Wednesday, 9 February 2022

भंगी ते पद्मश्री एका उषाचा सुलभ प्रवास... विनीत वर्तक ©

 भंगी ते पद्मश्री एका उषाचा सुलभ प्रवास... विनीत वर्तक ©

समाजात चांगल आणि वाईट यांचे ठोकताळेच मुळात चुकीचे आहेत. आपल्या आलिशान गाडीतून हळूच काच खाली करून त्यातून प्लास्टिक पिशवीतून कचरा, उरलेलं अन्न आणि अगदी व्हिस्पर सारखे वापरलेले सॅनिटरी नॅपकिन रस्त्याच्या कडेला फेकून पळ काढणारे पांढरपेशा समाजातील लोकं. घरी येऊन स्वच्छतेचं महत्व सोशल मिडिया वर सांगत असतात. अश्या लोकांना समाज चांगल आणि प्रतिष्ठित मानतो. तर हाच कचरा उचलून स्वछता ठेवणाऱ्या लोकांना समाज भंगी म्हणून हिणवतो. त्यांच्या पासून लांब रहातो तर वेळ प्रसंगी वाळीत टाकतो. समाजातली घाण म्हणजे हेच ते कचरा उचलणारे भंगी लोक असच मत समाज बनवतो. पण आपण समाजात काय करतो याबद्दल एक अवाक्षर ही पांढरपेशा समाजातील लोक सांगत नाहीत. ही गोष्ट आहे अश्याच एका स्त्री ची जिला भंगी म्हणून समाजाने हिणवलं, त्रास दिला, अवहेलना केली. पण या सगळ्यांना बाजूला सारत तिने स्वच्छतेचं आपलं कार्य सुरूच ठेवलं आणि त्याच कार्याचा २०२० साली भारत सरकारने पद्मश्री सन्मान देऊन गौरव केला. 

भारतात उघड्यावर शौचास बसणं हे परांपरागत चालत आलेली एक परंपरा होती. अगदी मुंबई सारख्या शहरात लोकल ट्रेन ने जर २०१४ आधी सकाळी प्रवास केला असेल तर हे दृश्य शेकडोंच्या पटीत दिसायचं. आपली घाण आपण स्वच्छ करायची असते ही शिकवण कधी रुजलीच नव्हती. मुंबई सारख्या शहरात ही स्थिती होती तर राजस्थान मधल्या अलवार सारख्या शहरात काय असेल याचा आपण विचार करू शकतो. याच शहरात 'उषा चौमर' ही सफाई कामगार म्हणून काम करत होती. वयाच्या १० वर्षी लग्न आणि वयाच्या १४ व्या वर्षी काही कळायच्या आधी संसाराला सुरवात केलेली उषा २००३ मधे लोकांच्या घरी जाऊन सफाई कामगार म्हणून काम करायची. १० घराची अगदी विष्ठा साफ करण्यापासून कचरा काढणं त्याची विल्हेवाट लावणं असं सगळं तिला करावं लागत असे. लोक घरात राहिलेलं अन्न, वापरलेले सॅनिटरी पॅड्स कंडोम पासून जे काही असेल ते तिच्या अंगावर फेकायचे. कारण तिला स्पर्श करणे म्हणजे आपला विटाळ. उषा समाजातील घाण होती असं या लोकांच मत होतं. तिच्या जवळ जाणं, तिला आपल्या घरात प्रवेश देणं हे समाजात मान्य नव्हतं. अगदी तिला दुकानातुन  किराणा आणण्यासाठी ही दुकानात प्रवेश दिला जायचा नाही. मंदिर वगरे तर गोष्टी दूर राहिल्या. 

उषा पण एक माणूस होती. तिला या सगळ्यातून किती त्रास होत असेल याचा विचार न समाज करत होता न कोणाला त्याच काही पडलं होतं. उषा च्या मते घरी आल्यावर डाळ बघितली तरी एक शिरशिरी तिच्या डोक्यातून जायची. कारण सडलेल्या अन्नाचा, कचऱ्याचा, माणसाच्या विष्टेचा तो वास, ते वातावरण हे इतकं भिनलेलं असायचं की काही खायची ही इच्छा व्हायची नाही. या भोगातून आपली कधी सुटका होईल अशी आशा पण तिची मावळली होती. पण २००३ साली एक अनपेक्षित वळण तिच्या आयुष्यात आलं. तिची भेट झाली सुलभ इंटरनॅशनल या संस्थेचे संस्थापक डॉक्टर भिंडेश्वर पाठक. त्यांनी उषा आणि तिच्या सहकाऱ्यांना हे काम करण्यापासून परावृत्त केलं आणि सुलभ संस्थेशी जोडून काम करण्याची संधी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उषाने 'नई दिशा' या संस्थेच्या उपक्रमात काम करायला सुरवात केली. स्वच्छतेचं महत्व समाजात रुजवण्यापासून ते लोकांना अश्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कामापासून परावृत्त करण्यासाठी तिने एक चळवळ उभी केली. 

