Thursday 24 August 2017

आपलीच ओळख... विनीत वर्तक

अनेक देशांविषयी जाणून घेताना त्यांच्या संस्कृती, विचार, लोक किंवा एकूणच जीवनपद्धती बद्दल आपण नेहमीच खूप उत्सुक असतो. पण हे सगळ करताना आपण आपलीच ओळख कधी करून घेतो का? ज्या देशात आपण रहातो. ज्या संस्कृतीचा आपण एक भाग आहोत त्याबद्दल आपण किती जाणतो. आपल्या संस्कृतीविषयी आपण नेहमीच चुकीच बोलत किंवा ऐकत असतो. प्रथा, रूढी, पद्धती, सण सगळ्याच विषयी आपण खूप बोलतो. पण ह्याच संस्कृतीने आपल्याला ज्ञानाचा एक खजिना आपल्याला दिलेला आहे. तो शिकायचा तर सोडाच आपल्याला त्याची माहिती पण नाही. म्हणून होळीच्या ह्या दिवशी निदान आपण त्याची ओळख करून घेऊ ह्यात.
विष्णूचा वराह अवतार आपण वाचला असेल किंवा निदान ऐकून तरी माहिती असेलच. ह्या अवतारात विष्णूंनी पूर्ण पृथ्वी आपल्या तोंडावर पाण्यातून बाहेर बाहेर काढली आहे अस चित्रित केल आहे. त्या मागची कथा बाजूला ठेवली तर एक सत्य आपण विसरून जातो. ते म्हणजे त्या चित्रात पृथ्वीचा दाखवलेला आकार. त्यात पृथ्वी गोल दाखवली आहे. ह्याचा सरळ अर्थ आहे कि तब्बल १०,००० वर्षांपेक्षा आधी भारतातील लोकांना पृथ्वी गोल होती हे माहित होत. ज्या तंत्रज्ञानात प्रगतीशील असलेल्या युरोप ने अपोलो यानाने पाठवलेल्या छायाचित्र नंतर पृथ्वी गोल आहे ह्यावर विश्वास ठेवला. त्याच वेळी अशिक्षित, गरिबीत खितपत पडलेल्या भारताला आणि त्याच्या हिंदू संस्कृतीला त्याची प्रचीती १०,००० वर्षापूर्वी आली होती. म्हणूनच पृथ्वीच्या अभ्यासाला भू-गोल म्हंटल गेल. भू-त्रिकोण किंवा चौकोन नाही. आपण पृथ्वीला जगत म्हंटल. जगत चा अर्थ होतो सतत गतिमान असणारा. ह्याचा अर्थ त्या वेळी पृथ्वी गतिमान आहे हे आपल्या पूर्वजांना माहित होत.
ह्यापेक्षा अजून एक सत्य जे ऐकून तर आपण तोंडात बोटेच घालू. अंटरस नावाचा एक तारा आकाशात मंगळाच्या प्रमाणे लाल रंगात चमकतो. आकाशातील १५-१६ नंबरचा प्रखर तेजाने लुकलुकणारा तारा असून सुद्धा त्याला आपल्या पुर्वाजनांनी जेष्ठा अस नाव दिल. अनेक वर्ष ह्या ताऱ्याला अस नाव का दिल गेल ह्याबद्दल भारतीय पिढी किंवा आपली जनरेशन खूप गोंधळात होत. जेव्हा नासा नी ह्याच मूल्यमापन केल तेव्हा एक अस सिक्रेट पुढे आल कि ज्याचा आपण स्वप्नात पण विचार करू शकत नाही. जेष्ठ चा अर्थ होतो सगळ्यात मोठा, सगळ्यात जुना. मग त्यांनी १५-१६ नंबरच्या ताऱ्याला जेष्ठ नाव का दिल? तर अंटरस नावाचा हा तारा सूर्यापेक्षा तब्बल ४०,००० पट मोठा आहे. ४०,००० पट आपण विचार तरी करू शकतो का? जेष्ठा नाव म्हणूनच ह्या ताऱ्याला दिल गेल. आतापर्यंत मानवाला माहित असणाऱ्या तार्यांमध्ये जेष्ठ हा सगळ्यात मोठ्या तर्यांपेकी एक आहे वस्तुमाना प्रमाणे. हे आमच्या पूर्वजांना ५०००-१०,००० वर्षापूर्वी माहित होत. ते हि कोणत्याही टेलिस्कोप शिवाय.
