Wednesday 30 March 2016

अबाउट टाईम... विनीत वर्तक
अबाउट टाईम नावाचा एक सुंदर चित्रपट बघितला. खरे तर नावातच सगळ काही आहे. भूतकाळात जाऊन गोष्टी बदलत्या आल्या असत्या तर खूप काही बदलता आल असत. सगळ्यांना हे नेहमीच वाटत असते नाही का? स्पेशली प्रेमात तर नक्कीच. न बोलता आलेल्या भावना, अजाणतेपणी निघालेले शब्द , आठवणीत राहिलेल्या दुखद आठवणी आणि विस्मरणात गेलेल्या सुखद आठवणी सगळच बदलवास वाटणार....
पण असे जाता आले तर खरेच इतक सुखद असेल का? ह्या प्रश्नाच उत्तर नक्की काहीच सांगता येणार नाही. चित्रपटात हि एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट आहे कि जे तुमच्या डेस्टिनी मध्ये नाही ते भूतकाळात जाऊन पण तुम्ही बदलू शकत नाही. मग नक्की काय?? हाच प्रश्न जेव्हा टीम ला पडतो तेव्हा तो त्याच्या वडिलांना विचारतो आणि दिलेले उत्तर खूप मार्मिक आहे.
" live each day twice in order to be truly happy: the first time, live it as normal, and the second time, live every day again almost exactly the same. The first time with all the tensions and worries that stop us noticing how sweet the world can be, but the second time noticing."
भूतकाळात जाऊन पण तू काही बदल करू नकोस. जे जस घडल तसच घे. बदल करून हाताशी काहीच लागत नाही. एक आल तर दुसर जाते. आत्ता आलेला प्रत्येक क्षण पूर्ण आनंदाने जग. तो अनुभव टीम च्या शब्दात सांगायचं झाल तर
" it is better to live each day once, and appreciate everything as if he is living it for the second time."
आत्ता येणारा प्रत्येक क्षण खूप काही घेऊन येतो. आपण त्यातून काय घ्यायचं ते आपण ठरवायचं नाही का? त्यात चांगल आहे , वाईट आहे, त्यात भूतकाळ आहे आणि त्यात भविष्यकाळ पण आहे. मग कशाला उद्याची बात गड्या आयुष्य खूप सुंदर आहे जस आहे तसच , हाताशी मिळेल तसच जागून घे. कल किसने देखा हे...........

No comments:

Post a Comment