Wednesday 8 November 2017

एका नवीन पल्याकडे...

एका नवीन पल्याकडे... 
भारताचे कुरबुर करणारे शेजारी, सतत युद्धाच्या छायेखाली राहणारा हिमालय आणि एकाच वेळी अडीच आघाड्यांवर जर देशाच रक्षण करायचं असेल तर एक क्षितीज काबीज केल्यावर आपल्याला पुढे पुढे जावच लागते. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान हे असच एक क्षेत्र आहे कि जिकडे अजून आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे. भारताच्या सामारीक गरजांना पूर्ण करण्यासाठी अश्या अनेक वेगवेगळ्या टप्यांच्या क्षेपणास्त्रांची गरज भारतीय सैन्यांने बोलावून दाखवली होती. ती पूर्ण करण्यासाठी कुठेतरी अश्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. भारताने ह्या सोबत एका नवीन पल्याकडे वाटचाल केली आहे.
ह्या एप्रिल महिन्यात भारताने इस्राइल ह्या देशासोबत २ बिलियन अमेरिकन डॉलर चा एक करार केला. मध्यम अंतराच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र निर्मिती चा हा करार आहे. ह्या करारानुसार इस्राइल ची इस्राइल एरोस्पेस इंडस्ट्री आणि भारताची डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन एकत्रितपणे हे क्षेपणास्त्र निर्माण करणार आहेत. इस्राइल भारतात निर्माण होणाऱ्या पहिल्या विमानवाहू नौकेसाठीपण लांब पल्याच क्षेपणास्त्र तसेच मिसाईल डिफेन्स सिस्टीम हि ह्या करारानुसार देणार आहे.
एम.आर.एस.ए.एम. हि क्षेपणास्त्र प्रणाली कमांड/कंट्रोल सिस्टीम, रडार, मिसाईल आणि मोबाईल लोंचर ने परिपूर्ण असून हि प्रणाली कोणत्याही लक्ष्याचा शोध आपल्या रडार ने शोधून लक्ष्य हे शत्रूच आहे कि आपल आहे हे ओळखून पुढील कार्यवाही करते. ह्यातील मिसाईल वर अतिशय प्रगत रडार मिसाईल च्या टोकावर असून हे कोणत्याही ऋतूत ते लक्ष्याचा भेद करण्यात सक्षम आहे. ह्या मिसाईल वर स्वतः उध्वस्थ करणारी यंत्रणा असून ह्यामुळे ह्या मिसाईल ची मारक क्षमता अतिशय उच्च दर्जाची आहे. ह्यामुळे कोल्याट्ररल ड्यामेज कमी होते. ह्यातील मिसाईल हे ४-५ मीटर लांबीचे असून २७६ किलोग्राम वजनाचे असणार आहे.
ह्या मिसाईल मध्ये ड्यूल प्लस सॉलीड प्रपोलेशन सिस्टीम असून हि सिस्टीम डी.आर.डी.ओ. ने निर्माण केली आहे. उड्डाणाचा आदेश मिळताच हि मिसाईल २ माख ( ध्वनीच्या दुप्पट वेगाने ) आपल्या लक्षाकडे झेपावते. ७० किमी च्या कोणत्याही क्षेत्रात हि मिसाईल सिस्टीम एकाचवेळी वेगवेगळ्या लक्ष्यांचा वेध घेऊ शकते. मे २०१५ मध्ये भारतीय सेनेने आकाश हि अशीच प्रणाली भारतीय सैन्यात दाखल केली आहे. २५ किमी च्या क्षेत्रातील कोणत्याही हेलिकॉप्टर , यु.ए.व्ही. , तसेच विमानाचा वेध घेण्यात सक्षम आहे.
आता नवीन मिसाईल प्रणालीमुळे हीच क्षमता ७० किमी वाढलेली आहे. अश्या प्रगत अत्याधुनिक क्षमतेच्या मिसाईल प्रणालीमुळे भारतीय सैन्याची ताकद कमालीची वाढणार आहे. २०२० पर्यंत हि प्रणाली भारताच्या सैन्यात दाखल होईल. ह्या मे महिन्यात भारताने आपल्या पुढल्या अतिप्रगत ब्राह्मोस ह्या जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रची चाचणी अंदमान निकोबार मध्ये यशस्वीरित्या केली आहे. इस्राइल ने हे तंत्रज्ञान भारताला हस्तांतरण करण्याच मान्य केल. भारतात एकदा ह्याच उत्पादन चालू झाल्यावर वर्षाला १०० मिसाईल बनविले जातील.
१७,००० कोटी रुपयांचा हा करार भारत-इस्राइल मधील संबंध तर वृद्धिंगत तर करेलच पण त्याच सोबत भारताला अडीच आघाड्यांवर सक्षम करणार आहे. येणाऱ्या काळात भारताला सक्षम राखण्यात ह्या मिसाईल चा मोठा भाग असणार आहे. नुसत्या बंदुकीने सीमा राखल्या जात नाहीत. त्यांना गोळ्या लागतात. त्यांना तंत्रज्ञान लागते. हे उच्च तंत्रज्ञान आपल्या सैन्याला येत्या काळात मिळणार आहे. ह्या निर्मितीमुळे भारत एका नवीन पल्याकडे वाटचाल करत आहे.

No comments:

Post a Comment