Thursday 30 January 2020

समुंदर के सिकंदर... विनीत वर्तक ©

समुंदर के सिकंदर... विनीत वर्तक ©

आपण बघतो ऐकतो त्यापेक्षा पडद्यामागे घडणाऱ्या घटना खूप वेगळ्या असतात. अनेकदा ह्या पडद्यामागच्या घटनांचा खूप मोठा प्रभाव पडद्यावर दिसणाऱ्या घटनेत सामावलेला असतो. साधारण वर्षभरापूर्वी भारत आणि पाकिस्तान दरम्यान अश्याच काही नाट्यमय घडामोडी घडल्या. ह्यातील दिसणाऱ्या घडामोडी मधील थरार अनेकांनी बघितला आणि त्यावर बरेच चिंतन पण झालं. ह्या सर्व घडामोडीं मधला पडद्यामागचा भाग मात्र अंधारात राहिला. पुलवामा मध्ये ४० सी.आर.पी.एफ. जवान अतिरेकी हल्यात शहीद झाल्यावर भारत काय उत्तर देणार ह्याकडे पूर्ण जगाचं लक्ष होतं. उरी हमल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक ने पाकिस्तान ले हे कळून चुकलं होतं की,

'ये हिंदुस्तान अब चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान हैं, ये घर मैं घुसेगा भी और मारेगा भी' 

पुलवामा हल्यानंतर पाकिस्तान ला माहित होतं की 'कुछ बडा होनेवाला हैं, बस कब, कहा, कैसे इसका पता नहीं था'. इकडे राजकीय नेतृत्व तसेच भारतातील सैन्य दलाने ह्याच उत्तर पाकिस्तान ला त्याच्याच भाषेत देण्यासाठी कंबर कसली होती. पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक कधी होणार ह्याकडे पूर्ण जगाचं लक्ष असताना भारताने आपल्या तिन्ही दलांना युद्धासाठी तयार राहण्याच कळवलं होतं. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताच्या ७५१६ किलोमीटर लांब किनाऱ्यांची तसेच हिंद महासागरातील सगळ्यात शक्तिशाली नौसेनेने आपली शक्ती भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडे वळवली.

भारताची सगळ्यात शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका आय.एन. एस. विक्रमादित्य ने आपल्या ताफ्यासह अरबी समुद्रात पाकिस्तान च्या दिशेने कूच केलं होतं. आय.एन. एस. विक्रमादित्य हिंद महासागरातील एक भूभाग म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. जवळपास ४५,४०० टन इतकं अवाढव्य वजनाचं पाणी बाजूला सारत ताशी ५६ किलोमीटर / तास वेगाने जवळपास २५,००० किलोमीटर च अंतर कापण्यास सक्षम असलेली तसेच ह्याची इंजिन जवळपास १८०,००० हॉर्सपॉवर ची शक्ती निर्माण करतात. इतकी मोठी युद्धनौका बराक १ आणि बराक ८ मिसाईल सोबत २६ मिग २९ के लढाऊ विमान आणि १० कामोव्ह के ३१ लढाऊ हेलिकॉप्टर घेऊन जेव्हा चाल करते. तेव्हा शत्रू काहीच करू शकत नाही. ह्या सोबत तिच्या सोबत जगातील फक्त मोजक्या देशांकडे असलेली आय.एन.एस. चक्र ही आण्विक पाणबुडी ( आय.एन.एस. चक्र पाणबुडी तब्बल ८१४० टन वजनाची असून ६०० मीटर खोल पाण्यातून प्रवास करू शकते. ही कितीही दिवस पाण्याखाली राहू शकते तसेच ही पाणबुडी स्टेल्थ प्रकारातील आहे. आण्विक ऊर्जेमुळे कोणताच आवाज ही पाणबुडी करत नाही त्यामुळे शत्रू ला हिचा ठावठिकाणा लागणं अशक्य असते. ) ह्या शिवाय भारताची अद्यावत पाणबुडी आय.एन.एस. कलावरी सह डिस्ट्रॉयर, फ्रिगेट ह्या जवळपास ६० युद्धनौकांनी अरबी समुद्रात ठाण मांडल होतं.