२०१४ ते आजतागायत भारतात ९.६ कोटी पेक्षा जास्त शौचालय भारताच्या काना-कोपऱ्यात उभी राहिली आहेत. स्वछ्तेची सुरवात एकीकडे देशाच्या पंतप्रधानांनी टॉयलेट बांधून केली तिकडे उषा च्या चळवळीने प्रेरित होईन अनेक लोकांनी त्या स्वछतेच महत्व जाणून घेतलं. आपली घाण, आपली विष्ठा आपण साफ करणं, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी एक नागरिक आणि समाजाचा भाग म्हणून आपली आहे. हे बिंबवण्यात उषाने विशेष करून ग्रामीण भागात घेतलेल्या मेहनतीची नोंद भारत सरकारने घेताना २०२० साली पद्मश्री हा प्रतिष्ठित सन्मान देऊन तिचा गौरव केला. एकेकाळी तिला वाळीत टाकणारा, तिच्यापासून अंतर ठेवणारा हाच पांढरपेशा समाज आज तिच्या भेटीसाठी वाट बघतो हे उषाच्या जिद्दीचं फळ आहे. तिचा असा कायापालट करण्यात डॉक्टर. पाठक आणि सुलभ चा खूप मोठा भाग आहे. आज उषा सुलभ च्या सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशन ची अध्यक्ष आहे. तीच स्वछ्तेच व्रत आजही अविरत सुरु आहे. 

एक भंगी म्हणून हिणवल्या गेलेल्या उषाचा पद्मश्री पर्यंतचा प्रवास सगळ्यांना खूप प्रेरणादायी तर आहेच. पण समाजा कडून मिळणाऱ्या दुहेरी वागणुकीचा आरसा आहे. सफाई कामगार हे कचरा उचलणारे नाहीत तर तेच खरे स्वछतेचे दूत आहेत. हा विचार समाजात कुठेतरी आज रुजणं आज खूप गरजेचं आहे.  भारत सरकारचं खास अभिनंदन कारण अश्या लोकांना पद्मश्री सारखा सन्मान दिल्याने त्या सन्मानाची उंची आणखी वाढली आहे. उषा चौमर च्या कार्याला माझा कडक सॅल्यूट. तिच्या पुढील प्रवासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday, 7 February 2022

#Life_Live_People ... Part 11 (Doctor Abhay Ashtekar) ... Vinit Vartak ©

 #Life_Live_People ... Part 11 (Doctor Abhay Ashtekar) ... Vinit Vartak ©

As a child, you read about Archimedes and Sir Isaac Newton in a science book. Eureka, Archimedes shouting Eureka, and Newton exploring gravity by looking at an apple falling from a tree. Of course, there is no hard evidence today that these things really happened. Many today say that these stories are fictional. In any case, these are the things that have ignited the minds of many young students in India to this day. This is where the sweetness of science and the curiosity about it first comes from. One such student was Abhay Ashtekar from Kolhapur district in Maharashtra.

While studying at a Marathi medium school in Mumbai, Sir Isaac Newton's apple made a home in his mind forever. He realized that the gravity of an apple falling from a tree was the same everywhere in India or India. But in both these places, language, culture, thought, society are all changing. So it is better to study something that is stable than to changing subject. After completing his high school education in Mumbai, he jumped for a degree at the University of Texas at Austin in the United States. From there, he pursued a doctorate in basic physics, earning a doctorate from the University of Chicago. 

Albert Einstein's Theory of General Relativity had made a home in his head and mind. The connection between space and time, two basic things in physics, was further aroused by his curiosity. He did research on the subject of gravity and its relation to the universe. While proving the theorem of loop quantum gravity, he discovered variables which are today known as 'Ashtekar variables'. (Loop Quantum Gravity is a link between quantum mechanics and the general theory of relativity.) Dr. Ashtekar's research has made it easier to understand Albert Einstein's theory. He was awarded the Einstein Prize by the American Physical Society for his significant research.

It is our great misfortune that Dr. Abhay Ashtekar, who was educated in a Marathi medium school in Mumbai and raised the flag of his accomplishment on the world stage, is not among the people who carry the flag of Marathi identity in the streets today. Marathi identity does not last just by growing a beard, tying a feta, putting Tila on the forehead or waving the saffron flag of identity. Of course, our society is not strong enough to understand this. He is inspired by Bhagwad Gita. Dr. Abhay Ashtekar, who is highly respected in the world for his research. Today, Dr. Ashtekar is an honorary member of the prestigious National Academy of Sciences. Even after taking education through Marathi medium, he has made his mark on the world horizon.

My heartfelt salute to Dr. Abhay Ashtekar, who is proud of his Indian and Marathi identity through his research in basic physics. My best wishes for their further research and travel.

Jai Hind !!!

Photo Search Courtesy: - Google

Note: - The wording in this post is copyrighted.



#आयुष्य_जगलेली_माणसं...भाग ११ (डॉक्टर अभय अष्टेकर)... विनीत वर्तक ©

 #आयुष्य_जगलेली_माणसं...भाग ११ (डॉक्टर अभय अष्टेकर)... विनीत वर्तक ©

लहानपणी विज्ञानाच्या पुस्तकात आपण आर्किमिडीज आणि सर आयझॅक न्यूटन च्या गोष्टी वाचल्या होत्या. युरेका, युरेका म्हणून ओरडत येणारा आर्किमिडीज आणि झाडावरून पडलेलं सफरचंद बघून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारा न्यूटन. अर्थात या गोष्टी खरोखर घडल्या होत्या का याचा काही सबळ पुरावा आज उपलब्ध नाही. या कथा काल्पनिक आहेत असं अनेक जण आज म्हणतात. काहीही असलं तरी याच गोष्टींनी भारतातील अनेक तरुण विद्यार्थ्यांच मन प्रज्वलित आजवर केलेलं आहे. विज्ञानाची गोडी आणि त्याच्या बद्दल कुतूहल कुठे पहिल्यांदा उत्पन्न होत असेल तर याच गोष्टींमधून. अश्याच विद्यार्थ्यांमध्ये एक होते महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील 'अभय अष्टेकर'.  

