Thursday 24 August 2017

मुन्त्रा.. माणूस नसलेला रणगाडा... विनीत वर्तक

रणगाडा म्हंटल कि डोळ्यासमोर येतो तो प्रजासत्ताक दिवस. त्या पलीकडे आपल्याला रणगाडा बघण्याच भाग्य मिळत नाही. भारतीय आर्मी ने आयोजित केलेल्या प्रदर्शनासाठी वेळ काढण्याची आपली प्रायोरिटी नसल्याने ते भाग्य फक्त २६ जानेवारीला आम्ही भारतीयांनी राखून ठेवल आहे. तो भाग बाजूला ठेवला तर रणगाडा मला नेहमीच आकर्षित करत आलेला आहे. मजबूत, दणकट आणि आपल्या धुरांड्या मधून आवाज करत त्या चेन सारख्या पट्या च्या मध्ये दिसणारी गोल चाके मला नेहमीच आकर्षित करत आली आहेत.
पुढे लांब असणार लांब नळकांड आणि त्याच्या खाली अगदी डोक दिसेल एवढच टेहाळणी करणारा जवान. अस चित्र आपण नेहमीच रणगाड्याच बघत आलेलो आहोत. पण जसा कॉम्प्युटर ने आपल्या आयुष्यात बदल घडवला. माणस वगळून जेव्हा यंत्र ती सर्व काम करू लागली. तिकडे युद्ध तरी माणसांनी का करावी? ह्याची सुरवात हळू का होईना झाली होती. भारता ने हि ह्या दृष्ट्रीने पावल टाकायला सुरवात केली. डी.आर.डी.ओ. म्हणजेच डिफेन्स रिसर्च एंड डेवलपमेंट ऑर्गनायझेशन ने माणसाशिवाय चालणारा भारतातील पहिला रणगाडा तयार केला आहे. मुन्त्रा अस त्याच नाव ठेवण्यात आल आहे.
मुन्त्रा रणगाडा भारतीय आर्मीच्या सी.व्ही.आर.डी.ई म्हणजेच Combat Vehicles Research and Development Establishment (CVRDE) ह्यांच्या मागणीवरून तयार केला गेला आहे. मुन्त्रा रणगाड्याचे तीन प्रकार आहेत. मुन्त्रा - एस ह्या प्रकारातील रणगाडा माणूस नसलेला पहिला रणगाडा असून त्याद्वारे जमिनीवर लक्ष ठेवण्याच काम केल जाते. मुन्त्रा – एम प्रकारातील रणगाडा हा जमिनीतील माईन्स शोधण्यासाठी वापरला जाऊ शकतो तर मुन्त्रा – एन प्रकारातील रणगाडा हा न्युक्लीयर रेडियेशन किंवा बायोकेमिकल युद्धात वापरला जाऊ शकतो.
मुन्त्रा रणगाड्याची चाचणी सुद्धा भारतीय आर्मी ने महाजन फिल्ड राजस्थान मध्ये घेतली असून आर्मीने राजस्थान च्या वाळवंटात धुळीच्या वादळात ५२ डिग्री सेल्सियस तापमानात ह्या रणगाड्याची चाचणी केली आहे. भारतीय आर्मी ने हा रणगाडा रिमोट लोकेशन वरून यशस्वीरित्या ऑपरेट केला आहे. ह्या रणगाड्यावर रडार सकट, इंटिग्रेटेड क्यामेरा असून लेझर रेंज फायंडर बसवलेल आहे. १५ किमी च्या परिसरातील शत्रूचा जमिनीवर झोपून रांगणारा माणूस ते शत्रूचा कोणताही रणगाडा टिपण्याची ह्याची क्षमता आहे. युद्धामध्ये प्रत्यक्ष जीवितहानी होण्याचा धोका न पत्करता ह्या रणगाड्या द्वारे आपल्या भूमीवर गस्त तसेच युद्धात निकराच्या लढाईत वचक ठेवता येणार आहे. युद्धा पलीकडे नक्षलवादी असलेल्या भागात जिकडे माईन्स चा धोका खूप असतो अश्या ठिकाणी ह्या रणगाड्यांचा उपयोग होणार आहे.
युद्ध नेहमीच संहारक असतात. माणसाचा जीव सगळ्यात महत्वाचा असतो. पुढली युद्ध हि अतिसंहारक असतील कारण माणसाने विकसित केलेल्या शस्त्रांमुळे. ह्यासाठीच कमीत कमी मनुष्याला युद्धात खेचून यंत्रानीच जो युद्ध करेल तो विजयी अथवा वरचढ असणार आहे. म्हणून मानवरहित शस्त्र आणि अस्त्र ह्याची गरज भारताला हि आहेच. भारताची हीच गरज ओळखून त्यावर संशोधन करून माणूस नसलेला रणगाडा तयार करणाऱ्या डी.आर.डी.ओ. च्या सर्वच वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ ह्याचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांनी केलेल्या देशसेवेला सलाम.

No comments:

Post a Comment