Wednesday 30 March 2016

एअरलिफ्ट .. विनीत वर्तक
एअरलिफ्ट हा अक्षय कुमार चा चित्रपट बघण्याआधीच ह्या चित्रपटा बद्दल प्रचंड कुतूहल होत. व्हात्स अप वर फिरत असलेली माहिती. त्याच्या जोडीला विकिपीडिया ची माहिती व त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड ची जोड.
"The 1990 airlift of Indians from Kuwait was carried out from 13 August to 20 October 1990 after the Invasion of Kuwait. Air India holds the Guinness Book of World Records for the most people evacuated i.e 165,000 people by a civil airliner as a result of this effort in which 500 were sent through a ship. The operation was carried out during the Persian Gulf War in 1990 to evacuate Indian expatriates from Kuwait. It is believed to be the largest civilian evacuation in history."
सगळ्यात कुतूहल म्हणजे हि इतकी मोठी गोष्ट लपून होती. म्हणजे वाचनात किंवा कुठेही ह्यची पुसटशी पण कल्पना नव्हती. चित्रपट बघितल्यावर खूप काही मिळाल. एक हरवलेला भारतीय हिरो "सन्नी म्याथुस" ज्यांच्या प्रयत्नांवर व चित्रपट बेतलेला आहे. भारतीय विचार किती मुरलेले आहेत स्पेशली कौटुंबिक व्यवस्थेमुळे कि त्यामुळेच इतका वैश्विक विचार सन्नी म्याथ्युस करू शकले. माझ झाल ह्या पलीकडे मी ज्या देशातून आलो त्या देशासाठी करण्याचा विचार जेव्हा समोर येतो तेव्हा कुठेतरी आपल्या कौटुंबिक रचनेची मुळेच त्याला कारणीभूत असतात.
एका वेगळ्या देशात, प्रांतात काम करताना अचानकपणे समोर आलेल्या समस्या किती भयावह असू शकतात. जेव्हा पैसा, तुमच स्टेटस टराटरा फाटल जाते. त्या वेळेस आपल्याच समोर येणार आपल्याच व्यक्तिमत्वाच दारिद्र्य खूप काही शिकवून जाते. एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते कि भारतात नांदणाऱ्या सर्व धर्मियांमुळे आणि गेल्या १००० वर्षा पेक्षा हून अधिक कालावधी मध्ये भारताने कोणत्याच देशावर स्वताहून आक्रमण केल नाही आहे. माझ्या मते जगातील कोणत्याही कोपर्यात इतकी सहिष्णूता नसेल. हे सांगण्याच कारण इतकच कि कोणत्याही मुस्लीम देशा मद्धे भारताला मानाचे स्थान आहे. (अपवाद :- पाकिस्तान ) युद्ध केलेला इराक आणि बळी पडलेला कुवेत दोन्ही ठिकाणच्या राजवटीत भारतीयांना अभय मिळाल ते ह्याच साहिष्णूतेमुळे. सर्व धर्मियांना सामावून घेण्याची आपली संस्कृती हीच आपल गेम चेंजर आहे.
एअर इंडियाच्या नावाने आपण नेहमीच खडे फोडतो. पण ह्या सर्व ऑपरेशन मध्ये एअर इंडिया, इंडिअन एअर्लाइन्स आणि भारतीय वायू सेना ह्याच कार्य उच्च कोटीच आहे. तब्बल ४८८ विमान युद्ध क्षेत्रात उतरवून ६३ दिवसात १,११,७११ लोकांना मायदेशी घेऊन येण नक्कीच अभिमानास्पस्द आणि कौतुक कराव असच आहे. ह्याचा बोध भारत सरकारनी नक्कीच घेतला असावा म्हणून आत्ता येमेन मद्धे भारत सरकारने केलेल्या कारवायीच जागतिक कौतुक झाल. येमेन मधून अनेक इतर अनेक देशाचे नागरिक हि भारताने सुस्थळी हलवले होते.
चित्रपटाच्या बाबतीत बोलायचं झाल तर अक्षय कुमार रॉक्स. पण सगळ्यात जास्ती भाव खाऊन गेली असेल तर निर्मत कौर. खूप गुणवान अभिनेत्री आहे. लंचबॉक्स च्या वेळेसच तिचा अभिनय खूप आवडला होता. इकडेही ह्या गुणवान अभिनेत्रीने कोणतीच कसर सोडली नाही आहे. चित्रपटाच दिग्दर्शन , सवांद खूपच सुंदर आहेत. स्पेशली आपल्या नवर्याच्या जागलेल्या भारतीय अभिमानामुळे सतत कुरबुर करणाऱ्या पण जगापुढे नवऱ्याच्या बाजूने लोकांना चार खडे बोल सांगतानाचा प्रसंग. गाडीत कुवेती स्त्री ला बसायला देण्याचा प्रसंग क्लास आहेत. स्पेशली कौतुक निर्मत कौर च ह्या दोन्ही प्रसंगात तिने आपल्या अभिनयाने जान आणली आहे. २ तास खिळवून ठेवणाऱ्या ह्या चित्रपटात खूप काही आहे. जिकडे भारत सरकार, निद्रीस्त्र सरकारी अधिकारी, जनतेने निवडून दिलेले सेवक झोपेच सोंग करतीत असताना, त्याच सिस्टीम मधील एक अधिकारी पूर्ण सिस्टीम ला जाग करतो. ज्या वेळेला प्रसंगाची तमा न बाळगता मला असेच हवे , तसच हव आम्ही पैसे दिले आहेत म्हणून रडणाऱ्या केविलवाणी लोक बघताना त्याच लोकांसाठी स्वताचे घर , दार , पैसा सगळ देऊन त्यांना जेवणाची व्यवस्था करणारा भारतीय पण आपल्याला भेटतो. चातुर्य, मितभाषीपणा आणि हजरजवाबी पणा अंगी असेल तर कठीण परीस्तीथीत योग्य निर्णय घेऊ शकतो. ( अक्षय कुमार आणि इराकी अधिकारी ह्यातील जेवणाच्या टेबलावरील संभाषण ) हे खूप काही शिकवून जातात.
शेवटी एअरलिफ्ट सोडू नये असा सिनेमा. भारतातील काळाच्या ओघात लुप्त झालेल्या हिरोना पुढे आणणारा सिनेमा. तो जितका अक्षय आणि निर्मत साठी लक्षात राहील तितकाच सन्नी म्याथुस , एअर इंडिया, भारीतीय वायू सेना आणि मोजके सरकारी अधिकारी ज्याचं कार्य कार्यालयाच्या फायिली मद्धे लुप्त झाल. ह्या सर्व अनामिक हिरोंना सलाम. एअरलिफ्ट ने मला तरी नक्कीच लिफ्ट केल. तुम्हाला हि करेल ह्यात शंका नाही...

No comments:

Post a Comment