मुंबई मधील मराठी माध्यमाच्या शाळेतून आपलं शिक्षण घेताना सर आयझॅक न्यूटन च्या सफरचंदाने त्यांच्या मनात घर केलं ते कायमचं. त्यांच्या असं लक्षात आलं की सफरचंद झाडावरून पाडणारं ते गुरुत्वाकर्षण अमेरिका असो वा भारत सगळीकडे सारखच असते. मात्र या दोन्ही ठिकाणी भाषा, संस्कृती, विचार, समाज या सर्व गोष्टी बदलत जातात. मग या बदलणाऱ्या गोष्टींपेक्षा स्थिर असलेल्या गोष्टीचा अभ्यास करणं जास्ती चांगल. आपलं उच्च माध्यमिक पर्यंतच शिक्षण मुंबईत पूर्ण केल्यावर त्यांनी पदवी शिक्षणासाठी उडी घेतली ती थेट अमेरिकेतील ऑस्टिन येथे असलेल्या टेक्सास विद्यापीठात. तिथून पुढे मूलभूत भौतिकशास्त्राला आपल्या शिक्षणाच लक्ष्य ठेवून त्यांनी शिकागो विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. 

अल्बर्ट आईनस्टाईन ने मांडलेल्या थेअरी ऑफ जनरल रिलेटिव्हिटी ने त्यांच्या डोक्यात आणि मनात घर केलं होतं. भौतिकशास्त्रामधील मूलभूत दोन गोष्टी म्हणजेच स्पेस आणि टाइम यांचा संबंध त्यांच कुतूहल अजून जागृत करत होता. लहानपणी मनात घर केलेलं गुरुत्वाकर्षण आणि त्याचा विश्व स्वरूपाशी संबंध अश्या विषयांवर त्यांनी संशोधन केलं. लूप क्वांटम ग्रॅव्हिटी च प्रमेय सिद्ध करताना त्यांनी व्हेरिएबलस शोधून काढले ज्यांना आज 'अष्टेकर व्हेरिएबलस' म्हणून ओळखलं जाते. ( लूप क्वांटम ग्रॅव्हिटी ही क्वांटम मेकॅनिक्स आणि जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी यांना जोडणारा एक दुवा आहे.) डॉक्टर अष्टेकर यांनी केलेल्या संशोधनामुळे अल्बर्ट आईनस्टाईन ने मांडलेल्या थेअरी ला समजण सोपं झालेलं आहे. त्यांच्या या महत्वपूर्ण संशोधनासाठी अमेरिकन फिजिकल सोसायटी ने त्यांचा आईनस्टाईन पुरस्कार देऊन गौरव केला आहे. 

मुंबई मधील मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून आज जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा अटकेपार रोवणारे डॉक्टर अभय अष्टेकर आज मराठी अस्मितेचा झेंडा गल्लोगल्ली घेऊन फिरणाऱ्या लोकांच्या खिजगणतीत ही नाहीत हे आपलं खूप मोठं दुर्दैव आहे. फक्त दाढी वाढवून, फेटा बांधून, कपाळावर टीळा लावून किंवा अस्मितेचा भगवा झेंडा मिरवून मराठी अस्मिता टिकत नसते. अर्थात हे कळण्याइतपत आपल्या समाजाची प्रगल्भता नाही. आज आपल्या संशोधनाने जगात अतिशय मान सन्मान मिळवणाऱ्या डॉक्टर अभय अष्टेकर यांच्या या कार्यामागे त्यांना प्रेरणा मिळाली आहे ती भगवतगितेमुळे. आज डॉक्टर अष्टेकर संशोधन क्षेत्रात अतिशय मानाच्या असणाऱ्या नॅशनल ऍकडमी ऑफ सायन्स चे मानद सदस्य आहेत. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन सुद्धा जगाच्या क्षितिजावर त्यांनी आपली छाप पाडली आहे. 

भारताचा आणि मराठी अस्मितेचा गौरव मूलभूत भौतिकशास्त्रात आपल्या संशोधनाने करणाऱ्या डॉक्टर अभय अष्टेकर यांना माझा कडक सॅल्यूट. त्यांच्या पुढील संशोधनासाठी आणि प्रवासासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Wednesday, 2 February 2022

#Khaare_vare_matlai_vare (part 19) ... Vinit Vartak ©

 #Khaare_vare_matlai_vare (part 19) ... Vinit Vartak ©

It is said that we have to suffer the consequences of our deeds. We are often the ones who get stuck in the pit dug for others. Pakistan is currently experiencing all this. Pakistan, which dreams of taking over Kashmir when it does not have the strength to handle what it is, has started a storm. Matalai winds have now taken the direction of salty winds. This storm has begun to show its form. At least 100 Pakistani soldiers have been killed in an attack by the Baloch Rebel Army in Noshki, 160 km from Quetta, the capital of Pakistan's Balochistan province. The news of the death of Major General Ayman Bilal Safdar is coming. Such a large number of Pakistani troops and the death of such officer in this attack is a testament to this storm. 

Pakistan, which unites Kashmir and prepares terrorists for it, is eating away at its own home. Balochistan is slipping out of Pakistan's hands due to what is happening in the coming days. Balochistan has an area of ​​347,190 square kilometers. As far as Pakistan is concerned, Balochistan alone accounts for one third of the country's land. Getting out of Balochistan is a way for Pakistan to get out of it. Pakistan will never be able to recover from it. It is very important to know why so much conflict has reached its peak in Balochistan. If Balochistan separates from Pakistan, then in a way India is going to trap Pakistan in a way.

For the last 75 years, Balochistan has been fighting for its independence. Not only Pakistan but Iran and Afghanistan have somehow occupied its land. When the British decided to leave India in 1947, the then leader of Balochistan, Ahmed Yar Khan, demanded an independent nation of Balochistan from the British. The then leader of Pakistan, Mohammad Ali Jinnah, proposed to Ahmed Yar Khan to join Pakistan. Which he categorically denied. Balochistan will emerge as an independent country at the same time as Pakistan stabbed its soil in the back.Suddenly, without giving any reason, the leader of Balochistan, Ahmed Khan, signed an agreement that he was joining Pakistan. To do so, Khan was abducted by the Pakistani army. After this the sun set on the horizon of Balochistan forever.

Natural gas is abundant in Balochistan. For the last 75 years, Pakistan has been using it to generate energy. But Pakistan has not given anything to Balochistan. Pakistan has not been able to meet even the most basic needs. That is why there is a huge dissatisfaction among the citizens of Balochistan against Pakistan. Nature has spared the beauty of nature with its free hand but Pakistan has completely waited for this whole area. Schools, roads, electricity, water, hospitals, medical facilities are all gone. In a way, this part has become like a zombie. Everyone knows that Pakistan is a democratic nation on paper. The Pakistan Army is responsible for everything here. Democracy does not exist in Balochistan. While the Pakistani army is oppressing and dictating the people here, it is committing many inhumane atrocities on the women here. Due to all this, the people of Balochistan are suffering due to the oppression of Pakistan.

Balochistan shares borders with Afghanistan and Iran. As a result, a large number of people from Afghanistan and Iran have infiltrated here. The very existence of the locals here is in jeopardy. Pakistan is silent on this. In 2013, China invested 50 billion and showed the carrot of development. But Gwadar was actually a small village in Balochistan. Fishing was the main occupation here. But China has given the reason for the construction of the port. It has closed the main business of the people here but has not created any alternative system for them. So the whole population is on the streets. That is why the locals have raised the flag of rebellion here today. Its salts are now slowly spreading to other parts of Balochistan. Yesterday's incident is indicative of this storm. Today, Pakistan has to supply its army to protect the Chinese people. There has been a significant increase in the number of attacks on Chinese and Pakistani nationals.

The latest manifestation of this discontent in Balochistan is the Balochistan Liberation Army, which carried out yesterday's attacks. In a way, an organization like the Taliban has emerged in Pakistan's Balochistan. Which is spreading rapidly in Balochistan. Pakistan, with its economic and military might, may be able to stem the tide for some time, but at the same time, its strength is increasing. In view of this, it is certain that Pakistan will face a huge crisis. In fact, China's entire B.R.O. The project is currently in trouble. After eating soil in Kashmir, Pakistan is currently eating soil in Balochistan. That is why his torment is increasing. Pakistan has accused India of supporting these movements in Balochistan. Both Balochistan and India have made it clear that the allegations are baseless. But some of the tricks of chess are to be played behind the scenes, and Pakistan is aware that the leadership that currently specializes in it, be it political or defense-related, belongs to India. That is why it is clear that these tricks will be played without showing anything clearly.

In any case, Pakistan, which claims the other's house, is currently busy resolving its own domestic disputes. In which he is a complete failure. If the chaos continues like this, it will not take long for it to fall apart, as evidenced by the changed winds and thunderstorms.

Jai Hind !!!

Photo Search Courtesy: - Google

Note: - The wording in this post is copyrighted.




#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १९)... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १९)... विनीत वर्तक ©

असं म्हणतात की आपण केलेल्या कर्माचे भोग आपल्याला इकडेच भोगावे लागतात. दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्यात अनेकदा आपणच अडकतो. या सर्वाचा अनुभव सध्या पाकिस्तान घेत आहे. जे आहे ते सांभाळायची ताकद नसताना काश्मीर घेण्याची स्वप्ने बघणाऱ्या पाकिस्तानची शकले उडण्याच्या वादळाची सुरवात झालेली आहे. मतलई वाऱ्यांनी आता खाऱ्या वाऱ्यांची दिशा घेतली आहे. या वादळाने आपलं स्वरूप दाखवायला सुरवात केली आहे. काल पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा पासून १६० किलोमीटर वर असलेल्या नोशकी भागात बलूच रिबेल आर्मी ने केलेल्या हल्यात जवळपास १०० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याच्या बातम्या आहेत. यात अगदी मेजर जनरल आयमान बिलाल सफदार यांचा मृत्यू झाल्याच्या ही बातम्या पुढे येत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी सैन्याची वाताहत आणि इतक्या मोठ्या अधिकाऱ्याचा या हल्यातील मृत्यू याच वादळाची साक्ष देणारा आहे. 

काश्मीरसाठी आकाश पाताळ एक करणारा आणि आतंकवाद्यांना त्यासाठी तयार करणारा पाकिस्तान स्वतःच्या घरात माती खातो आहे. येत्या काही दिवसात ज्या घटना घडत आहेत त्यावरून बलुचिस्तान पाकिस्तान च्या हातातून निसटत चालला आहे. बलुचिस्तान च क्षेत्रफळ ३,४७,१९० स्क्वेअर किलोमीटर इतकं प्रचंड आहे. पाकिस्तान चा विचार केला तर संपूर्ण देशाच्या जमिनीचा हा तिसरा हिस्सा हा एकट्या बलुचिस्तान चा आहे. बलुचिस्तान हातातून निसटणं म्हणजे एक प्रकारे पाकिस्तान ची शकले उडणं त्याच्यातून पाकिस्तान कधीच पुन्हा सावरू शकणार नाही. बलुचिस्तान मधे मुळातच इतका संघर्ष शिगेला का पोहचला आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. जर बलुचिस्तान पाकिस्तान पासून वेगळा झाला तर एक प्रकारे भारत पाकिस्तान ला खिंडीत पकडून त्याचा माज एक प्रकारे उतरवणार आहे. 

