Thursday 9 October 2014

टोयलेत्स म्हणजे काय रे भाऊ.....
टोयलेत्स बांधले म्हणजे सगळे प्रश्न सुटणार नाहीत. बांधलेल्या टोयलेत्स ला शुल्क ठेवा म्हणजे त्याची नीट निगा राखली जाईल. मोदी ना अभिप्रेत असलेल कोर्पोरेशन कोर्पोरेट जगताकडून हे पैश्याच्या पलीकडे असल पाहिजे.
आज कोणी १०० कोटी देईल उद्या १००० कोटी देईल पण त्यातून बनणाऱ्या वस्तू ची निगा राखणे किंवा ती घाणेरडी जागा नाही तर स्वच्छतागृह आहे हि मानसिकता आपल्यात भिनण्यासाठी सुद्धा सर्वांच्या मदतीची अपेक्षा आहे. नाहीतर आहेत आपल परत येरे माझ्या मागल्या. उदाहरणार्थ रेल्वे प्ल्यातफोर्म वरील स्वच्छतागृह म्हणजे ह्या नावावर ती ठपका आहेत. कारण अति कोंडत वातावरण ती घाण , पान खाऊन पिचार्या ने रंगणाऱ्या भिंती आणि पाणी नसलेले नळ आणि १-२ रुपयांसाठी हुज्जत घालणारे लोक बघितले कि आपण किती मागे आहोत ह्याचा अंदाज येतो.
स्वच्छतेबद्दल चा अमेरिकेतील एक अतिशय बोलका अनुभव सांगतो. नायगारा ला जात असताना एका रेस्तोरंत पाशी थांबलो होतो. सकाळची वेळ थंड हवा कोफी घेऊन मी आणि माझे काही सहप्रवासी बोलत होतो. अचानक आलेल्या वार्याच्या झुळुकीने एकाच्या हातातील कप निसटून रस्ताच्या पलीकडे गेला. हवेमुळे तो कप अतिशय दूर वर गेला आणि एका गटाराच्या झाकणा पाशी येऊन थांबला. तो परत कचरा पेटीत टाकण्यासाठी आम्ही निघालो तोच त्याच्या जवळ असणार्या एका वृद्ध महिलेने अगदी वाकता येत नसताना तो कप उचलून जवळच्या कचरा पेटीत टाकला. आम्ही थ्यांक्स म्हणालो तर त्या बाईचे शब्द होते. "इट्स माय सिटी इट्स माय जोब तो कीप क्लीन अंड टू सी इट्स रिमेन लाईक द्यात" आपल्यापेकी किती जण फक्त मी मुंबईकर , मी पुणेकर करतात पण खरोखर आपण मुंबईकर आणि पुणेकर आहोत का आणि असू तर त्या साठी आपण आजपर्यंत काय केल ह्याचा प्रत्येकाने विचार करावा.
ह्याच बस मध्ये लांबचा प्रवास असल्याने टोय्लेत होत. (वोल्वो सारख्या अतिशय उत्कृष्ट बस आहेत आपल्याकडे पण त्यात टोय्लेत का नाही हा प्रश्नच उत्तर मी अजून हि शोधतो आहे ) बसवल्याने सुरु होण्या आधीच सांगितल कि हे तुमच्या सोयीसाठी आहे. अगदीच इमर्जन्सी असेल तेव्हा वापर करा. वापर केल्यावर ते तितकेच स्वच्छ राहील ह्याची काळजी घ्या कारण त्याच्या दुर्गंधी चा त्रास तुम्हालाच होईल. प्रत्येक माणसाला विचार करायला लावणारे शब्द जेव्हा वेळ आपल्यावर येते तेव्हा माणूस काळजी घेतो. भारतात चलता हे च्या नावाखाली आपल्यावर ती वेळ येत नाही आणि जेव्हा ती येईल तेव्हा आपण खरोकर एक सुजाण नागरिक बनू आणि मग मुंबईकर ,पुणेकर ज्याचा आपल्याला खरोखर अभिमान असेल.
विनीत वर्तक...

No comments:

Post a Comment