Friday 26 May 2017

फुसकी दर्पोक्ती... विनीत वर्तक

भारतीय सेनेने पाकिस्तानी बंकर उध्वस्त केल्याची चित्रफित भारतीय मिडिया आणि जनतेसमोर येताच पाकिस्तानी सेनेला घाम फुटला असेल. कोणत्याच पातळ्यांवर आपण भारताच्या सैन्य ताकदीशी मुकाबला करू शकत नाही ह्या वास्तवाची जाण त्यांना आहे. पण उथळ पाण्याला खळखळाट फार ह्या उक्तीने पाकिस्तान ने आपल विमान सियाचीन ह्या जगातील सर्वात उंच युद्धभूमीच्या आसपास उडवून आपण लढायला तयार आहोत असा संदेश द्यायचा प्रयत्न केला.
आपण इकडे एक लक्षात घेतले पाहिजे कि विमान आपल्याच भागात हवेत उडवण आणि युद्ध करणे ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. भारताच हवाई सामर्थ्य आणि पाकिस्तानी हवाई सामर्थ्य ह्यांचा हा खाली घेतलेला आढावा.
भारताच्या भात्यात असलेली लढाऊ विमाने
१) सुखोई ३० एम के आय – २२०- २७२ च्या आसपास
२) मिग २९ – संख्या ६९
 ३) एच ए एल तेजस
४) मिराज २००० – संख्या ५१
पाकिस्तान कडे असलेली लढाऊ विमाने
 १) जे. एफ १७ थंडर – संख्या ५९
२) एफ १६ फाल्कन – संख्या ७६
३) डसाल्त मिराज ३ – संख्या ७५
पाकिस्तान च्या सर्वात प्रथम फळीतील जे. एफ. १७ ची तुलना सुखोई तर सोडाच पण तेजस शी पण होऊ शकत नाही आहे. जे. एफ. १७ हे एकावेळेस १० टार्गेट चा मागोवा घेऊ शकते तर तेजस एकाच वेळेस ६४ टार्गेटचा मागोवा घेऊ शकते. जे. एफ. १७ हे मेटल अलॉय पासून बनलेलं आहे. तर तेजस हे कार्बन काम्पोझीट आणि टायटेनियम पासून बनलेलं आहे. ह्यामुळे जे.एफ. पेक्षा वजनाने हलक असूनसुद्धा त्याच्या पेक्षा जास्ती दणकट आहे.
भारताच्या सुखोई ३० एम. के. आय ला कोणतच उत्तर पाकिस्तान कडे नाही आहे. सुखोई ३० एम. के. आय. हे एअर सुपिरीयाटी फायटर प्लेन आहे. खर सांगायचं झाल तर ते आकाशावर राज्य करते. ३०० मीटर/ सेकंद वेगाने हवेत उंची गाठत ३००० किमी चा पल्ला माख २ वेगाने गाठू शकते. एकाच वेळी ६ वेगवेगळ्या शत्रू शी लढू शकते. तसेच मेटोर, ब्राह्मोस, हि खतरनाक क्षेपणास्त्र तर अण्वस्त्र वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. तसेच सुखोई थ्री डी कसरती करू शकते. पुगाचेव कोब्रा हे सगळ्यात कठीण अशी हवेतील कसरत करण्यात सुखोई जगात प्रसिद्ध आहे.
हे फक्त झाल लढाऊ विमानांच्या बाबतीत बॉम्बर, चॉपर, आणि हवाई सामुग्री वाहून नेण्याच्या बाबतीत हि पाकिस्तान कुठे आसपास पण नाही. तसेच पुढल्या ५-७ वर्षात भारतीय हवाई दलात समाविष्ट होणारी यादी बघितली तरी पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकून जाईल. आधीच सक्षम असलेल्या भारतीय हवाई दलात सुखोई च्या बरोबर राफेल , एफ.जी.एफ.ए, तेजस हि एकापेक्षा एक सरस विमाने व आपाचे सारखी हेलीकोप्टर समाविष्ट होत आहेत. ब्राह्मोस सारख्या जगातील सगळ्यात वेगवान क्षेपणास्त्र भात्यात असलेल सुखोई पाकिस्तान ला उफ करायची पण संधी देणार नाही. हे पाकिस्तान ला चांगलच माहित आहे.
विमानांच्या जोडीला ते चालवणारे वैमानिक आणि रडार तसेच जी.पी.एस. उपग्रह यंत्रणा भारताची कित्येक पटींनी श्रेष्ठ आहे. सियाचीन सारख्या उंच युद्धभूमीवर आणि विषम परिस्थतीत लढाऊ विमान चालवण्यात भारतीय वैमानिक जगात सर्वश्रेष्ठ समजले जातात. म्हणून अमेरिका सुद्धा त्यांच्या वैमानिकांना भारतात प्रशिकक्षणासाठी पाठवते. त्यामुळे नुसत विमान उडवून फुसक्या दर्पोक्ती ने काही होत नाही. जेव्हा भारतीय विमान उडतील तेव्हा पाकिस्तान देवाला हाक मारण्याशिवाय काही करू शकत नाही. अर्थात भारताच्या हवेतील अधिराज्यामुळे त्या वेळेला देव पण काही करू शकणार नाही हा भाग वेगळा. ह्याची जाणीव पाकिस्तान ला पुरेपूर आहे. तूर्तास उडवून दे किती उडवायची ती. हम जब उडेंगे तब तुम आखरी सासें गिनोगे.

No comments:

Post a Comment