गेली ७५ वर्ष बलुचिस्तान आपल्या स्वातंत्र्यासाठी झगडत आहे. एकट्या पाकिस्तान नाही तर इराण आणि अफगाणिस्तान ने त्याच्या भूमीवर एक प्रकारे कब्जा केलेला आहे. १९४७ जेव्हा इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा बलुचिस्तान चे त्याकाळचे नेते अहमद यार खान यांनी स्वतंत्र बलुचिस्तान राष्टाची मागणी इंग्रजांकडे केली. पाकिस्तान चे तत्कालीन नेते मोहंमद अली जिना यांनी अहमद यार खान यांना पाकिस्तान सोबत येण्याचा प्रस्ताव ठेवला. जो त्यांनी स्पष्टपणे नाकारला. बलुचिस्तान एक स्वतंत्र्य देश म्हणून उदयाला येणार त्याचवेळेस पाकिस्तान ने आपल्या मातीला जागत पाठीत खंजीर खुपसला. अचानक कोणतंही कारण न देता बलुचिस्तान चे नेते अहमद खान यांनी आपण पाकिस्तान मधे समाविष्ट होत असल्याच्या करारावर स्वाक्षरी केली. असं करण्यासाठी खान यांना पाकिस्तान च्या आर्मी ने त्यांच अपहरण केलं. यानंतर बलुचिस्तान च्या क्षितिजावर सूर्य मावळला तो कायमचा. 

बलुचिस्तान मधे नैसर्गिक गॅस प्रचंड प्रमाणात आहे. गेली ७५ वर्ष पाकिस्तान त्याचा वापर करून ऊर्जा निर्मिती करतो आहे. पण बलुचिस्तान च्या वाट्याला मात्र पाकिस्तान ने काहीही दिलेलं नाही. साध्या प्राथमिक गरजा भागवण्यात सुद्धा पाकिस्तान पूर्ण करू शकलेला नाही. त्यामुळेच बलुचिस्तान च्या नागरिकांमध्ये पाकिस्तान विरुद्ध प्रचंड प्रमाणात असंतोष आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने निसर्ग सौंदर्याची उधळण या भागावर केली आहे पण पाकिस्तान ने या संपूर्ण भागाची पूर्णपणे वाट लावली आहे. शाळा, रस्ते, वीज, पाणी, हॉस्पिटल, वैद्यकीय सुविधा अश्या सगळ्या गोष्टींची वानवा आहे. एक प्रकारे हा भाग झोंबी सारखा झालेला आहे. पाकिस्तान कागदावर लोकशाही राष्ट्र आहे हे सर्वाना माहित आहे. पाकिस्तानी आर्मीच इथल्या सर्वच गोष्टींवर वचक ठेवून असते. बलुचिस्तान मधे लोकशाही अस्तित्वात नाही. इकडे पाकिस्तानी सेना इथल्या लोकांवर दडपशाही, हुकूमशाही गाजवत असते तर इथल्या स्त्रियांवर अनेक अमानवीय अत्याचार करत आहे. या सगळ्यामुळे बलुचिस्तान मधील जनता पाकिस्तान च्या जाचामुळे त्रासलेली आहे. 

बलुचिस्तान ची सिमा अफगाणीस्तान आणि इराण या देशांशी जुळते. त्यामुळे इकडे मोठ्या प्रमाणावर अफगाण आणि इराण मधील लोकांनी घुसखोरी केलेली आहे. इथले जे स्थानिक लोकं आहेत त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. ज्यावर पाकिस्तान मूग गिळून गप्प आहे. यातच २०१३ मधे चीन ने इकडे ५० बिलियन डॉलर ची गुंतवणूक करत विकासाचं गाजर दाखवलेलं होतं. पण प्रत्यक्षात ग्वादर हे एक छोटं गाव बलुचिस्तान मधे होतं. मासेमारी हा इथला प्रमुख व्यवसाय होता. पण चीनने बंदर निर्मितीचं कारण देतं इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय तर बंद केलाच पण त्यांना कोणतीही पर्यायी व्यवस्था निर्माण केली नाही. त्यामुळे इथली संपूर्ण जनता रस्त्यावर आलेली आहे. त्यामुळेच आज इकडे स्थानिक लोकांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. याचे लोण आता हळूहळू बलुचिस्तान च्या इतर भागात पसरत चाललेले आहेत. काल झालेली घटना हे याच वादळाचे द्योतक आहे. आज चीन लोकांच्या संरक्षणासाठी पाकिस्तान ला आपली आर्मी इकडे पुरवावी लागत आहे. इथे चीन आणि पाकिस्तानी नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटनेत लक्षणीय वाढ झालेली आहे. 

