Wednesday 8 November 2017

Artificial Intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोक्याच वळण...

Artificial Intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोक्याच वळण... 
Artificial Intelligence किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता नक्की काय? तर अगदी गुगल च्या सर्च इंजिन च अल्गोरिदम पण कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. चालक रहित गाडी ते स्वचालित क्षेपणास्त्र, युद्ध प्रणाली हे सगळच Artificial Intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या खाली येत. नुसत रोबोट नाही तर ह्या सगळ्या गोष्टी पण ह्याचा भाग आहेत. आता जी कृत्रिम बुद्धिमत्ता अस्तित्वात आहे त्याला विक किंवा प्राथमिक कृत्रिम बुद्धीमत्ता अस म्हंटल जाते. इंटरनेट सर्च किंवा गाडी ला चालवण हा त्यातील प्राथमिक भाग पण स्ट्रोगं कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा दुसऱ्या फळीतील कृत्रिम बुद्धिमत्ता मात्र माणसाला सगळ्या क्षेत्रात मागे टाकेल. एखाद गणित किंवा प्रमेय सोडवण असो वा बुद्धिबळ खेळण असो. पण अशी माणसाला मागे टाकणारी क्षमता आपल्यासोबत काय घेऊन येईल ह्याचा नेम नाही.
स्टीफन हॉकिंग, एलन मस्क, स्टीव वोझ्निक, बिल गेट्स हि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील दादा लोक मिडिया मध्ये पण ह्या धोकादायक वळणाबद्दल सांगत आहेत. वैज्ञानिक सध्या तरी अस सांगत आहेत कि माणसाच्या भावना मशीन मध्ये आणण सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे प्रेम आणि द्वेष ह्या भावना कृत्रिम बुद्धिमत्ते मध्ये येण शक्य नाही. मग कोणत्या भागात कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाला धोकायदायक ठरू शकेल तर वैज्ञानिकांच्या मते दोन भागात.
१) कृत्रिम बुद्धिमत्तेला विध्वंसक कृती करण्यासाठी बनवलं जाईल. स्वयंचलित क्षेपणास्त्र किंवा युद्ध सामुग्री जी कोणालाही मारण्यासाठी विकसित केली जाईल जर अशी प्रणाली चुकीच्या हातात गेली तर खूप मोठ्या प्रमाणावर माणसांची हानी संभव आहे. हि प्रणाली अश्या रीतीने विकसित असेल कि तिला थांबवणे सहज शक्य नसेल. पुढे येणारा विनाश हा माणसाला वाटत असून पण टाळता येणार नाही.
२) कृत्रिम बुद्धिमत्ता काहीतरी चांगल करण्यासाठी विकसित केली जाईल पण तिची पद्धत जी असेल ती माणसाला हानी करणारी असेल. आता तुम्ही एखाद्या कृत्रिम बुद्धिमत्ता असणाऱ्या गाडीला आज्ञा केली कि मला कसही करून विमानतळावर लवकरात लवकर घेऊन चल तर ती गाडी कोणालाही ठोकत किंवा वाहतूक नियमांचं उल्लंघन करत तुम्हाला विमानतळावर पोचवेल पण तुमची आज्ञा फक्त विमानतळावर पोहचवण्याची होती पण त्या शब्दांना आदेश मानून ती प्रणाली आपल कार्य करेल. अर्थात हे एक उदाहरण झाल.
मग आत्ताच हे विचार करण्याची वेळ का येते आहे तर माणूस झपाट्याने ह्या धोकादायक वळणाकडे वाटचाल करतो आहे. गेल्या ५ वर्षापूर्वी ज्या गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेने मिळवण्यासाठी १० वर्षाचा कालावधी लागेल अस वैज्ञानिकांना वाटत होत. त्या गोष्टी आत्ता लागलेल्या शोधामुळे आपण आत्ताच पूर्णत्वाला नेल्या आहेत. ज्या वेगाने माणूस ह्या क्षेत्रात मुसंडी मारतो आहे ते बघता अनेक शतकांनंतर दिसणाऱ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात बघू अस वैज्ञानिकांना वाटायला लागल आहे. हे धोक्याच वळण आपण कस पार करतो ह्यावर मानवजातीचा पुढला प्रवास अवलंबून आहे. नवनवीन तंत्रज्ञान आणि त्याला घडवणारी बुद्धिमत्ता ह्या दोघात जोवर बुद्धिमत्ता जिंकते आहे तोवर आपला प्रवास पुढे सुरु राहील पण ज्यावेळेस मशीन किंवा तंत्रज्ञान ह्यावर भारी पडेल तेव्हा माणसाने आपल्या प्रवासाच सुकाणू कृत्रिम बुद्धिमत्ता च्या हवाली केल असेल. मग आपण पुढे जायचं नाही का?
पुढे नक्कीच जायचं पण त्यासोबत जगातील वैज्ञानिक, तंत्रज्ञान अभियंते, राजकारणी, पुढारी आणि राज्यकर्ते सर्वांनाच भान ठेवून पुढे जाण्याची गरज आहे. कारण आज दुसऱ्यांसाठी खणलेल्या खड्यात आपण कधी पडून जाऊ ह्याचा पत्ता पण लागणार नाही. कारण त्या खड्यात तुम्हाला ढकलणारी कृत्रिम बुद्धिमत्ता इतकी प्रगत असेल कि तिच्यापुढे तुमच काहीच चालणार नाही. अजून वेळ गेलेली नाही. कृत्रिम बुद्धिमत्ते चा आपल्या आयुष्यातील वापर हि काळाची गरज असली तरी तिच्या आहारी आपण किती जायचं हे आपणच ठरवायला हव. सुरवात आपल्यापासून केली तर आपण सर्व मिळून Artificial Intelligence किंवा कृत्रिम बुद्धिमत्ते च्या ह्या वळणाला निश्चितच चागल्या तऱ्हेने पार करू शकू.

1 comment: