Sunday 9 June 2013

सइ चा वाढदिवस – एक वेगळा अनुभव.

२०१३ साल उजाडले त्या वेळेसच ह्या वर्षी सई च्या वाढदिवसाला काय करावे हा विचार डोक्यात आला. सई आता ३ वर्षाची होणार त्यामुळे ह्या वर्षी वेगळ्या पद्धतीने तो साजरा करावा अस मनात चालू असतानाच केतन बोंद्रे शी ह्या संबंधात बोलण झाल. केतन ने विहीगाव ला एखादा कार्यक्रम घेऊन त्यात सइ ला आणावे अशी कल्पना मांडली. मला पण हि कल्पना आवडली. नंतर मानसी कुलकर्णी ने तिच्या टीम बरोबर ह्या सर्व कार्यक्रमाची आखणी केली.
मुंबई आणि नाशिक ह्या दोन्ही शहरांच्या मध्ये असलेल एक छोट खेड. दोन शहरांच्या मध्ये असूनही विकासाची गंगा कोसो दूर आहे. पाणी , वीज ह्या मुलभूत गरजांचा अभाव आहे. अश्या स्तिथीत कस जीवन असेल ह्याचा मी विचार करत होतो. घरी २ तास वीज नसेल तर जीव नकोसा होतो ज्यांनी कधी एसी तर जाऊन दे पंखा बघितला नाही ते कसे राहत असतील. पाण्यासाठी रोज ४-५ किमी चालणे ते सुधा ३-४ कळश्या डोक्यावर घेऊन आणि ते भरण्यासाठी सकाळी २.३० वाजता जाने हे सगळच आपण दोन ध्रुवांवर राहतो ह्याची जाणीव होत होती.

सई चा वाढदिवस हे तर एक निम्मित होत सतत घडल्याच्या कट्या प्रमाणे न थकता धावणारा मी कधी बाजूला होऊन आसपास काय आहे ह्याचा मागोवा घेण्याच मी ठरवल होत. २६ मे ला जेव्हा मी तिकडे गेलो अनुभवल त्याने खूप काही शिकवल. ७५-८० मुलांच्या सानिध्यात दिवस कसा गेला कळलाच नाही. मानसी आणि सर्वच टीम ने कार्यक्रमाची इतकी सुंदर आखणी केली होती कि त्या सगळ्या मुलांन सोबत सई सुधा खूप रमली. महत्वाचे म्हणजे तिची मातीत खेळायची इच्चा खूप दिवसांनी पूर्ण झाली. एक काळ असा होता कि आई बाबा मातीत जास्ती खेळू नको म्हणून ओरडायचे आज बाबांच्या भूमिकेमध्ये मला माझ्या मुलीला माती शोधून द्यावी लागते ह्यातच आपण किती वेगळे झालो आहोत हे स्पष्ट होते.

आपला मुलगा , मुलगी कुठे आहेत?? त्याचं पुढे काय होणार?? तो/ ती डॉक्टर होणार कि कम्प्युटर इंजिनियर?? एस एस सी कि सी बी एस की?? शाळेची बस कि कार?? शिक्षक आहेत कि नाही ?? कथक कि फोक डान्स? ९९% कि ९५%?? पहिला कि दुसरा?? २० लाख कि ५० लाख??  भारतात पदव्युतर शिक्षण कि अमेरिकेत ??? ह्या असल्या आणि अनेक प्रश्न असणाऱ्या आजच्या आई बाबांच्या तुलनेत येथील आई बाबा मला कुठेच दिसले नाहीत. तसा विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही. रोजच्या दोन घासांची सोय करताना दिवस कधी संपतो आणि रात्र होते हे समजत नाही. अश्या परीस्तीथितीत हि मुलांना शिक्षण देण्याची आणि आपल्या परिस्तिथी ची कल्पना असून शिक्षण घेणाऱ्या मुलाचं अभिनंदन कराव तितक थोडच आहे.

चित्रकलेची आणि हस्तकलेची स्पर्धा आयोजित केली होती. इतकी सुंदर चित्र त्यांनी काढली होती कि खरच त्यात एक वेगळच सौंदर्य दिसत होते. एकाने वाघाचे इतके सुंदर चित्र काढले कि खरच मनापासून दाद द्यावीशी वाटली. कुन्चाल्यांशी कधी आयुष्यात संबंध आला नसताना इतक सुंदर चित्र काढताना नक्कीच त्यांच्यातील सुप्त गुणाची एक चाहूल मला दिसली. कोणतेही शिक्षक नसताना कोणताही अनुभव नसताना त्यांची कला खूपच उच्च दर्जाची होती. प्रत्येकाने खूपच तो दिवस मजेत घालवला. मग तो स्वामी विवेकानंद मंडळाचा कार्यकर्ता असो, मी असो किंवा अगदी सई असो.
असे अनेक विहीगाव आपल्या आजू बाजूला आहेत. आपल्यापेकी प्रत्येक जण ह्याचा अनुभव घेऊ शकतो. लांब जायची गरज नाही हे सगळ हाकेच्या अंतरावर आहे. समाजकार्य करावे इतके आपण मोठे नक्कीच नाही पण आपल्या रोजच्या जीवनातून थोडासा वेळ काढून आणि पैसे देऊन खूप मोठ भरीव कार्य आपण केल ह्या जाणीवेतून बाहेर पडून निदान समाजाला समजून घेतल तरी प्रत्येकासाठी आणि समाजासाठी तो वेगळा अनुभव ठरेल. शेवटी स्वामी विवेकानंद मंडळ , केतन बोंद्रे , मानसी कुलकर्णी आणि त्यांचे कार्यकर्ते ह्यांचे मनापासून खूप  आभार. इतका छान अनुभव दिल्याबद्दल आणि मला एक वेगळी दृष्टी दिल्याबद्दल..........

विनीत वर्तक 

No comments:

Post a Comment