बलुचिस्तान च्या या असंतोषाचे ताजे रूप म्हणजेच बलुचिस्तान लिबरेशन आर्मी जिने कालचे हल्ले घडवून आणले आहेत. एक प्रकारे तालिबान सारखी संघटना पाकिस्तानाच्या बलुचिस्तान मधे उदयाला आलेली आहे. जिचा प्रसार वेगाने बलुचिस्तान मधे होतो आहे. पाकिस्तान आर्थिक आणि सैनिकी शक्तीच्या जोरावर कदाचित काही काळ हे वादळ थोपवू शकेल पण ज्या वेगाने त्याच्या शक्तीत वाढ होते आहे. ते बघता यात पाकिस्तान च्या समोर खूप मोठं संकट उभं राहणार आहे हे नक्की आहे. खरे तर चीन चा संपूर्ण बी.आर.ओ. प्रकल्प अडचणीत सापडेल अशी सद्यस्थिती आहे. काश्मीर मधे माती खाल्यावर बलुचिस्तान मधे ही पाकिस्तान सद्या माती खातो आहे. त्यामुळेच त्याचा त्रागा वाढतो आहे. बलुचिस्तान मधल्या या चळवळींना भारत पाठिंबा देतो आहे असा पाकिस्तान चा आरोप आहे. हा आरोप निराधार असल्याचं बलुचिस्तान आणि भारत या दोघांनी स्पष्ट केलं आहे. पण बुद्धिबळाच्या काही चाली या पडद्यामागून खेळायच्या असतात आणि सध्या यात निष्णात असलेलं नेतृत्व मग ते राजकीय असेल किंवा संरक्षण क्षेत्राशी संबंधित भारताकडे आहे याची पाकिस्तान ला जाणीव आहे. त्यामुळेच या चाली काहीच स्पष्टपणे न दाखवता खेळल्या जाणार हे स्पष्ट आहे. 

काहीही असलं तरी दुसऱ्याच्या घरात हक्क सांगणारा पाकिस्तान तूर्तास आपल्याच घरातील भानगडी सोडवण्यात व्यस्त झाला आहे. ज्यात त्याला संपूर्णपणे अपयश येते आहे. या भानगडी अश्याच सुरु राहिल्या तर त्याचे तुकडे व्हायला वेळ  लागणार नाही हे बदललेल्या वाऱ्यांनी आणि घोंघावणाऱ्या वादळाने स्पष्ट केलंच आहे.

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Tuesday, 1 February 2022

Symbol of love ... Vinit Vartak ©

 Symbol of love ... Vinit Vartak ©

Everyone wants to leave something behind as a symbol of love to show respect or love for the spouse who accompanies them in their life, to bear witness of their love to the world forever after them.What is the symbol of love in India? If such a question is asked, the name 'Taj Mahal' will appear on the lips of almost everyone. But is it really a symbol of love? In fact, the entire generation in our country has been taught wrong things for three to four generations after independence.One of them is the Taj Mahal, a symbol of love in India. History has it that the Taj Mahal was built by 20,000 people after the death of his third wife, Mumtaz, while giving birth to their 14th child. The atrocities committed against the workers are still being told today. it has no proof. But was this love really about art? Was it about love towards his wife? Or was it to save our existence on Indian soil? This means that everyone should interpret their own judgement. Although the Taj Mahal is a beautiful work of art, it certainly does not fit my definition of a symbol of love.

The feeling of love begins with sacrifice. Giving something to someone is more of a feeling of love than having something of yours. We will build a symbol of love for a person from which the source of love will increase the feeling of sacrifice, dedication, love in the course of time just like that person and will continue to work behind us for the welfare of the people or to remove the darkness in their life. Sadly, we have been taught so many things in a wrong way that we cannot believe that such a symbol of unparalleled love actually exists. In fact, many forms of those symbols have become kalpavriksha and are still working to remove the darkness in the life of every Indian. Even today, the combination of all the above mentioned emotions can be seen here. Even today, these symbols are contributing to the progress of modern India and to rekindle love in the lives of Indians. This is the symbol of such a love.

It was 1896 when the world's largest diamond was discovered at the Jagersfontein mine in South Africa. The diamond weighed as much as 650 carats (130 grams). After cutting the side of that diamond, a very beautiful diamond was born out of it. The same name was 'Jubilee Diamond'. The same weight was 245.35 carats (49.07 grams). At the dawn of 1900, the diamond was purchased by Sir Dorabji Tata, the eldest son of Sir Jamshedji Tata, the architect of India's Industrial Revolution. He presented the biggest diamond of that time to his wife Meherbai Bhabha as a symbol of his love. Meherbai Bhabha's brother was Jahangir Bhabha, the father of Homi Bhabha, the father of India's Atomic Energy Program. So this diamond was very close to Meherbai Bhabha. In many programs, she had placed Jubilee Diamond around his neck. Meherbai Bhabha died of leukemia in 1931 at the age of 52. His death made Sir Dorabji Tata feel the short life of his spouse. He made a decision to immortalize his love for Meherbai. It is a symbol of love.

After Meherbai's death, Sir Dorabji Tata auctioned off her 21 pieces of jewelery and, most importantly, her Jubilee Diamond. He raised Rs 10 million from it at that time. At present, it will cost more than Rs 500 million. From this he established the image of his love i.e. Sir Dorabji Tata Trust. The organizations that have sprung up from this trust today will realize how big the symbol of their love is. Tata Memorial Hospital, Tata Institute of Social Sciences, TIFR (Tata Institute of Fundamental Research), Indian Institute of Science. And the list goes on and on. The disease that took his beloved wife away from us. The Tata Memorial Hospital, established for the study, treatment and research of cancer, is world-renowned for its unparalleled love and devotion.