पाकिस्तान भारतीय नौदलाच्या युद्ध तयारीमुळे खूप घाबरला असं म्हंटल्यास वावगं ठरणारं नाही. ह्यामागे काही कारणं आहेत. पाकिस्तानी नौदलाची शक्ती भारताच्या तुलनेत कुठेच नाही. आय.एन. एस. विक्रमादित्यसह भारताचा फौजफाटा हा पूर्ण ताकदीनिशी अरबी समुद्रात उतरला होता. ज्याला उत्तर देण्याची हिंमत पाकिस्तानच्या युद्धनौकांकडे नव्हती. ह्या शिवाय ब्राह्मोस ह्या जगातील सगळ्यात वेगवान सुपर सॉनिक मिसाईल ने ह्यातील फ्रिगेट आणि डिस्ट्रॉयर सज्ज होत्या. ज्या मिसाईल चं उत्तर देण्याची ताकद अमेरीका सारख्या देशाकडे नाही तिकडे पाकिस्तान चा विचार न केलेला बरा. ही भिती इतकी होती की
पाकिस्तान ने आपली पाणबुडी पी.एन.एस. साद ला पाकिस्तान च्या पश्चिमी तटावर पाण्याखाली लपवलं. ह्यामुळे भारतीय नौदल अजून जास्ती युद्धासाठी सज्ज झालं कारण ही पाणबुडी अवघ्या ३ दिवसात गुजरात पर्यंत येऊ शकत असल्याने भारतीय नौदलाच्या प्रत्येक युद्धनौकेला अरबी समुद्र ते अगदी आंतरदेशीय सीमांमध्ये हिचा शोध घेऊन कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार राहण्यास सांगितलेलं होतं.

तब्बल २१ दिवस भारताच्या ६० पेक्षा अधिक युद्ध नौका पाकिस्तान अरबी समुद्र ते पाकिस्तान च्या सगळ्या बंदरावर लक्ष ठेवून पाकिस्तान च्या पाणबुडी चा शोध घेतं होत्या. पाकिस्तान चं एक पाऊल पुढे आणि कराची बंदर ते ग्वादर बंदर जगाच्या नकाशावरून पुसलं हे नक्की होतं इतकी तयारी भारताच्या नौदलाची होती. त्यामुळे बालाकोट हल्यानंतर आण्विक हल्याची दर्पोक्ती करणाऱ्या पाकिस्तानला आपलं शेपूट गुंडाळावं लागलं होतं. कारण ह्या ६० युद्धनौका पाकिस्तान ला काही तासात घुडगे टेकवायला लावू शकतात ह्याची पूर्ण कल्पना पाकिस्तान ला पुरेपूर होती. जेव्हा पूर्ण जग बालाकोट हवाई हल्याकडे बघत होतं तेव्हा भारताचे 'समुंदर के सिकंदर' पडद्यामागून पाकिस्तान ला त्याची औकात दाखवून देतं होते. बालाकोट हवाई हल्ला, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान ला बिनशर्त सोडण ह्या सगळ्या नंतर पाकिस्तान काहीच करू शकला नाही ह्याचं बरचसं श्रेय ह्या समुद्रातील सिकंदराचं आहे.

आज ह्या सगळ्या घटनांना एक वर्ष पूर्ण होतं असताना पडद्यामागचे सिकंदर आजही निळ्या पाण्यात भारताच्या किनारपट्टीची सागरी सुरक्षा करत आहेत. भारताच्या समुंदर के सिकंदरांना माझा कडक सॅल्यूट.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


5 comments:

  1. उत्कृष्ट माहिती. पण एक सांगू का? लेखात अनेक हिंदी शब्द आहेत. त्याऐवजी मराठी शब्द वापरले तर लेख परिपूर्ण होईल. कृपया हे म्हटलं म्हणून राग मनू नये. तुमचे लेख नेहमीच माहितीपूर्ण असतात.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Great Information. But I think one error that US also afraid of our missile that cant be digested

    ReplyDelete