूर्य. तब्बल ८००० ते १२००० किमी चा पल्ला असणार हे क्षेपणास्त्र ३००० किलोग्र्याम वजनाची अण्वस्त्र वाहून नेऊ शकणार आहे. त्याचा पल्ला अजून गुलदस्त्यात असला तरी अग्नी ६ वेगळ्याच कारणांसाठी घातक असणार आहे. ते म्हणजे Multiple independently targetable reentry vehicle त्याच्या सोबत आहे Maneuverable reentry vehicle(MaRV). ह्या दोन्ही गोष्टी अग्नी ६ ला आणी त्यायोगे भारताला एका वेगळ्याच उंचीवर नेणार आहेत.
Multiple independently targetable reentry vehicle (MIRV) म्हणजे एकाच क्षेपणास्त्र मधून अनेक अनेक क्षेपणास्त्र. अगदीच समजून घ्यायचं झाल तर रामायण सगळ्यांनी बघितल आहे. त्यात युद्धात रामाने एक बाण हवेत सोडल्यावर त्यातून अनेक बाण निघून राक्षसी सेनेला घायाळ केल्याच बघितल्याच आठवत असेल. (MIRV) म्हणजे तेच. एक अग्नी ६ डागल्यावर हवेतल्या हवेत शत्रूवर हल्ला करताना त्यातून अनेक वेगळी क्षेपणास्त्र, अण्वस्त्र वेगवेगळ्या शत्रूच्या ठिकाणावर एकाच वेळी हल्लाबोल करतील. ह्यातून एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणची शत्रूची ठिकाण उध्वस्त करता येतील. काही मोजक्या देशांकडे असलेल हे प्रगत तंत्रज्ञान भारताच्या अग्नी ६ मध्ये असणार आहे.
Maneuverable reentry vehicle हे अजून वैशिष्ठ अग्नी ६ ला प्रचंड ताकद देते. एकदा लक्ष्यावर हमला केल्यावर समजा लक्ष्य बदलल किंवा त्याच स्थान बदलल तर हवेतल्या हवेत हे क्षेपणास्त्र किंवा त्यातील अण्वस्त्र हे आपल लक्ष्य त्याप्रमाणे हवेतल्या हवेत बदलवून लक्ष्याचा भेद करण्यात सक्षम असतील. ह्याला होमिंग गाईडनन्स सिस्टीम लागते. जी हे नक्की करते कि रस्ता बदलून सुद्धा क्षेपणास्त्र ठरलेल्या ठिकाणी त्याची कामगिरी फत्ते करेल. आता ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला १००००-१२००० किमी दूरवरून नियंत्रित किंवा डागत्या आल्या तर शत्रूला कळायच्या आधी त्याच खूप मोठ नुकसान झाल असेल.
एकीकडे अग्नी १,२,३ आधीच आपल्या सिमेंच्या तसेच देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असताना अग्नी ५ आपल्या डेवलपमेंट च्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करून देशाच्या तिन्ही दलांच्या ट्रायल साठी सज्ज झाल आहे. त्याच वेळी अग्नी ६ आपल्या पहिल्या चाचणी साठी सज्ज झाल आहे. २०१७ मद्धे होणारी अग्नी ६ ची चाचणी भारताच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. निसर्गाच्या पाच मुलद्रव्य पेकी एक असणाऱ्या अग्नी ह्या नावावरून नाव असणाऱ्या सगळ्या अग्नी च्या कुटुंबाने आपल्या देशाला सुरक्षतेचे त्या सोबत शत्रूच्या मनात धडकी भरवणारे अग्निपंख दिले आहेत ह्यात शंका नाही.

No comments:

Post a Comment