Each year, 60,000 to 70,000 cancer patients are treated at the Tata Memorial Hospital. It attracts people not only from India but from all over Asia. The hospital is known worldwide as one of the best cancer hospitals in the eastern part of the world. It is noteworthy that 70% of these patients are treated for free. Every day more than 1000 cancer patients visit the OPD here. 6500 operations and more than 6000 patients are treated with chemotherapy and radiotherapy. The latest cancer treatment technology from around the world is available at this hospital. 

In my opinion, it is not possible to immortalize your love in a different way than this. What is the best symbol of love in the world? If anyone asks me such a question, the answer would be Tata Memorial Hospital and Tata Trust. The beauty of the Taj Mahal may be  even greater.The look may be better but the feeling of love does not sense there. If you really want to experience it, it will come from the Tata Memorial Hospital and other institutions started by Tata. Sadly, for many years now, the symbol that has given many Indians and people around the world the opportunity to be cancer-free and to fight with chronic diseases like cancer, has not yet dawned on Indians. Even today, Indians consider it a blessing to take a selfie in a white confluence. The fact is that we have failed to understand the symbol of love.

My heartfelt salute to Sir Dorabji Tata and Meherbai for creating a symbol of love that saves the lives of thousands of people. There is no doubt that all Indians and many generations to come will carry the message of love, sacrifice, socialism and selflessness through this symbol of your timeless love.

Jai Hind !!!

Photo Search Courtesy: - Google

Note: - The wording in this post is copyrighted. 




प्रेमाचं प्रतीक... विनीत वर्तक ©

 प्रेमाचं प्रतीक... विनीत वर्तक ©

आपल्या आयुष्यात आपल्याला साथ देणाऱ्या जोडीदाराबद्दल आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांची आठवण, आपल्या प्रेमाची साक्ष आपल्या नंतर सुद्धा कायम जगापुढे राहावी यासाठी प्रेमाचं प्रतीक म्हणून काही मागे ठेवण्याची इच्छा प्रत्येकाची असते. भारतात प्रेमाचं प्रतीक काय? असा प्रश्न केला तर जवळपास सगळ्यांच्या ओठावर 'ताजमहल' हे नाव येईल. पण खरचं ते प्रेमाचं प्रतीक आहे का? आपल्या देशातील संपूर्ण पिढीला खरे तर स्वातंत्र्यानंतर तीन ते चार पिढयांना चुकीच्या गोष्टी शिकवल्या गेल्या. त्यातली एक म्हणजे भारतातील प्रेमाचं प्रतीक असणारी वास्तू 'ताजमहल'. आपल्या तिसऱ्या बायकोला म्हणजेच 'मुमताज' ला १४ व्या मुलाला जन्म देताना आलेल्या मृत्यूनंतर ताजमहाल २०,००० लोकांनी बांधला असं इतिहास सांगतो. तो बांधल्यावर त्या कामगार लोकांवर केलेल्या अत्याचाराच्या गोष्टी आजही सांगितल्या जातात. त्याला काही पुरावे नाहीत. पण खरच हे प्रेम कलेवरचं होतं का? बायकोवरचं होत का? की आपलं अस्तित्व भारताच्या भूमीवर जतन करण्याचं होतं? याचा अर्थ प्रत्येकाने आपल्या परीने लावावा. ताजमहाल एक नितांत सुंदर कलाकृती असली तरी ते प्रेमाचं प्रतीक या व्याख्येत नक्कीच माझ्या दृष्टीने बसत नाही. 

प्रेम ही भावना सुरु होते त्यागापासून. काहीतरी आपलं असण्यापेक्षा कोणासाठी आपलं काहीतरी देणं हीच अनुभूती प्रेमाची असते. एखाद्या व्यक्तीवर असलेल्या प्रेमासाठी आपण असं प्रतीक उभारू ज्यातून निघणारा प्रेमाचा झरा त्या व्यक्तीप्रमाणेच काळाच्या ओघात त्याग, समर्पण, प्रेम या भावना वृद्धिंगत करेल आणि आपल्यामागे लोकांच्या कल्याणासाठी किंवा त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी कार्यरत राहील. खेदाने आपल्याला चुकीच्या पद्धतीने इतक्या गोष्टी शिकवल्या गेल्या की असं अजोड प्रेमाचं एक प्रतीक प्रत्यक्षात आहे यावर आपला विश्वास बसत नाही. खरे तर त्या प्रतीकांची अनेक रूपं आज कल्पवृक्ष बनून प्रत्येक भारतीयांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी आजही कार्यरत आहेत. आजही इकडे वर उल्लेख केलेल्या सर्व भावनांचा मेळ बघायला मिळतो. आजही ही प्रतिक आधुनिक भारताच्या प्रगतीत आणि भारतीयांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम निर्माण करण्यासाठी आपला हातभार लावत आहेत. ही गोष्ट आहे अश्याच एका प्रेमाच्या प्रतीकाची. 

