Saturday 6 February 2021

कोरोना लसीकरण... विनीत वर्तक ©

 कोरोना लसीकरण... विनीत वर्तक ©

२१ दिवस 

५० लाखापेक्षा जास्ती आरोग्य सेवा कर्मचारी 

८२ लाख लस टीकाकरण केंद्र

५० लाख लोकांना कोरोना लस अवघ्या २१ दिवसात देणारा भारत जगातील सगळ्यात वेगवान देश ठरला आहे. काही प्रसारमाध्यम आणि राजकीय नेत्यांनी स्वतःला त्यातलं ग,म, भ, न कळत नसताना केलेल्या नकारात्मक टीकेमुळे हा वेग कमी राहिलेला आहे. नाहीतर आपण ह्या आधीच हे लक्ष्य साध्य केलं असतं. 

तब्बल १३ लाख/ दिवस ह्या वेगाने भारत सरकारने कोरोना लस देण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. पण त्याला हवा तसा वेग आलेला नाही. पण तरीसुद्धा आपण २१ दिवसात हि मजल मारली आहे. जिकडे अमेरिका २४ दिवस, ब्रिटन ला ४३ दिवस तर इस्राईल ला हा एकदा गाठण्यासाठी ४५ दिवस लागले आहेत. नक्कीच भारताच्या लोकसंख्येच्या मानाने हा एकदा खूप लहान आहे. पण असं शिवधनुष्य पेलणं आणि ते पूर्णत्वाला नेणं सोपं काम नाहीच आहे. 

कोरोना लस घेतल्यामुळे शरीराला धोका होईल किंवा त्याने आपल्याला त्रास होईल असा खोटा अप्रचार करणाऱ्या लोकांना लसीकरणानंतर आलेल्या आकड्यांनी चांगली चपराक लावली आहे. कोणतीही लस टोचल्यावर प्रत्येक माणसाचं शरीर हे वेगळ्या पद्धतीने त्याला स्वीकारते. त्यामुळे काही मायनर तर अगदी काही थोड्या प्रमाणात मेजर सिम्टम्स शरीरात जाणवू शकतात. डोकं दुखणे, ताप येणं ते अजून काही पद्धतीने दिसणारे हे सिम्टम्प्स अपेक्षित असतात. त्यात कोरोना लस ज्या वेगाने विकसित करण्यात आली आहे. ते बघता काही लोकांन मध्ये आढळणं हे नॉर्मल आहे. 

आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणात ५० लाखांपैकी ०.१८% म्हणजे ९००० लोकांमध्ये मायनर सिम्टम्प्स म्हणजे ताप येणं, डोके दुखी वगरे आढळून आलेलं आहे. तर ०.००२% लोकांना (साधारण १०० लोकांना) हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागलेलं आहे. ज्या लोकांना ही गरज पडली त्यांना आधीपासून इतर व्याधी असल्याचं निदर्शनास आलं आहे. हे सगळे आकडे एकाच गोष्टीकडे निर्देष करत आहेत की कोव्हीड लस ही सुरक्षित आहे. कोरोना पासून आपलं रक्षण करण्यास समर्थ आहे. इकडे हे लक्षात घेतलं पाहिजे की आजही लसी वर संशोधन सुरु आहे. ती जास्तीत जास्त सुरक्षित करता येईल ह्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जर कोणी खोटा अप्रचार करत असेल तर आपण डोळसपणे ह्या सर्व गोष्टींकडे बघितलं पाहिजे. 

भारताने आत्तापर्यंत जगातील १५ देशांना आपल्या लसीचा फायदा पोहचवला आहे. तर तब्बल २५ देश भारताच्या कोव्हीड लसी साठी रांगेत उभे आहेत. ह्यातील कोणत्या देशाला लस मदत म्हणून द्यायची, मैत्री साठी द्यायची, विकत द्यायची ह्या सगळ्याचा निर्णय हा त्या, त्या देशाची आर्थिक परिस्थिती, भारताशी असलेले संबंध तसेच आंतरराष्ट्रीय कूटनीतीच्या आधारे ठरवली जाणार आहे. जिकडे चीन आपली लस घ्यावी म्हणून जागतिक पटलावर आमिष दाखवतो आहे. तिकडे भारताची लस पैसे मोजून घ्यायला तेच देश भारताच्या दरवाज्यावर उभे आहेत. 

भारताच्या कोरोना लसीकरणाचा हा कार्यक्रम जगाच्या लसीकरण आणि लोकांच्या निरोगी आयुष्यासाठी सरकारी पातळीवर कसा राबवला जाऊ शकतो ह्याच एक उत्कृष्ठ उदाहरण ठरेल ह्याची माझ्या मनात शंका नाही. फक्त एकच समस्त भारतीयांनी सगळ्या शंका, कुशंका बाजूला ठेवत आपल्या संशोधक, वैज्ञानिक आणि लस निर्माण करणाऱ्या कंपन्या ह्याच्यावर विश्वास ठेवायला हवा तेव्हाच हा कार्यक्रम एक मापदंड म्हणून ओळखला जाईल. तूर्तास ह्या मोहिमेच्या पुढल्या टप्प्यासाठी शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो स्रोत:- गुगल 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   




No comments:

Post a Comment