Friday 26 May 2017

साउथ एशियन उपग्रह... विनीत वर्तक

नेबर फर्स्ट हि पॉलीसी घेत जून २०१४ मध्ये पंतप्रधानांनी इस्रो ला सार्क देशांसाठी उपयोगात येईल असा उपग्रह बनवण्याची विनंती केली. आपल्या पंतप्रधानाच्या शब्दाचा मान ठेवत इस्रो ने ह्या उपग्रहासाठी कंबर कसली. इकडे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे सार्क सदस्य देशातील सर्वच राष्ट्र टेक्नोलोजी च्या बाबतीत बरीच मागे आहेत. भारत हा सार्क मधील प्रथम आणि एकमेव देश आहे कि जो स्वबळावर उपग्रह बनवू शकतो. ते उपग्रह स्वताच्या बळावर प्रक्षेपित करू शकतो. अस असताना आपल्या शेजारी राष्ट्रांना पण सोबत आणण्यासाठी व एकूणच सार्क देशांना टेक्नोलोजी मध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी भारताने हि कल्पना मांडली.
भारत नेहमीच “वसुधैव कुटुंबकम” ह्या उक्तीला धरून नेहमीच त्या दृष्टीने पावल टाकत आला आहे. उपग्रहांच्या मिळणाऱ्या लाभाने भारतातील सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाला आहे. अगदी मोबाईल पासून ते जीपीस, डी.टी.एच. पर्यंत. ह्याच लाभाचा फायदा आपल्या शेजारी देशांना हि व्हावा ह्या दृष्टीने भारताने सार्क उपग्रहाची कल्पना मांडली. १८ व्या सार्क परिषदेत याची घोषणा भारताने केली. नेपाळ, मालदीव, भूतान, ह्या छोट्या तर बांगलादेश, अफगाणीस्तान, श्रीलंका, पाकिस्तान, ह्या मोठ्या राष्ट्रांनी मिळून बनवलेल्या सार्क राष्ट्रानां आपल्या टेक्नोलोजी ने प्रगतीपथावर नेण्याची भारताची योजना होती.
नेहमीप्रमाणे कुत्र्याच्या वाकड्या शेपटीने आपला रंग दाखवलाच. सुपार्को हि पाकिस्तान ची ह्या क्षेत्रात काम करणारी इस्रो सारखी संस्था आहे. इस्रो च्या आधी स्थापन झालेल्या ह्या संस्थेबद्दल न बोललेच बर. इतके वर्ष ह्या क्षेत्रात असून स्वतःच रॉकेट तर सोडाच साधा उपग्रह हि बनवता आलेला नाही. त्याच वेळी इस्रो ने आपल्या कामगिरीने नासा सारख्या संस्थाना टक्कर तर दिलीच आहे. पण त्या सोबत मंगळयान, एकाच वेळेस १०४ उपग्रह प्रक्षेपित करत एक मैलाचा दगड अवकाश क्षेत्रात गाठला आहे. अस म्हणतात कि मंगळयान मोहीमेने अवकाश क्षेत्रात आखल्या जाणाऱ्या मोहिमांच पूर्ण आर्थिक गणित बदलवून टाकल आहे. अश्या अनेक यशांची पिसं आपल्या मुकुटात अभिमानाने मिरवणाऱ्या इस्रो कडून एक अजून उंची जर आपल्याच नाकावर टिच्चून गाठली गेली तर ते पाकिस्तान ला रुचेल कस.
वेगवेगळी कारण काढत पाकिस्तान ने अनेक अडथळे ह्या मोहिमेत निर्माण केले. अनेक राष्ट्रांना भारताने हि छुपी नजर ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था आहे अस सांगत आपल्या जाळ्यात ओढण्याचा सगळ्याच लेवल वर प्रयत्न केला. त्यामुळेच ह्या मोहिमेच सार्क उपग्रह नाव भारताला साउथ एशियन उपग्रह अस ठेवावं लागल. ह्या सगळ्यांना पुरून उरत पाकिस्तान शिवाय भारताने हि मोहीम सुरु केली. तब्बल २३५ कोटी रुपयांचा जीस्याट- ९ हा उपग्रह भारताने तयार केला. येत्या ५ मे च्या आसपास तो अवकाशात प्रक्षेपित केला जाईल. ह्या मोहिमेचा सर्व खर्च तसेच सगळा टेक्निकल, इंजिनिअरींग सपोर्ट भारताने फुकट आयुष्यभर म्हणजे उपग्रहाच्या १२ वर्षाच्या कालावधीसाठी सार्क राष्ट्र ( पाकिस्तान सोडून) उपलब्ध करून दिला आहे. ह्या उपग्रहामुळे डी.टी.एच, व्ही स्याट आणि डिझास्टर म्यानेजमेंट , लायब्ररी सारखे सगळे फायदे इंटरलिंक केले जाणार आहेत. प्रत्येक देश त्यांना दिलेल्या ट्रान्सपोर्टर चा वापर त्यांच्या साठी हवा तसा करू शकणार आहे. ह्यामुळे सर्व देशातील समन्वय वाढण्यास मदत होणार आहे.
आपण आपले शेजारी बदलू शकत नाही. बदलू शकतो ते आपण त्यांच्याशी कसे वागतो. काही वाकडेच रहातात. त्यांना बंदुकीची भाषा समजते त्यांना उपग्रहाची भाषा कधी कळणार नाही. अनेक पल्ल्याची विध्वंसक क्षेपणास्त्र खूप बनवता येतात पण एक स्वयंपूर्ण रॉकेट ते बनवू शकत नाही. ह्यावरून होणाऱ्या जळफळाटा ची कल्पना आपण करू शकतो. आपण प्रगत आहोत म्हणून आपण सगळ्यांना दाबून ठेवू शकतो ह्या विचारसरणी चा भारत कधी होता न कधी इथले लोक. हजारो वर्षाची संस्कृती असून सुद्धा भारताने आजवर कोणत्या देशाला इंनव्हेड केल नाही. ह्या पुढे हि करण्याची इच्छा नाही म्हणून “सबका साथ सबका विकास” ह्या तत्वाला आजही पाळत “वसुधैव कुटुंबकम” करण्याची पावलं भारत आणि इस्रो उचलत आहे. मे च्या साउथ एशियन उपग्रहाच्या उड्डाणासाठी इस्रो ला खूप खूप शुभेछ्या.

No comments:

Post a Comment