१८९६ च वर्ष होतं जेव्हा साऊथ आफ्रिकेमधील जागेर्सफॉन्टेईन खाणीत त्या काळचा जगातील सगळ्यात मोठा हिरा सापडला. त्या हिऱ्याचं वजन होतं तब्बल ६५० कॅरेट (१३० ग्रॅम). त्या हिऱ्याला पैलू पाडल्यानंतर त्यातून अतिशय सुंदर हिरा जन्माला आला त्याच नाव होतं 'ज्युबिली डायमंड'. त्याच वजन होतं २४५.३५ कॅरेट (४९.०७ ग्रॅम). १९०० साल उजाडताना हा हिरा भारताच्या औद्योगिक क्रांतीचे शिल्पकार सर जमशेदजी टाटा यांचे मोठे सुपुत्र सर दोराबजी टाटा यांनी खरेदी केला. त्या काळचा सर्वात मोठा हिरा त्यांनी आपली पत्नी मेहेरबाई भाभा यांना आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून भेट दिला. मेहेरबाई भाभा यांचे भाऊ होते जहांगीर भाभा म्हणजेच भारताच्या अणूऊर्जा कार्यक्रमाचे जनक होमी भाभा यांचे वडील. तर हा हिरा मेहेरबाई भाभा यांच्या खूप जवळचा होता. अनेक कार्यक्रमात त्यांनी आपल्या गळ्यात ज्युबिली डायमंड ला स्थान दिलं होतं. १९३१ मधे वयाच्या ५२ व्या वर्षी अचानक ल्युकेमिया म्हणजेच रक्ताचा कॅन्सर झाल्यामुळे मेहेरबाई भाभा यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे सर दोराबजी टाटा यांना आपल्या जोडीदाराची कमी आयुष्यात जाणवली. मेहेरबाई यांच्यावर असलेलं आपलं प्रेम अमर करण्यासाठी त्यांनी एक निर्णय घेतला. तो म्हणजे आपल्या प्रेमाचं प्रतीक उभं करण्याचा. 

मेहेरबाई यांच्या मृत्यूनंतर सर दोराबजी टाटांनी त्यांचे २१ दागिने आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्युबिली डायमंडचा त्यांनी लिलाव केला. त्यातून त्या काळी त्यांनी १० मिलियन रुपये उभे केले. ( १ मिलियन = १० लाख). आजच्या घडीला याची किंमत ५०० मिलियन रुपयांपेक्षा जास्त असेल. यातून त्यांनी आपल्या प्रेमाचं प्रतिमा म्हणजेच सर दोराबजी टाटा ट्रस्ट ची स्थापना केली. या ट्रस्ट मधून उभ्या राहिलेल्या संस्था आज बघितल्या की त्यांच प्रेमाचं प्रतीक किती मोठं आहे याची प्रचिती येईल. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, टी.आय.एफ.आर. (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. आणि ही यादी संपत नाही. आपल्या प्रिय पत्नीला ज्या आजाराने आपल्यापासून दूर नेलं. तशी घटना किंवा प्रेमाचा विरह कोणाच्याही आयुष्यात येऊ नये यासाठी कॅन्सर रोगाच्या अभ्यास, उपचार आणि संशोधनासाठी स्थापन झालेलं टाटा मेमोरियल हॉस्पिटल जगात नावाजलेलं आहे. 

प्रत्येक वर्षी ६०,००० ते ७०,००० कॅन्सर ने पिडीत असलेले रुग्ण टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधे उपचार घेतात. यात फक्त भारतातील नाही तर संपूर्ण आशिया खंडातून लोकं येतात. जगाच्या पूर्व भागात सर्वोत्तम कॅन्सर हॉस्पिटल पैकी एक म्हणून या हॉस्पिटल च नावं जगभर प्रसिद्ध आहे. यातील ७०% रुग्णांवर मोफत उपचार केले जातात हे विशेष आहे. दररोज १००० पेक्षा जास्ती कॅन्सर ग्रस्त रुग्ण इथल्या ओपीडी ला भेट देतात. ६५०० ऑपरेशन तर ६००० पेक्षा जास्त रुग्णांवर केमोथेरेपी, रेडिओथेरेपी ने उपचार केले जातात. जगातील कॅन्सर उपचारावरील अद्यावत तंत्रज्ञान या हॉस्पिटल मधे उपलब्ध आहे. 

यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आपल्या प्रेमाला अजरामर करता येणं माझ्या मते शक्यच नाही. जगातील सर्वोत्तम प्रेमाचं प्रतीक कोणतं? असा प्रश्न जर कोणी मला विचारला तर उत्तर टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि टाटा ट्रस्ट असेल. ताजमहाल च सौंदर्य कदाचित जास्ती छान असेल. त्याच रूप ही देखणं असेल पण प्रेमाची अनुभूती मात्र तिथे होत नाही. ती खरच तुम्हाला अनुभवायची असेल तर त्याचा प्रत्यय टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि टाटांनी सुरु केलेल्या इतर संस्थेतून येईल. खेदाची गोष्ट अशी गेली अनेक वर्ष अनेक भारतीयांना आणि जगातील लोकांना कॅन्सरमुक्त आणि कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करायची संधी देणारं हे प्रतीक मात्र भारतीयांना अजून उमगलेलं नाही. आजही भारतीय फक्त पांढऱ्या संगमवरात आपली सेल्फी काढण्यात धन्यता मानतात. प्रेमाचं प्रतीक समजून घ्यायला आपण कमी पडलो हेच खरं. 

हजारो लोकांचे प्राण वाचवणारं प्रेमाचं प्रतीक निर्माण करणाऱ्या सर दोराबजी टाटा आणि मेहेरबाई यांना माझा कडक सॅल्यूट. सर्व भारतीय आणि येणाऱ्या अनेक पिढ्या तुमच्या या अजरामर असणाऱ्या प्रेमाच्या प्रतिकातून प्रेमाचा, त्यागाचा, समाजभावनेचा, निस्वार्थीपणाचा संदेश पुढे नेत राहतील याबद्दल शंका नाही.  

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.