Wednesday 6 November 2019

के ४ ... विनीत वर्तक ©

के ४ ... विनीत वर्तक ©


पाकिस्तान, चीन सारखे शेजारी असणाऱ्या भारताला आपल्या संरक्षण सिद्धतेत नेहमीच सज्ज रहावे लागते. इच्छा असो वा नसो पण आपल्या सिमांच संरक्षण करण्याची जबाबदारी भारतावर येते. पाकिस्तान सारखं राष्ट्र एक दमडीची किंमत नसताना रोज अणुबॉम्ब हल्ला करण्याची पोकळ धमकी देतं असताना असल्या राष्ट्राला त्याची जागा दाखवण्यासाठी भारताला आपलं स्थान दाखवुन द्यावं लागते. पाकिस्तान रोज अणुबॉम्ब टाकु अश्या वल्गना करतं असलं तरी भारताची ताकद पाकिस्तान ओळखुन आहे. विशेषतः समुद्रात असलेलं भारताचं नौदल पाकिस्तान च्या नौदलापेक्षा कित्येक पटीने वरचढ आहे. आज स्थिती अशी आहे की भारताने अशी क्षेपणास्त्र बनवली आहेत की पाकिस्तान कडे त्याच कोणतचं उत्तर नाही. 

८ नोव्हेंबर २०१९ ला भारताने आपल्या भात्यातील एका शक्तीशाली क्षेपणास्त्राची परीक्षा करण्याचं ठरवलं आहे. ह्या शक्तीशाली क्षेपणास्त्राचे नाव आहे के-४. के-४ ह्या क्षेपणास्त्राचा पल्ला ३५०० किलोमीटर असुन हे मध्यम पल्याच क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र पाणबुडी वरून डागता येते. हे क्षेपणास्त्र हायपरसॉनिक (हायपरसॉनिक म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या ५ पट किंवा त्याहुन अधिक वेगाने) वेगाने आपल्या लक्ष्याकडे झेपावते. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र नेण्यास सक्षम असुन त्या शिवाय हे क्षेपणास्त्र एम.आय.आर.व्ही. तंत्रज्ञान असलेलं आहे. (मल्टीपल इंडिपेंडन्टली टार्गेटेबल री एंट्री वेहकल ज्याचा अर्थ होतो हे एक क्षेपणास्त्र डागल्यावर एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणांना लक्ष्य बनवता येते.) ह्याच्या अश्या तंत्रज्ञानामुळे हे क्षेपणास्त्र शत्रूवर बसवण्यात खुप महत्वाची भुमिका निभावते.

के ४ हे क्षेपणास्त्र १२ मीटर लांब १.३ मीटर व्यास असलेलं असुन ह्याच वजन साधारण १७-१९ टनाच्या आसपास आहे. (१७,००० ते १९,००० किलोग्रॅम). २५०० किलोग्रॅम वजनाची अण्वस्त्र वाहुन नेण्याची ह्याची क्षमता आहे. समुद्राच्या पाण्याखालुन डागल्यावर ३५०० किलोमीटर चा पल्ला गाठत त्यातील कोणत्याही लक्ष्याचा वेध घेऊ शकते. के ४ सोबत भारत अरिहंत श्रेणीतील पाणबुडीसाठी बी.ओ.- ५ नावाचं क्षेपणास्त्र ही बनवतं असुन त्याचा पल्ला जवळपास ७०० किलोमीटर चा आहे. के ४ च्या यशस्वी चाचणी नंतर भारताची पाणबुडी समुद्राच्या पाण्यातील आंतराष्ट्रीय सिमांमध्ये राहुन पाकिस्तान मधील कोणत्याही शहराला, भागाला आपलं लक्ष्य बनवू शकते. डागल्यावर मिसाईल डिफेन्स सिस्टीम ला ही चकवा देण्यासाठी आपल्या रस्त्यात बदल करून लक्ष्यावर हमला करू शकते. रोज उठून अणुबॉम्ब ची धमकी देणाऱ्या पाकिस्तान चे धाबे ह्या चाचणीमुळे दणाणले आहेत. कारण पाकिस्तान ने नजर वाकडी करण्याचा प्रयत्न केला तर जमीनीवरून नाही तर पाण्याखालुन पण पाकिस्तान च स्थान जगाच्या नकाशातुन नष्ट करण्याची क्षमता भारताकडे येणार आहे.

विशाखापट्टणम जवळच्या समुद्रात पाण्याखाली असलेल्या एका गुप्त जागेवरून हे मिसाईल डागण्यात येणार असुन भारताने आंतरराष्ट्रीय निकषाप्रमाणे NOTAM (Notice to Airmen) आणि मरीन वॉर्निंग बंगालच्या उपसागरात सुरु केल्या आहेत. ह्याचा अर्थ असतो की येत्या दिवसात भारत क्षेपणास्त्र चाचणी कधीही करणार असुन ह्या मार्गातील सर्वच नौका, विमाने ह्यांना हा सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे. डी.आर.डी.ओ. के ४ च्या पुर्ण पल्याची चाचणी करणार का? हे अजुन गुलदस्त्यात असलं तरी जगातील ह्या भागातुन वाहतुक करणाऱ्या सगळ्यांना दिलेला इशारा सूचक आहे. ह्या पाठोपाठ भारत अग्नी ३ आणि ब्राह्मोस ह्या अण्वस्त्र वाहुन नेणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी पण येत्या काही आठवड्यात करणार आहे.

रोज उठून गरळ ओकणाऱ्या पाकिस्तान ला ह्या तीन चाचण्या त्याची जागा नक्कीच दाखवतील. जमीन, वायु, पाण्याखालुन अश्या सर्व ठिकाणांहून ३००० पेक्षा जास्त अंतरावरून स्वनातीत वेगाने जाणारी भारताची अण्वस्त्र वाहुन नेणारी क्षेपणास्त्र नक्कीच पाकिस्तान ला चारी मुंड्या चित करतील ह्यात मला शंका नाही. तूर्तास के ४ च्या चाचणीसाठी डी.आर.डी.ओ. च्या वैज्ञानिक, संशोधक आणि अभियंते ह्यांना खुप खुप शुभेच्छा.

फोटो स्रोत :- गुगल 


No comments:

Post a Comment