उर्सा मेजर हा एक ताऱ्यांचा समूह अनेक वर्षापासून मानवाला माहित आहे. उघड्या आकाशात आपण त्याला नेकेड डोळ्यांनी बघू शकतो. उर्सा मेजर तारका समुहातील एक तारा जो हिंदू वेदिक शास्त्रात अरुंधती-वशिष्ठा ह्या नावाने ओळखला जातो. आजही दक्षिण भारतात लग्नाच्या पहिल्या रात्री नवीन लग्न झालेल्या जोडप्याने हा तारा पहिल्या रात्री बघावा असा प्रघात आहे. अनेक वर्ष अस का? ह्याच उत्तर मिळत नव्हत. आधी चालू असलेल्या चालीरीती प्रमाणे असच उत्तर येत होत. आत्ताच्या अनेक प्रगत टेलिस्कोप नी ह्याचा शोध घेतल्यानंतर समोर आलेलं सत्य विस्मयकारक असच आहे. अरुंधती-वशिष्ठा ह्या नावाने ओळखला जाणारा हा तारा एक नसून दोन तारे आहेत. म्हणून ह्याच नाव अरुंधती-वशिष्ठा अस ठेवण्यात आल. ह्याच्या पेक्षा एक पाउल पुढे म्हणजे दोन एकमेकांभोवती फिरणारे तारे नेहमीच एक ताऱ्याभोवती दुसरे असे फिरत असताना हे दोन तारे चमत्कार आहेत. तर तो कसा कि हे दोन्ही तारे एकमेकांभोवती फिरत आहेत. व लग्नाच्या पहिल्या रात्री नवीन लग्न झालेल्या जोडप्याने का बघायचे तर कोणीही मोठा नसून संसार हा त्या दोन व्यक्तीच्या एकमेकांशी गुंफलेल्या भावनेत आहे. इतक सुंदर एकरूपतेच दर्शन भारतीय संस्कृतीत अजून कुठे नसेल. कोणत्याही टेलिस्कोप शिवाय एकतर हे दोन तारे आहेत हे ओळखण तसेच ते दोघेही एकमेकांच्या भोवती समान वेगाने फिरत आहेत हे ५००० वर्षापूर्वी ओळखणे म्हणजे भारतीय संस्कृती किती परमोच्च स्थितीला होती ह्याचा अंदाज पण आपण लावू शकत नाही.
गोव्यात वास्को दि गामा ह्याने भारतात प्रवेश केल्याच्या स्मरणार्थ प्रदेश आहे. पण भारतात येण्यासाठी वास्को द गामा ला एका भारतीयाने आपल्या जहाजाने एस्कोर्ट केल होत. केप ऑफ गुड होप ह्या आफ्रिकेच्या टोकावर आल्यावर भारतात कस जाव हे त्याला माहित नव्हत. तेव्हा कान्हा नावाच्या एका गुजराती भारतीयाने वास्को द गामा ला गोव्या पर्यंत एस्कोर्ट केल. त्यावेळी त्याच्या नौका वास्को च्या नौकेपेक्षा कित्येक पट मोठ्या होत्या. वास्को जवळ असणारी नौका हि त्या काळी युरोपातील सर्वात सुसज्ज युद्धनौका होती. तर कान्हा कडे असणाऱ्या नौका ह्या व्यापारी असून त्याच्या ५-६ पट मोठ्या होत्या. वास्को ची बोट मध्ये तर त्याच्या पुढे एक तर दोन्ही बाजूला दोन अश्या तर्हेने कान्हाने वास्को ला भारताच्या म्हणजेच गोव्या च्या समुद्र किनारी सोडले. हे भारतीय पुराणात नाही तर खुद्द वास्को दि गामा ने आपल्या पर्सनल डायरीत लिहिले आहे. हि डायरी आजही लिस्बन इकडे बघण्यासाठी उपलब्ध आहे.
इतकी प्रचंड विदव्त्तेचे, संकृतीचे, विज्ञानाचे, आणि मानव संस्कृतीचे घर असणाऱ्या भारतात माझा जन्म झाला हा तुमचा, माझा आणि एकूणच आपल्या कर्तुत्वाचा बहुमान आहे. बाहेरील संस्कृतीने हुरळून जाण्यापेक्षा आपल्या संस्कृतीत दडलेल्या आपल्या मातीला ओळखण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया हाच ह्या होळीच्या निमित्ताने केलेला प्रण. रंगांच्या धुळवडीत विसरताना ह्या रंगांच्या निर्मितीत आपल्या पूर्वजांनी खूप मेहनत घेतली आहे ह्याच विस्मरण होऊ न देण हीच प्रत्येक भारतीयाची प्रतिज्ञा असली पाहिजे. चला तर मग ओळख करून घेऊया आपल्याच अस्तित्वाची.

No comments:

Post a Comment